शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Accident: मालेगावच्या वऱ्हाडाच्या बसला अपघात; वृद्धेसह तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 15:01 IST

Accident: लग्नासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला भडगाव ता.(साक्री) बारीत अपघात झाला या भीषण अपघातात वृद्धेसह एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे तर सुमारे १५ ते २० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

- अतुल शेवाळे

मालेगाव (नाशिक) -  तालुक्यातील चिंचवे(गा) येथून साक्री येथे लग्नासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या बसला भडगाव ता.(साक्री) बारीत अपघात झाला या भीषण अपघातात वृद्धेसह एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे तर सुमारे १५ ते २० जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृत व जखमींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. जखमींवर येथील सामान्य रुग्णालयात  उपचार सुरू आहेत. चिंचवे(गा) येथील संदीप बाळू साळवे यांच्या मुलीचे साक्री येथे लग्न होते. वऱ्हाड सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास साक्री कडे रवाना झाले होते. भडगावबारीत चालक दीपक आहिरे याचे स्कूल बस क्रमांक एम एच ४१एबी ९८०५ वरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपघातात मकुबाई बारकू ह्यालीज(६०) रा. करजगव्हाण व मयुरी विकास बोरसे (१२) रा शिर्डी यांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे १५ ते २९ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींवर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही गंभीरित्या जखमी झालेल्या वऱ्हाडीना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी वऱ्हाडी मंडळीने तातडीने जखमी व मृतांना सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. या अपघातात मृतांचा व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने जखमींवर उपचार सुरू केले आहेत.

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक