शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

प्रशासनानेच पाडली शेतकऱ्यांमध्ये फूट, नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग बाधीत शेतकऱ्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 16:14 IST

समृद्धी महामार्गासाठी मोठय़ा प्रमाणात सुपिक जमीन संपादीत केली जात असून या जमितीत पिकलेल्या भाज्या मुख्यमंत्र्यांना पाठवून सुपिक जमिनी प्रकल्पातून वगळण्याच्या मागणीसाठी शिवडेसह इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधीत शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भाज्या भेट देऊन आंदोलन केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना भाज्या भेट देऊन समृद्धी महामार्ग बाधीत शेतकऱ्यांचे आंदोलनशेतकऱ्यांना अधिक रक्कमेची लालच दाखवून जमिनींची खरेदी केलाचा आरोप सुपिक जमिनी प्रकल्पातून वगळण्याची मागणी

नाशिक : समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नापीक अथवा अल्प उत्पन्नाच्या जमीनी असलेल्या शेतकऱ्यांना अधिक रक्कमेची लालच दाखवून जमिनी खरेदी करीत शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा घाट घातल्याचा आरोप समृद्धी महामार्ग प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांनी केला आहे. या शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.27) समृद्धी महामार्गासाठी जाणाऱ्या शेतीतील भाज्या निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना भेट देऊन त्या मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.समृद्धी महामार्गासाठी मोठय़ा प्रमाणात सुपिक जमीन संपादीत केली जात असून या जमितीत पिकलेल्या भाज्या मुख्यमंत्र्यांना पाठवून सुपिक जमिनी प्रकल्पातून वगळण्याच्या मागणीसाठी शिवडेसह इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधीत शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भाज्या भेट देऊन आंदोलन केले. समृद्धी महामार्गासाठी पिकाऊ व बागायती जमीन शासन घेत आहे. या जमिनींची मागणी स्वत: मुख्यमंत्र्यांनी करावी, यासाठी अनेकदा विनंती केली. परंतु आतार्पयत दहा वेळा नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊनही मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गात जाणाऱ्या पिकाऊ जमिनींना भेट दिलेली नाही. या जमिनीत लाखो रुपयांच्या पालेभाज्यांसह अन्य पिके घेतली जातात. शिवडेसह इगतपुरी व सिन्नर तालुक्यात टमाटे, कोबी, फ्लॉवर, सिमला मिर्ची, द्राक्ष, ऊस, भात, कांदे, काकडी आदि पिके घेतली जात असून यातील विविध पिके आजही शेतात उभी आहेत. यावर्षी टमाटय़ाला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. या उत्पन्नासमोर शासनाने कितीही पटीने शेतजमिनीचा मोबदला दिला तरी तो तोकडाच असल्याने या जमीनी समृद्धी महामार्गातून वगळण्याची मागणी समृद्धी महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. या प्रकल्पासाठी शासनाने 2013च्या भूसंपादन कायद्यानुसारच घ्याव्यात अन्यथा या भागातील शेतकरी जमीन देणार नसल्याचेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :highwayमहामार्गFarmerशेतकरी