शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

नाशिक जिल्ह्यातील धरणातील साठ्यांमध्ये कमालीची घट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 17:59 IST

नाशिक जिल्ह्यातील धरणांची साठवण क्षमता ६५,५१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, गेल्या वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सर्वत्र सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहिली होती.

ठळक मुद्देगत वर्षाच्या तुलनेत वाढ : ३४ टक्के पाणी शिल्लकयंदा दरवर्षापेक्षा उशिराने जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यात वाढ होताच पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय घट होऊ लागली असून, जेमतेम ३४ टक्के साठाच शिल्लक राहिला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक असून, गेल्या वर्षी मेअखेरीस फक्त १० टक्केच पाणी धरणांमध्ये शिल्लक होते.

नाशिक जिल्ह्यातील धरणांची साठवण क्षमता ६५,५१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, गेल्या वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सर्वत्र सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहिली होती. त्यामुळे आॅक्टोबरअखेर काही धरणांचे दरवाजे उघडून देत पाण्याचा विसर्ग करावा लागला. परिणामी नदी, नाल्यांना महापुराची परिस्थिती निर्माण झाली तर विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली होती. नोव्हेंबर महिन्यांपर्यंत पावसाची हजेरी कायम राहिल्याने जमिनीखालच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे यंदा दरवर्षापेक्षा उशिराने जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. तथापि, धरणांमध्ये पाणी भरपूर असले तरी, धरणाच्या पाण्यावर असलेले इतर आरक्षणाचा विचार करता यंदा मे महिन्यात फक्त ३४ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. हवामान खात्याने यंदाही पाऊस समाधानकारण पडणार असल्याचे भाकित केले, परंतु पाऊस काहीसा लांबणीवर पडणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ३८ टक्के जलसाठा असून, गंगापूर धरणात ४७ टक्केपाणी आहे. सध्या कश्यपि व गौतमी गोदावरीतून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. दारणा धरणात ६६ टक्के जलसाठा आहे, तर ओझरखेडमध्ये ४१, पालखेड १६, भावली २०, वालदेवी २२, चणकापूर २७, हरणबारी ३३, गिरणा ३४ टक्केअशाप्रकारे प्रमुख धरणांमध्ये पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी मात्र याचवेळी जिल्ह्यातील दहा धरणांनी तळ गाठला होता. यंदा मात्र अद्याप तशी वेळ आलेली नाही.

 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक