शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

अमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’मध्ये चांदवड, सिन्नरची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:25 IST

नाशिक : सिनेअभिनेता अमीर खान यांच्या ‘पानी फाउण्डेशन’च्या सत्यमेव जयते उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील कायमच पाणीटंचाईचा सामना करणाºया चांदवड व सिन्नर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये पानी फाउण्डेशनच्या वतीने ‘वॉटर कप’ स्पर्धा होणार असून, या स्पर्धेसाठी चांदवड व सिन्नर तालुक्यात जलसंधारण व मृदसंधारणाची कामे हाती घेण्यात येतील व उत्कृष्ट काम करणाºया ग्रामपंचायतींना तब्बल ७५ लाखांचे बक्षीस पटकाविण्याची संधी दिली जाणार आहे.

ठळक मुद्देअमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’मध्ये चांदवड, सिन्नरची निवडराज्यातील ७५ तालुक्यांमध्ये पानी फाउण्डेशनच्या वतीने ‘वॉटर कप’ स्पर्धा

नाशिक : सिनेअभिनेता अमीर खान यांच्या ‘पानी फाउण्डेशन’च्या सत्यमेव जयते उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील कायमच पाणीटंचाईचा सामना करणाºया चांदवड व सिन्नर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये पानी फाउण्डेशनच्या वतीने ‘वॉटर कप’ स्पर्धा होणार असून, या स्पर्धेसाठी चांदवड व सिन्नर तालुक्यात जलसंधारण व मृदसंधारणाची कामे हाती घेण्यात येतील व उत्कृष्ट काम करणाºया ग्रामपंचायतींना तब्बल ७५ लाखांचे बक्षीस पटकाविण्याची संधी दिली जाणार आहे.गेल्या दोन वर्षांपासून पानी फाउण्डेशनच्या वतीने राज्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये विविध कामे घेतली जात असून, त्याचे दृश्य स्वरूपात परिणामही दिसू लागले आहेत. यंदा पाणी फाउंडेशनने जलसंधारण व मृदसंधारणाची अधिकाधिक चांगली कामे करणाºया राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये स्पर्धा भरवून त्यानिमित्ताने पाणी साठवणूक, वापर व उपयोगाबाबत जनजागृतीला हातभार लावला जाणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्णात कायमच टंचाईला सामोरे जावे लागणाºया चांदवड व सिन्नर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही गावांमधील प्रत्येक ग्रामपंचायतीला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाºया ग्रामपंचायतींनी १० जानेवारीपर्यंत ग्रामसभा घेऊन तसा ठराव करून पाणी फाउंडेशनला सादर करावा लागणार आहे. सहभागी होणाºया ग्रामपंचायतीने गावातील कोणत्याही पाच व्यक्तींची नावेही फाउंडेशनला कळवायची असून, फाउंडेशनच्या वतीने चार ते पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यात जवळपास ४५ ते ५० ठिकाणी फाउंडेशन प्रशिक्षण सेंटर सुरू करणार आहे. या शिबिरात सहभागी होणाºया शिबिरार्थींचा प्रवास, राहण्याची, खाण्याची व निवासाची सोय फाउंडेशन करणार असून, शिबिरार्थींना कामाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.येत्या ८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसांच्या कालावधीत स्पर्धेत सहभागी होणाºया ग्रामपंचायतींनी शासकीय योजनांच्या माध्यमातून गावात जलसंधारण व मृदसंधारणाची कामे करायची आहेत. या कामांसाठी मात्र फाउण्डेशन कोणतीही आर्थिक मदत करणार नाही. त्यासाठी लोकसहभाग, लोकवर्गणी, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ही कामे पूर्ण करावी लागणार असून, पानी फाउण्डेशन या स्पर्धेचा निकाल घोषित करेल. राज्यात पहिल्या येणाºया तालुक्याला ७५ लाख, द्वितीय ५० व तृतीय ४० लाखांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तालुक्यात पहिल्या येणाºया ग्रामपंचायतीला १० लाख बक्षीस देण्यात येईल.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी