शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

एनबीटीच्या प्राचार्यांवर कारवाई पुणे विद्यापीठ : परीक्षेचे कोणतेही काम करण्यास मनाई

By admin | Updated: May 9, 2014 23:20 IST

नाशिक : न. ब. ठाकूर (एनबीटी) विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना वर्षभरासाठी कामकाज करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठाच्या छाननी तालनीकरण विभागाकडून सदर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई केल्याचे समजते.

नाशिक : न. ब. ठाकूर (एनबीटी) विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना वर्षभरासाठी कामकाज करण्यास मनाई करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठाच्या छाननी तालनीकरण विभागाकडून सदर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई केल्याचे समजते. एलएलबी व बीएसएल शाखेच्या प्रात्यक्षिक गुणांवरून विद्यार्थ्यांना धमकावणे, त्यांचा मानसिक छळ करून त्यांना वेठीस धरणे अशा आशयाच्या तक्रारी काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या छाननी व तालनीकरण विभागाकडे केल्या होत्या. त्यावर निर्णय देताना विद्यापीठाने प्राचार्य डॉ. वैद्य यांच्यावर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करीत एप्रिल २०१४ पासून एक वर्षासाठी विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षेचे काम करण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर याबाबतची नोंद सेवापुस्तकात करून तसे परीक्षा नियंत्रकांना कळवावे, असेही स्पष्ट केले आहे. याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यानंतर डॉ. वैद्य यांनी परीक्षेचा संपूर्ण कार्यभार प्रा. कादरी यांना सोपविला आहे. दरम्यान, याच महाविद्यालयातील प्रा. सुनंदा काळे यांच्या विरोधात मानसिक छळ केल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीने विद्यापीठाकडे तक्रार केल्याने महाविद्यालयातील कारभाराबाबत शंका उपस्थित केली जात आहे. ----विद्यापीठाकडे दाद मागणारज्या विद्यार्थ्यांनी माझ्याविरोधात तक्रारी केल्या त्या विद्यार्थ्यांची वागणूक विद्यापीठाने पडताळून बघणे अपेक्षित होते. कारण त्यांनी केलेले आरोप हे पूर्णत: चुकीचे असून, त्याबाबत विद्यापीठाकडे दाद मागणार आहे. विद्यापीठाच्या कारवाईमुळे धक्काच बसला असून, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. - डॉ. अस्मिता वैद्य, प्राचार्य, न. ब. विधी महाविद्यालयइतरांनी धडा घ्यावाविद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक गुणांवरून वेठीस धरणे हे पूर्णत: चुकीचे असून, या प्रकरणावरून अशी मानसिकता असलेल्या प्राध्यापकांनी धडा घेण्याची आवश्यकता आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे छळ केला जात असेल त्यांनी विद्यापीठाकडे तक्रार करावी. - अजिंक्य गिते, तक्रारकर्ता