शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
2
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
3
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
5
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
6
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
7
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
8
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
9
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
10
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
11
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
12
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
13
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
14
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
15
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
16
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
17
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
18
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
19
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

गंगापूर समूहातील चारही धरणे १०० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:47 IST

यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे.

नाशिक : यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात असलेल्या चारही धरणांचा साठा १०० टक्के इतका झाल्याने धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्यामुळे रात्रीतून विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.नाशिक शहराची तहान भागविणाºया गंगापूर धरण समूहात गंगापूर धरणासह कश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी या धरणांचा समावेश होतो. गंगापूर धरण समूहातील अन्य धरणांच्या तुलनेत सर्वांत मोठे धरण असून उर्वरित तीनही धरणे मध्यम प्रकल्पातील आहे. सद्यपरिस्थितीतही चारही धरणे शंभर टक्केभरली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असून, शेतीची कामेदेखील सुरू आहेत. मागील आठवड्यातच १०० टक्के झालेले धरण सलग दहा दिवसांनंतरही कायम असून, शनिवारपासूनच पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी विसर्ग अधिक वाढविण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आली आहे.गोदावरी नदीवर असलेल्या गंगापूर, कश्यपी आणि गौतमी गोदावरी या तीनही धरणांचा साठा १०० टक्केअसून, आळंदीदेखील १०० टक्के भरले आहे. समूहातील या चारही धरणांमध्ये सध्या १०,३२० दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मागीलवर्षी हा साठा १०,१४२ इतकाच दलघफू होता. दरम्यान, जिल्ह्यातील २४ धरणांमधील पाणीसाठा ९३ टक्क्यांवर पोहचला आहे. मागीलवर्षी जिल्ह्याचा साठा ८० टक्के इतकाच होता.दरम्यान, हवामान खात्याने आगामी ४८ तासात उत्तरमध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिल्याने पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.नांदूरमधमेश्वरमधून विसर्गआॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदूरमधमेश्वर धरण जिल्ह्यात सर्वांत प्रथम १०० टक्के भरल्याने त्या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता. या हंगामात नांदूरमधमेश्वरमधील हे विक्रमी विसर्ग ठरला. आता पावसाला पुन्हा सुरूवात झाल्याने जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ झाल्यामुळे विसर्ग सुरू झाला आहे. त्यातही नांदूरमधमेश्वरमधून सर्वाधिक ७,६२४ क्यूसेक इतका विसर्ग केला जाता आहे.१४ धरणांचा साठा १०० टक्केवरुणराजाची भरभरून कृपादृष्टी झाल्याने जिल्ह्यातील धरणे तृप्त झाली आहेत. जवळपास सर्वच धरणांचा साठा हा ९० टक्केच्या पुढे असून, २४ पैकी १४ धरणांमधील पाणीसाठा, तर १०० टक्के इतका आहे. गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, करंजवण, वाघाड, ओझरखेड, दारणा, भावली, तीसगाव, वालदेवी, नांदूरमधमेश्वर, हरणबारी, केळझर या धरणांचा पाणीसाठा १०० टक्के इतका आहे. सद्यस्थितीत १५ प्रकल्पांमधून थोड्याफार प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.जिल्ह्यात मोठे मध्यम असे एकूण २४ प्रकल्प आहेत. त्यामध्ये सात मोठे प्रकल्प असून, १७ मध्यंम प्रकल्पाची संख्या आहे. यासर्व प्रकल्पांची क्षमता ६५८१४ संकल्पित पाणीसाठा असून, मोठ्या प्रकल्पांमध्ये ४८००४ इतकी साठवण क्षमता आहे.

टॅग्स :Rainपाऊसgangapur damगंगापूर धरण