शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 01:20 IST

मराठवाड्याला पाणी देण्यास भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला असून, प्रसंगी सर्वपक्षीय लढा उभारण्याची तयारी केली आहे. जायकवाडीतील वापरण्यायोग्य साठ्यासाठी सात टीएमसी पाण्याची गरज असून, गतवेळचा अनुभव बघता हे पाणी नाशिकमधून सोडले तरी बाष्पीभवनामुळे मराठवाड्यात पोहचणे कठीण आहे. त्यामुळे जायकवाडीच्या मृत पाणी साठ्यातून मराठवाड्याला पाणी द्यावे, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.

नाशिक : मराठवाड्याला पाणी देण्यास भाजपा आमदारदेवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला असून, प्रसंगी सर्वपक्षीय लढा उभारण्याची तयारी केली आहे. जायकवाडीतील वापरण्यायोग्य साठ्यासाठी सात टीएमसी पाण्याची गरज असून, गतवेळचा अनुभव बघता हे पाणी नाशिकमधून सोडले तरी बाष्पीभवनामुळे मराठवाड्यात पोहचणे कठीण आहे. त्यामुळे जायकवाडीच्या मृत पाणी साठ्यातून मराठवाड्याला पाणी द्यावे, अशी मागणीही फरांदे यांनी केली आहे.  जायकवाडी धरणातील उपयुक्त साठ्यासाठी पाणी पडत असल्याने मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार नाशिक आणि नगरमधून पाण्याची मागणी होत आहे. त्यासंदर्भात औरंगाबाद येथे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक झाली आणि १२ टीएमसी पाणी सोडावे, अशी चर्चा करण्यात आली. यासंदर्भात, आमदार फरांदे यांनी पाणी सोडण्यास विरोध केला आहे. मुळातच जायकवाडी धरणाचा मृत पाणी साठा २६ टीएमसी इतका आहे. राज्यातील कोणत्याही धरणाचा इतका मृत साठा नाही. यावर्षी जायकवाडीच्या जलाशयात खरिपाचे पाणी धरून ४३.५ टीएमसी पाणी उपलब्ध झाले आहे. धरणाचा मृत साठ्याचा विचार केला तर धरणात ६९.५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. ते उद्योग आणि शेतीसाठी मुबलक आहे.परंतु खरीप हंगामातील १६ टीएमसी वापर झाल्याने सध्या ११ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन असले तरी मुळात गेल्यावर्षी अशाच प्रकारे दहा टीएमसी पाणी नाशिकमधून सोडल्यानंतर ६० टक्के पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने पुरसे पाणी पोहोचले नव्हते त्यामुळे आता तरी सात टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचणे शक्य होणार नाही. यामुळे आता मृत साठ्यातील पाणीच वापरावे, अशी मागणी फरांदे यांनी केली आहे.जायकवाडी धरणातून यापूर्वीही गरजेनुसार मृत साठ्यातील पाण्याचा वापर करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर आताही मृत पाणी साठ्याचा वापर करावा, अशी मागणी प्रा. फरांदे यांनी केली आहे. जायकवाडी धरणात मृत साठ्याप्रमाणे कॉरीओव्हर स्टोअरेज नाशिकच्या गंगापूर धरण्यात यावे यासाठी महाराष्टÑ जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाला प्रा. फरांदे यांनी पत्र दिले आहे.

टॅग्स :WaterपाणीMLAआमदारDevyani Farandeदेवयानी फरांदेgangapur damगंगापूर धरण