शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

कळवणला सर्वपक्षीय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:23 IST

सटाणा शहरासाठी पुनंद धरणातून मंजूर करण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून, कळवण व देवळा तालुक्यातील जनतेचा व पुनंद खोºयातील शेतकऱ्यांचा या योजनेला सुरुवातीपासून विरोध असल्याने शासनाने या प्रश्नी जनतेच्या भावनांचा विचार करावा,

कळवण : सटाणा शहरासाठी पुनंद धरणातून मंजूर करण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून, कळवण व देवळा तालुक्यातील जनतेचा व पुनंद खोºयातील शेतकऱ्यांचा या योजनेला सुरुवातीपासून विरोध असल्याने शासनाने या प्रश्नी जनतेच्या भावनांचा विचार करावा, नाही तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी येथे आयोजित बैठकीत दिला. पुढील रणनीती ठरविण्यासाठी शनिवार, दि. १ जून पुनंद धरण कार्यस्थळावर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.पुनंद जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकºयांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार जे.पी.गावित,जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जलवाहिनीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष देविदास पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शैलेश पवार उपस्थित होते.ज्या शेतकºयांनी धरणासाठी जमिनी दिल्या त्यांच्या उद्देशाकडे दुर्लक्ष केले जात असून एकजुटीने लढा उभारण्याची गरज असल्याचे मत आमदार जे.पी.गावित यांनी व्यक्त केले. पुनंद खोºयातीलच नव्हे तर परीसरातल्या सर्वच शेतकºयांनी आणि आदिवासी बांधवांनी हक्काचे पाणी वाचवण्यासाठी पुढे यायला हवे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केले. यापूर्वी आंदोलने करूनही पाणीयोजनेचा घाट घातला जात असून, कळवणकरांची पाणी देण्याला नव्हे तर पाइपलाइनला असलेल्या विरोधाची भूमिका शासन व प्रशासनाने समजून घ्यावी असे मत जलवाहिनीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष देवीदास पवार यांनी व्यक्त केले.बाजार समिती सभापती धनंजय पवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कारभारी आहेर, हेमंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.कालव्याद्वारे पाणी न्यावेसटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी राज्य शासनाने५५ कोटी रु पयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मात्र कळवणकरांच्या विरोधामुळे अद्यापपर्यंत या योजनेचे काम सुरु होऊ शकलेले नाही. हे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाºयांना दिल्याने काम सुरु होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र कळवण तालुक्यातील शेतकºयांचा विरोध कायम असून, पाइपलाइनद्वारे नव्हे तर कालव्याद्वारे पाणी न्यावे यावर कळवणकर ठाम आहेत.

टॅग्स :DamधरणWaterपाणीGovernmentसरकार