शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
4
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
5
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
6
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
7
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
8
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
9
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
10
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
11
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
12
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
13
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
14
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
15
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
16
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
17
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
18
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
19
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
20
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!

गंगापूर समूहातील चारही धरणे १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:47 IST

यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे.

नाशिक : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात असलेल्या चारही धरणांचा साठा १०० टक्के इतका झाल्याने धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्यामुळे रात्रीतून विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.नाशिक शहराची तहान भागविणाºया गंगापूर धरण समूहात गंगापूर धरणासह कश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी या धरणांचा समावेश होतो. गंगापूर धरण समूहातील अन्य धरणांच्या तुलनेत सर्वांत मोठे धरण असून उर्वरित तीनही धरणे मध्यम प्रकल्पातील आहे. सद्यपरिस्थितीतही चारही धरणे शंभर टक्केभरली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असून, शेतीची कामेदेखील सुरू आहेत. मागील आठवड्यातच १०० टक्के झालेले धरण सलग दहा दिवसांनंतरही कायम असून, शनिवारपासूनच पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी विसर्ग अधिक वाढविण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आली आहे.गोदावरी नदीवर असलेल्या गंगापूर, कश्यपी आणि गौतमी गोदावरी या तीनही धरणांचा साठा १०० टक्केअसून, आळंदीदेखील १०० टक्के भरले आहे. समूहातील या चारही धरणांमध्ये सध्या १०,३२० दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मागीलवर्षी हा साठा १०,१४२ इतकाच दलघफू होता. दरम्यान, जिल्ह्यातील २४ धरणांमधील पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहचला आहे. मागीलवर्षी जिल्ह्याचा साठा ८० टक्के इतकाच होता.दरम्यान, हवामान खात्याने आगामी ४८ तासात उत्तरमध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिल्याने पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.नांदूरमधमेश्वरमधून विसर्गआॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदूरमधमेश्वर धरण जिल्ह्यात सर्वांत प्रथम १०० टक्के भरल्याने त्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता. या हंगामात नांदूरमधमेश्वरमधील हे विक्रमी विसर्ग ठरला. आता पावसाला पुन्हा सुरूवात झाल्याने जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ झाल्यामुळे विसर्ग सुरू झाला आहे. त्यातही नांदूरमधमेश्वरमधून सर्वाधिक ७,६२४ क्यूसेक इतका विसर्ग केला जाता आहे.१४ धरणांचा साठा १०० टक्केवरुणराजाची भरभरून कृपादृष्टी झाल्याने जिल्ह्यातील धरणे तृप्त झाली आहेत. जवळपास सर्वच धरणांचा साठा हा ९० टक्केच्या पुढे असून, २४ पैकी १४ धरणांमधील पाणीसाठा, तर १०० टक्के इतका आहे. गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, करंजवण, वाघाड, ओझरखेड, दारणा, भावली, तीसगाव, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, हरणबारी, केळझर या धरणांचा पाणीसाठा १०० टक्के इतका आहे. सद्यस्थितीत १५ प्रकल्पांमधून थोड्याफार प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.जिल्ह्यात मोठे मध्यम असे एकूण २४ प्रकल्प आहेत. त्यामध्ये सात मोठे प्रकल्प असून, १७ मध्यंम प्रकल्पाची संख्या आहे. यासर्व प्रकल्पांची क्षमता ६५८१४ संकल्पित पाणीसाठा असून, मोठ्या प्रकल्पांमध्ये ४८००४ इतकी साठवण क्षमता आहे.

टॅग्स :Rainपाऊसgangapur damगंगापूर धरण