शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

देवभेटीच्या सोहळ्यानंतर मºहळकरांचा पांगरी मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:55 IST

सिन्नर : गाव बंद करून जेजुरीला कुलदैवतेच्या दर्शनासाठी गेलेल्या मºहळकरांचे पाच दिवसांनंतर मंगळवारी रात्री पांगरी येथे आगमन झाले. तत्पूर्वी सुरेगाव व मºहळ मार्गे आलेल्या पालखीचे ग्रामस्थांनी भक्तिभावाने स्वागत करीत पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

ठळक मुद्देजेजुरीची वारी : पालखीचे जोरदार स्वागतमºहळकरांचे पाच दिवसांनंतर मंगळवारी रात्री पांगरी येथे आगमन झाले

सिन्नर : गाव बंद करून जेजुरीला कुलदैवतेच्या दर्शनासाठी गेलेल्या मºहळकरांचे पाच दिवसांनंतर मंगळवारी रात्री पांगरी येथे आगमन झाले. तत्पूर्वी सुरेगाव व मºहळ मार्गे आलेल्या पालखीचे ग्रामस्थांनी भक्तिभावाने स्वागत करीत पालखीची मिरवणूक काढण्यात आली.मºहळ खुर्द, मºहळ बुद्रुक व सुरेगाव या गावांतील ग्रामस्थ घरांना कुलूप लावून गावातील मंदिरातील देव घेऊन जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांचे मंगळवारी सुरेगाव व त्यानंतर पांगरी येथे आगमन झाले. ‘याचि देही याचि डोळा’ देवभेटीचा सोहळा पाहण्याचा योग आल्याने मºहळकरांच्या डोळ्यात कृतार्थतेचे भाव दिसून येत होते.शनिवारी (दि. १२) आळंदी येथे मुक्काम केल्यानंतर शनिवारी व रविवारी मºहळकरांचा जेजुरीत मुक्काम झाला होता. या दिवशी बरोबर नेलेल्या रथामध्ये पालखीत घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबारायाच्या ‘श्री’च्या मूर्तीला कºहा नदीच्या घाटावर सनई-चौघड्याच्या मंगल सुरात गंगास्नान घातल्यानंतर पालखी वाजतगाजत कडेपठारावर नेण्यात आली होती. जेजुरी गडावर पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर मºहळचे कुलदैवत मूळ पीठाला भेटल्यानंतर हजारो भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करीत दर्शन घेतले. हा देवभेटीचा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.त्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. सोमवारी (दि. १४) देहू येथे पालखीचा मुक्काम झाला. मंगळवारी सकाळी पालखी व वाहनाचा ताफा देहू येथून मºहळकडे परतीच्या प्रवासाला निघाला होता. मºहळमार्गे पालखी पांगरीकडे मुक्कामासाठी रवाना झाली. बुधवारी (दि. १६) सकाळी पांगरी व मºहळ येथे मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवार, दि. ११ रोजी मºहळ खुर्द, मºहळ बुद्रुक व सुरेगाव येथील सुमारे आठ हजार भाविक कुलदैवताच्या दर्शनासाठी सुमारे ८०० वाहनांच्या ताफ्यासह जेजुरीला गेले होते. या गावातील ग्रामस्थ कधी एकट्या- दुकट्याने किंवा कुटुंबासह जेजुरीला जात नाहीत, तर सर्व ग्रामस्थ एकाच वेळी आपल्या घरांना टाळा ठोकून पालखीची देवभेट घडविण्यासाठी जेजुरीला जात असतात. गेल्या अनेक वर्षांपासून व पिढ्यांपासून मºहळकरांनी कुलदैवतेच्या भेटीची आपली ही आगळीवेगळी परंपरा जपली आहे.