शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

वणी-नाशिक रस्त्यावरील अपघाताचे सत्र सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:50 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील वणी ते नाशिक हा दुय्यम दर्जाचा महामार्ग प्रवासी वर्गासाठी दिवसेंदिवस डोकेदुखीचा विषय बनत चालला आहे. सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे कानाडोळा यामुळे या रस्त्यावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे. अपघातांची शृंखला केव्हा खंडित होणार, असा सवाल प्रवासी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.

वणी ते नाशिक हा रस्ता दळणवळणाच्या माध्यमातून महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्याने गुजरात जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. दिंडोरी तालुक्यातील काही गावांमध्ये कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. त्या कंपन्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक या रस्त्याने गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर होत असते. तसेच दिंडोरी, सिन्नर, इगतपुरी, नाशिक आदी तालुक्यातील भाजीपाला सुरतच्या बाजारपेठेत याच रस्त्याने नेला जातो. तसेच कंपन्यामध्ये तयार झालेल्या पक्क्या मालाची निर्यातदेखील याच रस्त्याने होते. त्यामुळे हा रस्ता दळणवळणांच्या माध्यमातून महत्त्वाचा मानला जातो. व वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होत असते. गुजरातहून जास्त भाविक शिर्डी येथे याच रस्त्याने प्रवास करीत असतात. तसेच सापुतारा हे पर्यटन क्षेत्र पाहण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील प्रवासी या रस्त्याने ये-जा करीत असतात. महाराष्ट्रातील शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी गड याच महामार्गावर येत असल्यामुळे देशातील अनेक भागातील भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे हा रस्ता सर्व बाजूने महत्त्वाचा मानला गेला आहे; परंतु या रस्त्याने प्रवास करताना प्रवासी वर्गाला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या रस्त्याची आता नव्याने दुरुस्ती करण्यात आल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या रस्त्यावरील अपघातात काही जणांना प्राणाला मुकावे लागले आहे, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे. सुविधांचा अभाव, उपाययोजनांकडे कानाडोळा या गोष्टी वाढत्या अपघातांना कारणीभूत असल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी वळण रस्ता आहे. या वळणांवर सूचना देणारे फलक नाहीत. त्यामुळे वाहनधारकाला रस्त्यांचा अंदाज कळत नाही. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ज्या ठिकाणी वळण आहे, त्या ठिकाणी तसेच वेगवेगळ्या फाट्यावर दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात