शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

Aditya Thackerey: "हे गद्दारांचं सरकार, काही दिवसांतच कोसळणार, लिहून घ्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 14:02 IST

आदित्य यांनी निष्ठा यात्रेनंतर शिवसंवाद यात्रेतून बंडखोर शिवसेना आमदार आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे

नाशिक- शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला शुक्रवारपासून भिवंडीमधून सुरुवात झाली. यावेळी, राजकीय सत्तानाट्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. विशेष म्हणजे आदित्य यांच्या स्वागताला दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हेच उपस्थित होते. त्यानंतर, आज नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन आदित्य यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. नाशिकच्या मनमाड येथूनही आदित्य यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. तसेच, हे सरकार गद्दारांचं सरकार असल्याचंही ते म्हणाले. 

आदित्य यांनी निष्ठा यात्रेनंतर शिवसंवाद यात्रेतून बंडखोर शिवसेना आमदार आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. भाषण करताना आदित्य ठाकरेंनीएकनाथ शिंदेंसह इतरही बंडखोर आमदारांना सातत्याने गद्दार म्हणायला सुरुवात केली आहे. ठाण्यानंतर आज नाशिकमध्येही त्यांनी आमदारांचा आणि शिंदे-फडणवीस सरकारचा उल्लेख गद्दार असा केला आहे. हे शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असून एकदिवस कोसळणार म्हणजे नक्कीच कोसळणार, असेही आदित्य यांनी म्हटले. 

बंडखोर आमदार सुहास कांदेंच्या प्रश्नाला आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं. गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, गद्दारांनी पहिले उत्तर द्यावं की त्यांनी गद्दारी का केली? असा थेट सवाल त्यांनी केला. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या पाठीत खंजीर खुपसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, गद्दारी का केली हे कळलेच नाही. हे सरकार थोड्याच दिवसात कोसळणार, हे गद्दारांचे सरकार असून नियमबाह्य आणि घटनाबाह्य असल्याचा हल्लाबोल आदित्य यांनी आपल्या भाषणातून केला. तसेच, गद्दारांनी शिवसैनिकांचा आवाज ऐकावा, जो आवाज मतदानाच्या पेटीतून दिसून येईल, असेही ते म्हणाले. 

भिवंडीतूनही एल्गार, सरकार कोसळणार

"मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. कामं घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसारखं यांना आजवर शिवसेनेनं सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेनं दिलं त्याच पक्षाशी गद्दारी केली. या आमदारांनी केलेलं बंड तुम्हाला पटलंय का? असे म्हणत शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून बंडखोरांवर हल्लाबोल केला. यावेळी, शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असे भाकीतही त्यांनी केलं होतं.

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNashikनाशिकEknath Shindeएकनाथ शिंदे