शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

कळवणला सर्वपक्षीय बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:23 IST

सटाणा शहरासाठी पुनंद धरणातून मंजूर करण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून, कळवण व देवळा तालुक्यातील जनतेचा व पुनंद खोºयातील शेतकऱ्यांचा या योजनेला सुरुवातीपासून विरोध असल्याने शासनाने या प्रश्नी जनतेच्या भावनांचा विचार करावा,

कळवण : सटाणा शहरासाठी पुनंद धरणातून मंजूर करण्यात आलेल्या जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून, कळवण व देवळा तालुक्यातील जनतेचा व पुनंद खोºयातील शेतकऱ्यांचा या योजनेला सुरुवातीपासून विरोध असल्याने शासनाने या प्रश्नी जनतेच्या भावनांचा विचार करावा, नाही तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी येथे आयोजित बैठकीत दिला. पुढील रणनीती ठरविण्यासाठी शनिवार, दि. १ जून पुनंद धरण कार्यस्थळावर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.पुनंद जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकºयांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार जे.पी.गावित,जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जलवाहिनीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष देविदास पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शैलेश पवार उपस्थित होते.ज्या शेतकºयांनी धरणासाठी जमिनी दिल्या त्यांच्या उद्देशाकडे दुर्लक्ष केले जात असून एकजुटीने लढा उभारण्याची गरज असल्याचे मत आमदार जे.पी.गावित यांनी व्यक्त केले. पुनंद खोºयातीलच नव्हे तर परीसरातल्या सर्वच शेतकºयांनी आणि आदिवासी बांधवांनी हक्काचे पाणी वाचवण्यासाठी पुढे यायला हवे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केले. यापूर्वी आंदोलने करूनही पाणीयोजनेचा घाट घातला जात असून, कळवणकरांची पाणी देण्याला नव्हे तर पाइपलाइनला असलेल्या विरोधाची भूमिका शासन व प्रशासनाने समजून घ्यावी असे मत जलवाहिनीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष देवीदास पवार यांनी व्यक्त केले.बाजार समिती सभापती धनंजय पवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कारभारी आहेर, हेमंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.कालव्याद्वारे पाणी न्यावेसटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी राज्य शासनाने५५ कोटी रु पयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. मात्र कळवणकरांच्या विरोधामुळे अद्यापपर्यंत या योजनेचे काम सुरु होऊ शकलेले नाही. हे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाºयांना दिल्याने काम सुरु होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मात्र कळवण तालुक्यातील शेतकºयांचा विरोध कायम असून, पाइपलाइनद्वारे नव्हे तर कालव्याद्वारे पाणी न्यावे यावर कळवणकर ठाम आहेत.

टॅग्स :DamधरणWaterपाणीGovernmentसरकार