शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

Aditya Thackerey: "हे गद्दारांचं सरकार, काही दिवसांतच कोसळणार, लिहून घ्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 14:02 IST

आदित्य यांनी निष्ठा यात्रेनंतर शिवसंवाद यात्रेतून बंडखोर शिवसेना आमदार आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे

नाशिक- शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला शुक्रवारपासून भिवंडीमधून सुरुवात झाली. यावेळी, राजकीय सत्तानाट्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. विशेष म्हणजे आदित्य यांच्या स्वागताला दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हेच उपस्थित होते. त्यानंतर, आज नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन आदित्य यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. नाशिकच्या मनमाड येथूनही आदित्य यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसेच, हे सरकार गद्दारांचं सरकार असल्याचंही ते म्हणाले. 

आदित्य यांनी निष्ठा यात्रेनंतर शिवसंवाद यात्रेतून बंडखोर शिवसेना आमदार आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. भाषण करताना आदित्य ठाकरेंनीएकनाथ शिंदेंसह इतरही बंडखोर आमदारांना सातत्याने गद्दार म्हणायला सुरुवात केली आहे. ठाण्यानंतर आज नाशिकमध्येही त्यांनी आमदारांचा आणि शिंदे-फडणवीस सरकारचा उल्लेख गद्दार असा केला आहे. हे शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असून एकदिवस कोसळणार म्हणजे नक्कीच कोसळणार, असेही आदित्य यांनी म्हटले. 

बंडखोर आमदार सुहास कांदेंच्या प्रश्नाला आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं. गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, गद्दारांनी पहिले उत्तर द्यावं की त्यांनी गद्दारी का केली? असा थेट सवाल त्यांनी केला. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या पाठीत खंजीर खुपसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, गद्दारी का केली हे कळलेच नाही. हे सरकार थोड्याच दिवसात कोसळणार, हे गद्दारांचे सरकार असून नियमबाह्य आणि घटनाबाह्य असल्याचा हल्लाबोल आदित्य यांनी आपल्या भाषणातून केला. तसेच, गद्दारांनी शिवसैनिकांचा आवाज ऐकावा, जो आवाज मतदानाच्या पेटीतून दिसून येईल, असेही ते म्हणाले. 

भिवंडीतूनही एल्गार, सरकार कोसळणार

"मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. कामं घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसारखं यांना आजवर शिवसेनेनं सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेनं दिलं त्याच पक्षाशी गद्दारी केली. या आमदारांनी केलेलं बंड तुम्हाला पटलंय का? असे म्हणत शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून बंडखोरांवर हल्लाबोल केला. यावेळी, शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असे भाकीतही त्यांनी केलं होतं.

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNashikनाशिकEknath Shindeएकनाथ शिंदे