वाळवणाचे पदार्थ तयार करण्याची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:14 IST2021-03-27T04:14:59+5:302021-03-27T04:14:59+5:30
नाशिक : कोरोना संकटामुळे अनेक महिलांनी सुरु केलेल्या गृहउद्योगांना चांगला प्रतिसाद मिळत असून या मिहलांंना चांगला रोजगार मिळत आहे. ...

वाळवणाचे पदार्थ तयार करण्याची लगबग
नाशिक : कोरोना संकटामुळे अनेक महिलांनी सुरु केलेल्या गृहउद्योगांना चांगला प्रतिसाद मिळत असून या मिहलांंना चांगला रोजगार मिळत आहे. यामुळे त्यांच्या आर्थिक समस्या सुटण्यास मदत झाली आहे.
कुरडया, पापडचे दर वाढले
नाशिक : कच्चा मालाचे दर वाढल्यामुळे यावर्षी करुडया, पापड, शेवया तयार करुन देणाऱ्या व्यवसायीकांनी दरवाढ केली असल्याचे दिसुन येत आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याने महागाईचा भडका उडाला असून या व्यवसायीकांच्या व्यावसायावरही परिणाम झाला आहे.
गांधीनगर परिसरात अस्वच्छता
नाशिक : गांधीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली असून काही ठिकाणी कचरा साचला आहे. येथील भाजीबाजारातही अस्वच्छता दिसुन येते. या परीसरात स्वच्छता करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शेतक्यांर्च आर्थिक गणित कोलमडले
नाशिक : शेती मशागतीची कामे करणाऱ्या व्यवसायीकांनी यावर्षी दरवाढ केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यामुळे पिकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. नांगरणी, वखरणी, पेरणी या सर्वच कामांसाठी ट्रॅक्टरचालकांनी दरवाढ केली आहे.
आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला
नाशिक : शहरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढु लागल्याने आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढला आहे. नाकरीकांनी कामाशिवाय घराबाहेर पडावे त्याच बरोबर तोंडाला मास्क लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दिवसभर रस्त्यांवर गर्दी
नाशिक : शहरातील व्यापारीपेठा सायंकाळी सात नंतर बंद होत असल्याने अनेक नागरीक सकाळीसच खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने दिवसभर रस्त्यांवर गर्दी दिसुन येत आहे. यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडीही होते.
खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरीक त्रस्त
नाशिक : ऐन उन्हाळयात शहरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमद्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नाागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
सायकल ट्रॅकचे काम अंतिम टप्यात
नाशिक : त्र्यंबक नाका ते शरणपुर पोलिस चौकी दरम्यान तयार करण्यात येणाऱ्या सायकल ट्रॅकचे काम अंतिम टप्यात असून लवकरच हे काम पूर्ण होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या ठक्कर बझार जवळ फरशी बसविण्याचे काम सुरु असल्याचे दिसुन येत आहे.