शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

युवकांच्या पुढाकारातून एरंडगाव येथील सर्व रस्ते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 5:08 PM

जगभर पसरलेल्या कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी येवला तालुक्यातील एरंडगाव येथील ग्रामस्थांनी खबरदारी घेतली आहे. गावातील एकही व्यक्ती वस्तू खरेदीसाठी बाहेरगावी जाणार नाही व संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही व आपला गाव सुरक्षित रहावा यासाठी गावातील युवक सरसावले आहेत. गावात येण्यासाठी असणारे सर्व मार्ग बंद केले आहेत.

एरंडगाव : जगभर पसरलेल्या कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी येवला तालुक्यातील एरंडगाव येथील ग्रामस्थांनी खबरदारी घेतली आहे. गावातील एकही व्यक्ती वस्तू खरेदीसाठी बाहेरगावी जाणार नाही व संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही व आपला गाव सुरक्षित रहावा यासाठी गावातील युवक सरसावले आहेत. गावात येण्यासाठी असणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. तसेच गावात आता एकही वाहन प्रवेश करणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.फक्त रस्ते बंद करून हे युवक थांबले नाही तर ज्या भागात मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे कामही या युवकांनी हाती घेतले आहे. येथील युवक एकत्र येऊन विविध उपक्र म राबवत असतात. या लॉकडाउन काळात, संचारबंदी कालावधीत गरीब कुटुंबातील आजारी व्यक्तींना मेडिकल व दवाखान्याचा खर्च पुरविणे. गरीब व गरजू कुटुंबांना किराणा वाटप करणे आदी उपक्र म राबवित आहेत. या उपक्र मात रवींद्र साताळकर, शरद रंधे, सतीश काळे, अनिल पडोळ, बाबासाहेब गोविंद, रशीद पटेल, मुक्तार पटेल, सागर सुराणा, ज्ञानेश्वर पडोळ, तुकाराम पडोळ, अश्फाक सैय्यद, देविदास खकाळे, दत्तू बोराडे, गोरख शिंदे, समाधान आहेर, सागर आहेर, गणेश चौघुले, असिफ पठाण, खलील पठाण, आवेद शेख, जावेद शेख, तन्वीर शेख आदी परिश्रम घेत आहेत. दरम्यान, करोनापासून गाव वाचवण्यासाठी एरंडगाव येथील युवक राबवत असलेले उपक्र म स्तुत्य आहे. गावातील प्रत्येक घरी भाजीपाला, आवश्यक किराणा पोहोच करून गरजूंची चिंता मिटवली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करून मास्क वाटप केले आहेत. एखाद्यावर वाईट प्रसंग आल्यास तातडीने मदत केली जाते. हा आदर्श इतर गावातील युवकांनीही घ्यावा, असे सुरेश उशीर यांनी सांगितले. तर एरंडगावातील युवक नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र बाहेरच्या लोकांना गावात प्रवेश बंद करणे हे अमानवीय आहे. ज्यावेळी गावात काही सार्वजनिक कार्यक्र म असो अथवा निवडणूक असो अशावेळी गावपुढाऱ्यांना प्रथम गावातील मतदार यादीत असलेले पण नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरगावी असलेल्यांची आठवण येते. मग संकटकाळी त्या लोकांना गावात यायचे असल्यास त्यांना गावात येण्यास बंदी करायची, हे योग्य नाही अशी भावना बाहेरगावी नोकरीस असलेला एरंडगावकरांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य