शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

कळवणला सर्वपक्षीय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:23 IST

सटाणा शहरासाठी पुनंद धरणातून मंजूर करण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून, कळवण व देवळा तालुक्यातील जनतेचा व पुनंद खोºयातील शेतकऱ्यांचा या योजनेला सुरुवातीपासून विरोध असल्याने शासनाने या प्रश्नी जनतेच्या भावनांचा विचार करावा,

कळवण : सटाणा शहरासाठी पुनंद धरणातून मंजूर करण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून, कळवण व देवळा तालुक्यातील जनतेचा व पुनंद खोºयातील शेतकऱ्यांचा या योजनेला सुरुवातीपासून विरोध असल्याने शासनाने या प्रश्नी जनतेच्या भावनांचा विचार करावा, नाही तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी येथे आयोजित बैठकीत दिला. पुढील रणनीती ठरविण्यासाठी शनिवार, दि. १ जून पुनंद धरण कार्यस्थळावर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.पुनंद जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकºयांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार जे.पी.गावित,जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जलवाहिनीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष देविदास पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शैलेश पवार उपस्थित होते.ज्या शेतकºयांनी धरणासाठी जमिनी दिल्या त्यांच्या उद्देशाकडे दुर्लक्ष केले जात असून एकजुटीने लढा उभारण्याची गरज असल्याचे मत आमदार जे.पी.गावित यांनी व्यक्त केले. पुनंद खोºयातीलच नव्हे तर परीसरातल्या सर्वच शेतकºयांनी आणि आदिवासी बांधवांनी हक्काचे पाणी वाचवण्यासाठी पुढे यायला हवे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केले. यापूर्वी आंदोलने करूनही पाणीयोजनेचा घाट घातला जात असून, कळवणकरांची पाणी देण्याला नव्हे तर पाइपलाइनला असलेल्या विरोधाची भूमिका शासन व प्रशासनाने समजून घ्यावी असे मत जलवाहिनीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष देवीदास पवार यांनी व्यक्त केले.बाजार समिती सभापती धनंजय पवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कारभारी आहेर, हेमंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.कालव्याद्वारे पाणी न्यावेसटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी राज्य शासनाने५५ कोटी रु पयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मात्र कळवणकरांच्या विरोधामुळे अद्यापपर्यंत या योजनेचे काम सुरु होऊ शकलेले नाही. हे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाºयांना दिल्याने काम सुरु होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र कळवण तालुक्यातील शेतकºयांचा विरोध कायम असून, पाइपलाइनद्वारे नव्हे तर कालव्याद्वारे पाणी न्यावे यावर कळवणकर ठाम आहेत.

टॅग्स :DamधरणWaterपाणीGovernmentसरकार