शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या दाव्याने आघाडीच्या उमेदवारांमध्ये चलबिचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:51 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत २२० जागा जिंकण्याबाबत भाजप-सेनेकडून वारंवार केल्या जाणाऱ्या दाव्यामुळे जिल्ह्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या विद्यमान आमदारांबरोबरच इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत २२० जागा जिंकण्याबाबत भाजप-सेनेकडून वारंवार केल्या जाणाऱ्या दाव्यामुळे जिल्ह्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या विद्यमान आमदारांबरोबरच इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.युतीकडून अशाप्रकारे दावा करताना त्याचा कोणताही ठोस पुरावा देण्यात आलेला नसल्यामुळे विरोधी पक्षांना प्रत्येक मतदारसंघ असुरक्षित वाटू लागला असून, आहे त्या जागा टिकविण्याचे मोठे आव्हान निवडणुकीपूर्वी इच्छुकांपुढे उभे ठाकले आहे. त्यामुळे काहींनी खासगी कंपन्यांमार्फत मतदारांचा कल जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून, विरोधकांच्या मानाने सत्ताधारी भाजप-सेनेने यात अधिक आघाडी घेतली आहे. पक्षपातळीवर मेळावे, बैठका, संभाव्य उमेदवारांची चाचपणी तसेच विरोधी पक्षांचे आमदार गळाला लावून त्यांनी आपली ताकद वाढविण्याचे सर्व प्रयत्न करतानाच विरोधी आघाडी खिळखिळी करण्यासाठी कधी आमदारांच्या पक्षांतराचे तर कधी राज्यातील २८८ पैकी २२० जागा जिंकण्याचा छातीठोक दावा करून स्वपक्षीयांची उमेद वाढविण्यात येत आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता, युतीला मतदारांना पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे युतीकडून अनेकांनी उमेदवारी करण्यासाठी गुढग्याला बाशिंग बांधले असून, परिणामी विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, आघाडी समर्थकांकडून लोकसभेची निवडणूक व विधानसभेच्या निवडणुकीतील विषय, मतदारांची मानसिकता यात मोठा फरक असल्याचे सांगून मतदार आघाडीला कौल देतील, असा दावा केला जात आहे. शिवाय युतीकडून २२० जागा जिंकण्याच्या केल्या जात असलेल्या दाव्यातील तथ्य काय असा सवालही विचारला जात आहे. असे असले तरी, आघाडीच्या उमेदवारांमध्ये काही प्रमाणात निवडणुकीची धडकी भरली असून, त्यासाठी मतदारांची चाचपणी करण्यासाठी काहींनी खासगी कंपनीचा आधारघेतला आहे.आपापली जागा ताब्यात ठेवण्याची कसरतयुतीच्या या दाव्यामुळे मात्र नाशिक जिल्ह्यातील जागांबाबतही अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. युतीने केलेल्या दाव्यात नाशिकच्या किती जागा वाढतील हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी, सध्या युतीच्या ताब्यात जिल्ह्यातील आठ जागा आहेत. या जागा वाढतील असे युती समर्थकांचे म्हणणे असून, सहा जागांवर कॉँग्रेस आघाडी व एक जागा मित्रपक्ष माकपाच्या ताब्यात आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला आपापली जागा ताब्यात ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे़

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस