विषारी दारू दुर्घटनेनंतर उत्पादन शुल्क विभाग सक्रिय
By Admin | Updated: June 23, 2015 01:31 IST2015-06-23T01:31:13+5:302015-06-23T01:31:36+5:30
विषारी दारू दुर्घटनेनंतर उत्पादन शुल्क विभाग सक्रिय

विषारी दारू दुर्घटनेनंतर उत्पादन शुल्क विभाग सक्रिय
नाशिक : मुंबईतील मालाड येथील विषारी दारू दुर्घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी अधिक सतर्क झाले आहेत़ राज्यभरातील अधिकाऱ्यांनी धडक कारवाईस सुरुवात केली असून, नाशिक जिल्'ातही अधीक्षक आऱ जी. आवळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दिवसांपासून अवैध मद्यसाठा, मद्यनिर्मिती, मद्यवाहतूक याविरोधात धाड व छापा सत्र सुरू झाले आहे़ गेल्या चार दिवसांत अधिकाऱ्यांनी जिल्हाभरात ४४ गुन्हे दाखल करून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ मुंबईतील मालवण (मालाड) येथे विषारी दारू सेवन केल्यामुळे ९८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे़ या घटनेमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने संपूर्ण राज्यभरात धडक मोहीम सुरू केली आहे़ राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबक, सिन्नर, येवला, कळवण, सुरगाणा, पेठ, मालेगाव येथील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सहा, तर भरारी पथकाच्या तीन अशा नऊ पथकांनी १८ ते २१ जून या चार दिवसांत जिल्हाभरात धडक कारवाई केली़ या पथकांनी देशी दारू, बिअर, विदेशी दारू व गावठी दारुच्या अड्ड्यांवर धाडी टाकून ते नष्ट केले़ याबरोबरच गावठी दारू तयार करण्यासाठीचे हजारो लिटर रसायनही नष्ट केले आहेत़ यामध्ये गावठी दारू तयार करण्याचे केंद्र असलेल्या घोटी व पंचवटीतील वाघाडी येथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते़ दरम्यान, ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधीक्षक आऱ जी़ आवळे, उपअधीक्षक एस़ आऱ कदम यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)