शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रस्त्यावरील कंटेनर्समुळे वाढले अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:19 IST

झपाट्याने विकसित झालेल्या इंदिरानगर भोवतालच्या परिसरात आता वाहतुकीची समस्या सर्वसामान्य नागरिकांची डोकदुखी ठरली आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगर ते जय जगन्नाथ चौक रस्त्यादरम्यान तासन्तास उभ्या राहणाºया कंटेनरमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. या भागात असलेल्या सीमेंट गुदामधारकांकडे वाहनतळांची सोय नसल्याने त्यांचे रस्त्यावर अतिक्रमण झाले असून, व्यावसायिकांच्या सोयीमुळे नागरिकांची गैरसोय कशासाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे.

संजय शहाणे ।नाशिकच्या विस्तारात सर्वाधिक फोफावलेला भाग असलेल्या इंदिरानगर, राजीवनगर, पाथर्डी आणि वडाळा रोड अशा विविध प्रकारांच्या मार्गांवर नव्या वसाहती झाल्या आहेत. मोठे-मोठे गृहनिर्माण प्रकल्प साकारण्यात आले आहेत. त्याबरोबरच लोकांची गरज म्हणून शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा असे सर्वच वाढत आहे. त्यामुळे हळूहळू परिसराच्या समस्यादेखील वाढत आहेत. विशेषत: वाहतुकीची समस्या वाढू लागली असून, त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यावर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून...इंदिरानगर : झपाट्याने विकसित झालेल्या इंदिरानगर भोवतालच्या परिसरात आता वाहतुकीची समस्या सर्वसामान्य नागरिकांची डोकदुखी ठरली आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगर ते जय जगन्नाथ चौक रस्त्यादरम्यान तासन्तास उभ्या राहणाºया कंटेनरमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. या भागात असलेल्या सीमेंट गुदामधारकांकडे वाहनतळांची सोय नसल्याने त्यांचे रस्त्यावर अतिक्रमण झाले असून, व्यावसायिकांच्या सोयीमुळे नागरिकांची गैरसोय कशासाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे.  कलानगर ते पाथर्डीगाव, वडाळा-पाथर्डी रस्त्याचे काम दीड वर्षभरापूर्वी करण्यात आले. केवळ रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणच नव्हे तर सुशोभिकरण करण्यात आले. त्यामुळे सौंदर्यात भर पडली आहे. या रस्त्याच्या दुतर्फा इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगर, समर्थनगर, पांडवनगरी, कैलासनगरसह विविध उपनगरे आहेत. अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. तसेच रस्त्यालगतच तीन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय असल्याने दिवसभर शेकडोच्या संख्येने विद्यार्थ्यांची वर्दळसुद्धा असते. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून अवजड वाहनास परवानगी नसतानाही सर्रासपणे दिवसभर सीमेंटच्या गोण्या घेऊन सुमारे चाळीस ते पन्नास चाकांच्या कंटेनर बेफान वेगाने ये-जा करीत असतात.  सराफनगरलगत सीमेंटच्या गोण्यांची गुदाम असल्याने दिवसभर गोण्या उतरवणे आणि सोडविण्यासाठी सराफनगर ते जय जगन्नाथ चौक रस्त्यादरम्यान कंटेनर तासनतास रांगा लावून उभ्या असतात. त्यामुळे परिसरातील रहिवासी दुचाकी अथवा मोटारचालकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनले आहे. रस्त्यात अडचणीत भर घालणाºया या कंटेनर्समुळे दिवसागणिक लहान-मोठे अपघात होत असतात. संबंधित विभाग अजून किती जीवितहानी होण्याची वाट बघणार आहे,  असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. (क्रमश:)वाहनतळाची व्यवस्था नाहीपरिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून हेल्मेट सक्तीच्या नावाने दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाते, परंतु रस्त्यावर तासन्तास उभ्या राहणाºया कंटेनरधारकांवर आणि अवजड वाहनांची वाहतूक करण्यावर शहर वाहतूक पोलीस विभाग कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच वाहनतळांची कोणतीही व्यवस्था नसतानाही सीमेंट गुदामधारकांना येथे व्यवसाय करण्यास परवानगी कशी मिळाली, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.गाफील कंटेनरमुळे एक ठारया परिसरात उभ्या असणाºया कंटेनरचालकाच्या चुकीमुळे त्याच्याच सहचालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. कंटेनर खाली सहचालक वामकुक्षी घेत असताना चालकाने कंटेनर चालू केला आणि त्याखाली सहचालकाचा मृत्यू झाला. इतके गाफील चालक असतील तर नागरिकांनी या भागात कसे वावरायचे, असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आाहेत.