शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

पावसाचे वाहून जाणारे पाणी वळवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 20:29 IST

दिंडोरी : दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाचे पाणी पश्चिमेकडे वाहून समुद्रात जात असून, ते पाणी अडवल्यास स्थानिक जनतेला त्याचा फायदा होऊन उर्वरित पाणी पूर्वेकडे वळवत ते गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देजयंत पाटील : दिंडोरी तालुक्यातील प्रकल्प; बारा वळण योजनांची पाहणी

दिंडोरी : दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाचे पाणी पश्चिमेकडे वाहून समुद्रात जात असून, ते पाणी अडवल्यास स्थानिक जनतेला त्याचा फायदा होऊन उर्वरित पाणी पूर्वेकडे वळवत ते गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प बारा वळण योजना यांची पाहणी तसेच देहरे येथे ल.पा. योजनेच्या कामाचा शुभारंभ, अंबाड येथील ल.पा. योजनेचे जलपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. देहरे येथील ल. पा. योेजनेबाबत जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यावेळी जयंत पाटील यांनी धोंडाळपाडा ग्रामस्थांशी संवाद साधला.जयंत पाटील यांनी दिंडोेरी, पेठ तालुक्यात देवसाने मांजरपाडासह विविध वळण योजना लघुपाटबंधारे आदी सिंंचन प्रकल्प राबवल्याबद्दल कौतुक करत हा प्रकल्प लवकरच पूर्ण करू, आवश्यक त्या नवीन योजनांचा सर्व्हे करत त्या योजनाही मार्गी लावू, असे आश्वासन जयंंत पाटील यांनी दिले. दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यातील पश्‍चिम घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. पावसाचे मोजमाप करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात येतील. पश्‍चिमेला वाहून जाणारे पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्यासाठीच वळण योजनांचा वापर पाणी अडवण्यासाठी करता येईल. या पाण्याचे आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून उर्वरित पाणी गोदावरी खोऱ्यात येणार असल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला त्याचा फायदा होणार आहे. या परिसरातील वळण योजनांच्या रखडलेल्या कामाला गती देण्यात येईल. ग्रामस्थांच्या मागणीवरून छोटे छोटे केटिवेअर, पाझर तलाव बांधून स्थानिक ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्याला कटिबद्ध आहे, असेही पाटील म्हणाले.वळण योजनांसाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या, परंतु स्थानिकांना पाणी आरक्षण मिळत नाही. अनेक ठिकाणी पाणीवापर संस्था स्थापन केल्या आहेत; परंतु त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही. मांजरपाडा प्रकल्पातही स्थानिक जनतेला पाणी आरक्षण मिळालेले नाही, ते देण्यात यावे आदी मागण्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केल्या. यावेळी कादवा चेअरमन श्रीराम शेटे यांनीही तालुक्यातील सिंचन समस्या पाटील यांच्याकडे मांडल्या.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईGovernmentसरकार