शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

दीड महिन्यानंतरही प्रवेशाचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:08 IST

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्राथमिक शाळा १५ जूनलाच सुरू झाल्या असून, शाळा सुरू होऊन सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटत आल्यानंतरही आरटीई प्रवेशाचा घोळ सुरू आहे.

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्राथमिक शाळा १५ जूनलाच सुरू झाल्या असून, शाळा सुरू होऊन सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटत आल्यानंतरही आरटीई प्रवेशाचा घोळ सुरू आहे. आरटीई प्रवेशाची तिसरी सोडत जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सुरुवातीला १८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या विहित मुदतीत अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण होऊ न शकल्याने शिक्षण विभागाने प्रवेशासाठी २४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार २२२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत, तर नाशिकसह राज्यभरात ७५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.आरटीई प्रवेशासाठी पडताळणी समितीकडे जाऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत नाशिक शहर व जिल्ह्यातील ४ हजार २२२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. दरवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणारी ही प्रक्रिया यंदा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरू झाली. त्यानंतर एप्रिलच्या दुसºया आठवड्यात पहिली सोडत जाहीर करण्यात आली. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश घेण्यास दोनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यातही महिनाभराचा कालावधी गेल्याने पहिल्या सोडतीनंतर तब्बल दोन महिने उलटल्यानंतर दुसरी सोडत जाहीर करण्यात आली. आरटीईच्या दुसºया सोडतीत ३६५ शाळांत दोन हजार ३७ मुलांची निवड झाली होती. त्यातील १ हजार १८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. प्रवेशापासून हजारो विद्यार्थी वंचित राहिल्याने तिसरी सोडत जाहीर करण्यात आली. त्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना एमएसएसद्वारे तसेच संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली. पडताळणी समितीकडे जाऊन २० जुलैपर्यंत सुमारे ४ हजार २२२ विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे.अर्ज अडीच लाख प्रवेश केवळ ७५ हजारआरटीईच्या राज्यभरात ९ हजार १९५ शाळा असून, त्यात १ लाख १६ हजार ८०८ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी तब्बल २ लाख ४५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील पहिल्या तिन्ही फेऱ्यांमध्ये केवळ १ लाख २४ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यापैकी केवळ ७५ हजार ६४९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी