शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

अखेर खान्देश मिलच्या कामगारांना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:17 IST

३३ वर्षांपूर्वी बंद पडून दिवाळखोरीत निघालेल्या जळगाव येथील खान्देश मिलमधील काही कामगारांना त्यांच्या कामगार असल्याच्या पुराव्याअभावी कायदेशीर देणी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. कामगार आयुक्त कार्यालयाने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांना न्याय मिळवून दिला. विशेषत: सहायक कामगार आयुक्त रविराज इळवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.

गोकुळ सोनवणे ।सातपूर : ३३ वर्षांपूर्वी बंद पडून दिवाळखोरीत निघालेल्या जळगाव येथील खान्देश मिलमधील काही कामगारांना त्यांच्या कामगार असल्याच्या पुराव्याअभावी कायदेशीर देणी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. कामगार आयुक्त कार्यालयाने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांना न्याय मिळवून दिला. विशेषत: सहायक कामगार आयुक्त रविराज इळवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.  जळगाव येथील सर्वांत मोठा उद्योग समजला जाणाºया खान्देश मिलमध्ये अडीच हजारपेक्षा अधिक कामगार काम करीत होते. ३३ वर्षांपूर्वी अचानक हा उद्योग बंद पडला. दिवाळखोरीत निघालेल्या या उद्योगावर अवसायकाची नेमणूक करण्यात आली होती. मिलमधील कामगारांनी देणी मिळावी म्हणून कामगारांचे नेतृत्व करणाºया राष्ट्रीय गिरणी कामगार संघाने कामगार आयुक्त, कामगार न्यायालयात धाव घेतली होती. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर तब्बल ३१ वर्षांनंतर म्हणजेच मे २०१६ पासून न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांना त्यांची ग्रॅच्युईटी आणि इतर कायदेशीर देणी मिळण्यास सुरु वात झाली.  अवसायकांनी मंजूर केलेली दावा रक्कम मिळण्यासाठी नाशिक विभागाचे सहायक कामगार आयुक्त रविराज इळवे यांचेकडे जवळपास दोन हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १७५० दावे (अर्ज) निकाली काढून संबंधित कामगार अथवा त्यांच्या वारसांना पाच कोटी रु पयांच्या वर देणी वाटप करण्यात आली आहेत. १७५० कामगारांना त्यांची देणी मिळालीत. परंतु उर्वरित सुमारे साडेचारशे कामगार मयत आणि दोनशे कामगारांकडे ते कामगार असल्याचा पुरावा नसल्याने त्यांना देणी मिळण्यासाठी अडचणी येत होत्या. अशा कामगारांनी सहायक कामगार आयुक्त रविराज इळवे यांचेकडे कैफियत मांडली.  पुराव्याअभावी कामगारांची रखडलेली देणी मिळवून देण्यासाठी सहायक कामगार आयुक्त इळवे यांनी जळगाव येथील राज्य कामगार विमा रु ग्णालयाशी सम्पर्कसाधून सदर कामगारांचे काही पुरावे मिळतात का याची पडताळणी केली.  इळवे यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी रु ग्णालयात मदतीला पाठवून ३३ वर्षांपूर्वीचे रेकॉर्डची तपासणी केली. त्या तपासणीत ११७ कामगारांचे पुरावे मिळालेत. ते पुरावे न्यायालयात सादर करून त्यांना त्यांची कायदेशीर देणी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. यात कामगार संघटनेचे सरचिटणीस असलेले एस. आर. पाटील यांचाही दावा पुराव्याअभावी प्रलंबित होता. त्यांनाही पुरावा मिळवून दिला.शासकीय कार्यालये आणि संबंधित अधिकारी यांच्या विषयी लोकांची खूप चांगली भावना नसते. परंतु खान्देश मिल कामगारांना वेगळा अनुभव आला आहे. जळगाव येथील ईएसआयसी रु ग्णालय आणि नाशिक कामगार उपायुक्त कार्यालय या दोन शासकीय कार्यालयातील समन्वयामुळे कामगारांना ३३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कायदेशीर देणी मिळवून देण्यात यश मिळाले आहे.  - रविराज इळवे, सहायक कामगार आयुक्त, नाशिक.