शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

पावसाचे वाहून जाणारे पाणी वळवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 20:29 IST

दिंडोरी : दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाचे पाणी पश्चिमेकडे वाहून समुद्रात जात असून, ते पाणी अडवल्यास स्थानिक जनतेला त्याचा फायदा होऊन उर्वरित पाणी पूर्वेकडे वळवत ते गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

ठळक मुद्देजयंत पाटील : दिंडोरी तालुक्यातील प्रकल्प; बारा वळण योजनांची पाहणी

दिंडोरी : दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाचे पाणी पश्चिमेकडे वाहून समुद्रात जात असून, ते पाणी अडवल्यास स्थानिक जनतेला त्याचा फायदा होऊन उर्वरित पाणी पूर्वेकडे वळवत ते गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावू, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प बारा वळण योजना यांची पाहणी तसेच देहरे येथे ल.पा. योजनेच्या कामाचा शुभारंभ, अंबाड येथील ल.पा. योजनेचे जलपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. देहरे येथील ल. पा. योेजनेबाबत जिल्हा परिषद सदस्य अशोक टोंगारे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यावेळी जयंत पाटील यांनी धोंडाळपाडा ग्रामस्थांशी संवाद साधला.जयंत पाटील यांनी दिंडोेरी, पेठ तालुक्यात देवसाने मांजरपाडासह विविध वळण योजना लघुपाटबंधारे आदी सिंंचन प्रकल्प राबवल्याबद्दल कौतुक करत हा प्रकल्प लवकरच पूर्ण करू, आवश्यक त्या नवीन योजनांचा सर्व्हे करत त्या योजनाही मार्गी लावू, असे आश्वासन जयंंत पाटील यांनी दिले. दिंडोरी, पेठ, सुरगाणा तालुक्यातील पश्‍चिम घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. पावसाचे मोजमाप करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्जन्यमापक यंत्रे बसवण्यात येतील. पश्‍चिमेला वाहून जाणारे पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. त्यासाठीच वळण योजनांचा वापर पाणी अडवण्यासाठी करता येईल. या पाण्याचे आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून उर्वरित पाणी गोदावरी खोऱ्यात येणार असल्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्याला त्याचा फायदा होणार आहे. या परिसरातील वळण योजनांच्या रखडलेल्या कामाला गती देण्यात येईल. ग्रामस्थांच्या मागणीवरून छोटे छोटे केटिवेअर, पाझर तलाव बांधून स्थानिक ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्याला कटिबद्ध आहे, असेही पाटील म्हणाले.वळण योजनांसाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या, परंतु स्थानिकांना पाणी आरक्षण मिळत नाही. अनेक ठिकाणी पाणीवापर संस्था स्थापन केल्या आहेत; परंतु त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही. मांजरपाडा प्रकल्पातही स्थानिक जनतेला पाणी आरक्षण मिळालेले नाही, ते देण्यात यावे आदी मागण्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केल्या. यावेळी कादवा चेअरमन श्रीराम शेटे यांनीही तालुक्यातील सिंचन समस्या पाटील यांच्याकडे मांडल्या.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईGovernmentसरकार