शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनानेच पाडली शेतकऱ्यांमध्ये फूट, नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग बाधीत शेतकऱ्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 16:14 IST

समृद्धी महामार्गासाठी मोठय़ा प्रमाणात सुपिक जमीन संपादीत केली जात असून या जमितीत पिकलेल्या भाज्या मुख्यमंत्र्यांना पाठवून सुपिक जमिनी प्रकल्पातून वगळण्याच्या मागणीसाठी शिवडेसह इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधीत शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भाज्या भेट देऊन आंदोलन केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना भाज्या भेट देऊन समृद्धी महामार्ग बाधीत शेतकऱ्यांचे आंदोलनशेतकऱ्यांना अधिक रक्कमेची लालच दाखवून जमिनींची खरेदी केलाचा आरोप सुपिक जमिनी प्रकल्पातून वगळण्याची मागणी

नाशिक : समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नापीक अथवा अल्प उत्पन्नाच्या जमीनी असलेल्या शेतकऱ्यांना अधिक रक्कमेची लालच दाखवून जमिनी खरेदी करीत शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा घाट घातल्याचा आरोप समृद्धी महामार्ग प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांनी केला आहे. या शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.27) समृद्धी महामार्गासाठी जाणाऱ्या शेतीतील भाज्या निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना भेट देऊन त्या मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.समृद्धी महामार्गासाठी मोठय़ा प्रमाणात सुपिक जमीन संपादीत केली जात असून या जमितीत पिकलेल्या भाज्या मुख्यमंत्र्यांना पाठवून सुपिक जमिनी प्रकल्पातून वगळण्याच्या मागणीसाठी शिवडेसह इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधीत शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भाज्या भेट देऊन आंदोलन केले. समृद्धी महामार्गासाठी पिकाऊ व बागायती जमीन शासन घेत आहे. या जमिनींची मागणी स्वत: मुख्यमंत्र्यांनी करावी, यासाठी अनेकदा विनंती केली. परंतु आतार्पयत दहा वेळा नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊनही मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गात जाणाऱ्या पिकाऊ जमिनींना भेट दिलेली नाही. या जमिनीत लाखो रुपयांच्या पालेभाज्यांसह अन्य पिके घेतली जातात. शिवडेसह इगतपुरी व सिन्नर तालुक्यात टमाटे, कोबी, फ्लॉवर, सिमला मिर्ची, द्राक्ष, ऊस, भात, कांदे, काकडी आदि पिके घेतली जात असून यातील विविध पिके आजही शेतात उभी आहेत. यावर्षी टमाटय़ाला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. या उत्पन्नासमोर शासनाने कितीही पटीने शेतजमिनीचा मोबदला दिला तरी तो तोकडाच असल्याने या जमीनी समृद्धी महामार्गातून वगळण्याची मागणी समृद्धी महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. या प्रकल्पासाठी शासनाने 2013च्या भूसंपादन कायद्यानुसारच घ्याव्यात अन्यथा या भागातील शेतकरी जमीन देणार नसल्याचेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :highwayमहामार्गFarmerशेतकरी