शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

पावसाचे वाहून जाणारे पाणी वळवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 20:29 IST

दिंडोरी : दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाचे पाणी पश्चिमेकडे वाहून समुद्रात जात असून, ते पाणी अडवल्यास स्थानिक जनतेला त्याचा फायदा होऊन उर्वरित पाणी पूर्वेकडे वळवत ते गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देजयंत पाटील : दिंडोरी तालुक्यातील प्रकल्प; बारा वळण योजनांची पाहणी

दिंडोरी : दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाचे पाणी पश्चिमेकडे वाहून समुद्रात जात असून, ते पाणी अडवल्यास स्थानिक जनतेला त्याचा फायदा होऊन उर्वरित पाणी पूर्वेकडे वळवत ते गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प बारा वळण योजना यांची पाहणी तसेच देहरे येथे ल.पा. योजनेच्या कामाचा शुभारंभ, अंबाड येथील ल.पा. योजनेचे जलपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. देहरे येथील ल. पा. योेजनेबाबत जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यावेळी जयंत पाटील यांनी धोंडाळपाडा ग्रामस्थांशी संवाद साधला.जयंत पाटील यांनी दिंडोेरी, पेठ तालुक्यात देवसाने मांजरपाडासह विविध वळण योजना लघुपाटबंधारे आदी सिंंचन प्रकल्प राबवल्याबद्दल कौतुक करत हा प्रकल्प लवकरच पूर्ण करू, आवश्यक त्या नवीन योजनांचा सर्व्हे करत त्या योजनाही मार्गी लावू, असे आश्वासन जयंंत पाटील यांनी दिले. दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यातील पश्‍चिम घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. पावसाचे मोजमाप करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात येतील. पश्‍चिमेला वाहून जाणारे पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्यासाठीच वळण योजनांचा वापर पाणी अडवण्यासाठी करता येईल. या पाण्याचे आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून उर्वरित पाणी गोदावरी खोऱ्यात येणार असल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला त्याचा फायदा होणार आहे. या परिसरातील वळण योजनांच्या रखडलेल्या कामाला गती देण्यात येईल. ग्रामस्थांच्या मागणीवरून छोटे छोटे केटिवेअर, पाझर तलाव बांधून स्थानिक ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्याला कटिबद्ध आहे, असेही पाटील म्हणाले.वळण योजनांसाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या, परंतु स्थानिकांना पाणी आरक्षण मिळत नाही. अनेक ठिकाणी पाणीवापर संस्था स्थापन केल्या आहेत; परंतु त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही. मांजरपाडा प्रकल्पातही स्थानिक जनतेला पाणी आरक्षण मिळालेले नाही, ते देण्यात यावे आदी मागण्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केल्या. यावेळी कादवा चेअरमन श्रीराम शेटे यांनीही तालुक्यातील सिंचन समस्या पाटील यांच्याकडे मांडल्या.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईGovernmentसरकार