शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
3
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
4
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
5
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
6
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
7
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
8
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
9
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
10
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
11
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
12
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
13
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
14
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
15
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
16
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
17
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
18
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
19
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
20
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल

पाणी सोडल्यानंतर अधिकाऱ्यांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:50 IST

नाशिक : येवला, मनमाडसह पाणीपुरवठा योजनांसाठी पालखेड धरणातून आवर्तन पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी सोडले असले तरी, निफाड, येवला तालुक्यांत पावसाने दिलेली ओढ व दुबार पेरणीचे उभे ठाकलेले संकट पाहता कालव्यावाटे जाणाºया या पाण्याची वाटेत चोरी होण्याची भीती आता अधिकाºयांना वाटू लागली असून, चोरी थांबविण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे.

ठळक मुद्देपालखेडचे आवर्तन पाटबंधारे खात्याला पाणीचोरीची भीती

नाशिक : येवला, मनमाडसह पाणीपुरवठा योजनांसाठी पालखेड धरणातून आवर्तन पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी सोडले असले तरी, निफाड, येवला तालुक्यांत पावसाने दिलेली ओढ व दुबार पेरणीचे उभे ठाकलेले संकट पाहता कालव्यावाटे जाणाºया या पाण्याची वाटेत चोरी होण्याची भीती आता अधिकाºयांना वाटू लागली असून, चोरी थांबविण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे.पालखेडमधून डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची जेव्हा जेव्हा वेळ आली, त्यावेळी पाटबंधारे, जिल्हा प्रशासन व पोलीस खात्याकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यातून सुटणारे पाणी वाटेत नाशिक, निफाड या तालुक्यांतून पुढे येवला व नंतर मनमाडपर्यंत पोहोचविले जाते.अशा परिस्थितीत या पाण्याची वाटेत चोरी केली जात असल्याचे आजवरची अनेक उदाहरणे आहेत. कालव्यात जमिनीखाली डोंगळे टाकून तसेच पाइपलाइनच्या माध्यमातून शेतकºयांकडून चार ते पाच किलोमीटरपर्यंत पंपाच्या सहाय्याने पाणी नेले जाते. त्यामुळे जेव्हा पाणी सोडण्याची वेळ येते, तत्पूर्वीच मोठी खबरदारी घेत, कालव्याच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करणे, पाणीचोरी रोखण्यासाठी पोलीस व पाटकºयांची गस्त ठेवणे, कालव्यातील डोंगळे जेसीबीच्या सहाय्याने उद््ध्वस्त करणे आदी उपाययोजना केली जाते. परंतु १ आॅगस्ट रोजी पालखेड धरणातून ४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यापूर्वी पाटबंधारे खाते, महसूल व पोलीस खात्याने कोणतीही उपाययोजना केली नाही. गेल्या आठवड्यात पाटबंधारे खात्याने जिल्हाधिकाºयांकडून पाणी सोडण्याची अनुमती घेतली. येवला, मनमाड शहर, रेल्वे, पाणीपुरवठा योजनांसाठी सदरचे पाणी सोडण्यात आले असून, दोन दिवसांत सदरचे पाणी सुमारे ५० किलो मीटरपर्यंत पोहोचल्यानंतर पाटबंधारे खात्याला उपाययोजनांची आठवण झाली आहे.जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी, सिन्नर, निफाड, नांदगाव या तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली आहे. निफाड तालुक्यात तर जेमतेम पाऊस झाला असून, शेतकºयांनी पावसाच्या भरवश्यावर पीक पेरणी केली असली तरी, आता पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. शेतकºयांना पिके जगविण्यासाठी पाण्याची नितांत निकड भासू लागली असून, अशा परिस्थितीत पालखेडमधून पाणी सोडण्यात आल्याने वाटेत पाण्याची चोरी होण्याची भीती पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांना भेडसावू लागली आहे. त्यासाठी आता त्यांनी डोंगळे काढणे, पाणीचोरीवर पोलिसांची गस्त ठेवण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी