शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पाणी सोडल्यानंतर अधिकाऱ्यांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:50 IST

नाशिक : येवला, मनमाडसह पाणीपुरवठा योजनांसाठी पालखेड धरणातून आवर्तन पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी सोडले असले तरी, निफाड, येवला तालुक्यांत पावसाने दिलेली ओढ व दुबार पेरणीचे उभे ठाकलेले संकट पाहता कालव्यावाटे जाणाºया या पाण्याची वाटेत चोरी होण्याची भीती आता अधिकाºयांना वाटू लागली असून, चोरी थांबविण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे.

ठळक मुद्देपालखेडचे आवर्तन पाटबंधारे खात्याला पाणीचोरीची भीती

नाशिक : येवला, मनमाडसह पाणीपुरवठा योजनांसाठी पालखेड धरणातून आवर्तन पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी सोडले असले तरी, निफाड, येवला तालुक्यांत पावसाने दिलेली ओढ व दुबार पेरणीचे उभे ठाकलेले संकट पाहता कालव्यावाटे जाणाºया या पाण्याची वाटेत चोरी होण्याची भीती आता अधिकाºयांना वाटू लागली असून, चोरी थांबविण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे.पालखेडमधून डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची जेव्हा जेव्हा वेळ आली, त्यावेळी पाटबंधारे, जिल्हा प्रशासन व पोलीस खात्याकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यातून सुटणारे पाणी वाटेत नाशिक, निफाड या तालुक्यांतून पुढे येवला व नंतर मनमाडपर्यंत पोहोचविले जाते.अशा परिस्थितीत या पाण्याची वाटेत चोरी केली जात असल्याचे आजवरची अनेक उदाहरणे आहेत. कालव्यात जमिनीखाली डोंगळे टाकून तसेच पाइपलाइनच्या माध्यमातून शेतकºयांकडून चार ते पाच किलोमीटरपर्यंत पंपाच्या सहाय्याने पाणी नेले जाते. त्यामुळे जेव्हा पाणी सोडण्याची वेळ येते, तत्पूर्वीच मोठी खबरदारी घेत, कालव्याच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करणे, पाणीचोरी रोखण्यासाठी पोलीस व पाटकºयांची गस्त ठेवणे, कालव्यातील डोंगळे जेसीबीच्या सहाय्याने उद््ध्वस्त करणे आदी उपाययोजना केली जाते. परंतु १ आॅगस्ट रोजी पालखेड धरणातून ४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यापूर्वी पाटबंधारे खाते, महसूल व पोलीस खात्याने कोणतीही उपाययोजना केली नाही. गेल्या आठवड्यात पाटबंधारे खात्याने जिल्हाधिकाºयांकडून पाणी सोडण्याची अनुमती घेतली. येवला, मनमाड शहर, रेल्वे, पाणीपुरवठा योजनांसाठी सदरचे पाणी सोडण्यात आले असून, दोन दिवसांत सदरचे पाणी सुमारे ५० किलो मीटरपर्यंत पोहोचल्यानंतर पाटबंधारे खात्याला उपाययोजनांची आठवण झाली आहे.जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी, सिन्नर, निफाड, नांदगाव या तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली आहे. निफाड तालुक्यात तर जेमतेम पाऊस झाला असून, शेतकºयांनी पावसाच्या भरवश्यावर पीक पेरणी केली असली तरी, आता पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शेतकºयांना पिके जगविण्यासाठी पाण्याची नितांत निकड भासू लागली असून, अशा परिस्थितीत पालखेडमधून पाणी सोडण्यात आल्याने वाटेत पाण्याची चोरी होण्याची भीती पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांना भेडसावू लागली आहे. त्यासाठी आता त्यांनी डोंगळे काढणे, पाणीचोरीवर पोलिसांची गस्त ठेवण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी