शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
3
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
4
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
5
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
6
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
7
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
8
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
9
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
10
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
11
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
12
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
13
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
14
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
15
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
16
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
17
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
18
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
19
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
20
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार

दीड महिन्यानंतरही प्रवेशाचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:08 IST

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्राथमिक शाळा १५ जूनलाच सुरू झाल्या असून, शाळा सुरू होऊन सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटत आल्यानंतरही आरटीई प्रवेशाचा घोळ सुरू आहे.

नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्राथमिक शाळा १५ जूनलाच सुरू झाल्या असून, शाळा सुरू होऊन सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटत आल्यानंतरही आरटीई प्रवेशाचा घोळ सुरू आहे. आरटीई प्रवेशाची तिसरी सोडत जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सुरुवातीला १८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या विहित मुदतीत अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण होऊ न शकल्याने शिक्षण विभागाने प्रवेशासाठी २४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार २२२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत, तर नाशिकसह राज्यभरात ७५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.आरटीई प्रवेशासाठी पडताळणी समितीकडे जाऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत नाशिक शहर व जिल्ह्यातील ४ हजार २२२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. दरवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होणारी ही प्रक्रिया यंदा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात सुरू झाली. त्यानंतर एप्रिलच्या दुसºया आठवड्यात पहिली सोडत जाहीर करण्यात आली. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश घेण्यास दोनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यातही महिनाभराचा कालावधी गेल्याने पहिल्या सोडतीनंतर तब्बल दोन महिने उलटल्यानंतर दुसरी सोडत जाहीर करण्यात आली. आरटीईच्या दुसºया सोडतीत ३६५ शाळांत दोन हजार ३७ मुलांची निवड झाली होती. त्यातील १ हजार १८८ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. प्रवेशापासून हजारो विद्यार्थी वंचित राहिल्याने तिसरी सोडत जाहीर करण्यात आली. त्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांना एमएसएसद्वारे तसेच संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली. पडताळणी समितीकडे जाऊन २० जुलैपर्यंत सुमारे ४ हजार २२२ विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे.अर्ज अडीच लाख प्रवेश केवळ ७५ हजारआरटीईच्या राज्यभरात ९ हजार १९५ शाळा असून, त्यात १ लाख १६ हजार ८०८ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी तब्बल २ लाख ४५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील पहिल्या तिन्ही फेऱ्यांमध्ये केवळ १ लाख २४ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यापैकी केवळ ७५ हजार ६४९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी