शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

युतीच्या दाव्याने आघाडीच्या उमेदवारांमध्ये चलबिचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:51 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत २२० जागा जिंकण्याबाबत भाजप-सेनेकडून वारंवार केल्या जाणाऱ्या दाव्यामुळे जिल्ह्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या विद्यमान आमदारांबरोबरच इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत २२० जागा जिंकण्याबाबत भाजप-सेनेकडून वारंवार केल्या जाणाऱ्या दाव्यामुळे जिल्ह्यातील कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या विद्यमान आमदारांबरोबरच इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.युतीकडून अशाप्रकारे दावा करताना त्याचा कोणताही ठोस पुरावा देण्यात आलेला नसल्यामुळे विरोधी पक्षांना प्रत्येक मतदारसंघ असुरक्षित वाटू लागला असून, आहे त्या जागा टिकविण्याचे मोठे आव्हान निवडणुकीपूर्वी इच्छुकांपुढे उभे ठाकले आहे. त्यामुळे काहींनी खासगी कंपन्यांमार्फत मतदारांचा कल जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून, विरोधकांच्या मानाने सत्ताधारी भाजप-सेनेने यात अधिक आघाडी घेतली आहे. पक्षपातळीवर मेळावे, बैठका, संभाव्य उमेदवारांची चाचपणी तसेच विरोधी पक्षांचे आमदार गळाला लावून त्यांनी आपली ताकद वाढविण्याचे सर्व प्रयत्न करतानाच विरोधी आघाडी खिळखिळी करण्यासाठी कधी आमदारांच्या पक्षांतराचे तर कधी राज्यातील २८८ पैकी २२० जागा जिंकण्याचा छातीठोक दावा करून स्वपक्षीयांची उमेद वाढविण्यात येत आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता, युतीला मतदारांना पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे युतीकडून अनेकांनी उमेदवारी करण्यासाठी गुढग्याला बाशिंग बांधले असून, परिणामी विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, आघाडी समर्थकांकडून लोकसभेची निवडणूक व विधानसभेच्या निवडणुकीतील विषय, मतदारांची मानसिकता यात मोठा फरक असल्याचे सांगून मतदार आघाडीला कौल देतील, असा दावा केला जात आहे. शिवाय युतीकडून २२० जागा जिंकण्याच्या केल्या जात असलेल्या दाव्यातील तथ्य काय असा सवालही विचारला जात आहे. असे असले तरी, आघाडीच्या उमेदवारांमध्ये काही प्रमाणात निवडणुकीची धडकी भरली असून, त्यासाठी मतदारांची चाचपणी करण्यासाठी काहींनी खासगी कंपनीचा आधारघेतला आहे.आपापली जागा ताब्यात ठेवण्याची कसरतयुतीच्या या दाव्यामुळे मात्र नाशिक जिल्ह्यातील जागांबाबतही अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. युतीने केलेल्या दाव्यात नाशिकच्या किती जागा वाढतील हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी, सध्या युतीच्या ताब्यात जिल्ह्यातील आठ जागा आहेत. या जागा वाढतील असे युती समर्थकांचे म्हणणे असून, सहा जागांवर कॉँग्रेस आघाडी व एक जागा मित्रपक्ष माकपाच्या ताब्यात आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला आपापली जागा ताब्यात ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे़

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस