शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

अखेर खान्देश मिलच्या कामगारांना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:17 IST

३३ वर्षांपूर्वी बंद पडून दिवाळखोरीत निघालेल्या जळगाव येथील खान्देश मिलमधील काही कामगारांना त्यांच्या कामगार असल्याच्या पुराव्याअभावी कायदेशीर देणी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. कामगार आयुक्त कार्यालयाने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांना न्याय मिळवून दिला. विशेषत: सहायक कामगार आयुक्त रविराज इळवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.

गोकुळ सोनवणे ।सातपूर : ३३ वर्षांपूर्वी बंद पडून दिवाळखोरीत निघालेल्या जळगाव येथील खान्देश मिलमधील काही कामगारांना त्यांच्या कामगार असल्याच्या पुराव्याअभावी कायदेशीर देणी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. कामगार आयुक्त कार्यालयाने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांना न्याय मिळवून दिला. विशेषत: सहायक कामगार आयुक्त रविराज इळवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.  जळगाव येथील सर्वांत मोठा उद्योग समजला जाणाºया खान्देश मिलमध्ये अडीच हजारपेक्षा अधिक कामगार काम करीत होते. ३३ वर्षांपूर्वी अचानक हा उद्योग बंद पडला. दिवाळखोरीत निघालेल्या या उद्योगावर अवसायकाची नेमणूक करण्यात आली होती. मिलमधील कामगारांनी देणी मिळावी म्हणून कामगारांचे नेतृत्व करणाºया राष्ट्रीय गिरणी कामगार संघाने कामगार आयुक्त, कामगार न्यायालयात धाव घेतली होती. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर तब्बल ३१ वर्षांनंतर म्हणजेच मे २०१६ पासून न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांना त्यांची ग्रॅच्युईटी आणि इतर कायदेशीर देणी मिळण्यास सुरु वात झाली.  अवसायकांनी मंजूर केलेली दावा रक्कम मिळण्यासाठी नाशिक विभागाचे सहायक कामगार आयुक्त रविराज इळवे यांचेकडे जवळपास दोन हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १७५० दावे (अर्ज) निकाली काढून संबंधित कामगार अथवा त्यांच्या वारसांना पाच कोटी रु पयांच्या वर देणी वाटप करण्यात आली आहेत. १७५० कामगारांना त्यांची देणी मिळालीत. परंतु उर्वरित सुमारे साडेचारशे कामगार मयत आणि दोनशे कामगारांकडे ते कामगार असल्याचा पुरावा नसल्याने त्यांना देणी मिळण्यासाठी अडचणी येत होत्या. अशा कामगारांनी सहायक कामगार आयुक्त रविराज इळवे यांचेकडे कैफियत मांडली.  पुराव्याअभावी कामगारांची रखडलेली देणी मिळवून देण्यासाठी सहायक कामगार आयुक्त इळवे यांनी जळगाव येथील राज्य कामगार विमा रु ग्णालयाशी सम्पर्कसाधून सदर कामगारांचे काही पुरावे मिळतात का याची पडताळणी केली.  इळवे यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी रु ग्णालयात मदतीला पाठवून ३३ वर्षांपूर्वीचे रेकॉर्डची तपासणी केली. त्या तपासणीत ११७ कामगारांचे पुरावे मिळालेत. ते पुरावे न्यायालयात सादर करून त्यांना त्यांची कायदेशीर देणी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. यात कामगार संघटनेचे सरचिटणीस असलेले एस. आर. पाटील यांचाही दावा पुराव्याअभावी प्रलंबित होता. त्यांनाही पुरावा मिळवून दिला.शासकीय कार्यालये आणि संबंधित अधिकारी यांच्या विषयी लोकांची खूप चांगली भावना नसते. परंतु खान्देश मिल कामगारांना वेगळा अनुभव आला आहे. जळगाव येथील ईएसआयसी रु ग्णालय आणि नाशिक कामगार उपायुक्त कार्यालय या दोन शासकीय कार्यालयातील समन्वयामुळे कामगारांना ३३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कायदेशीर देणी मिळवून देण्यात यश मिळाले आहे.  - रविराज इळवे, सहायक कामगार आयुक्त, नाशिक.