शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

नाशकात मुबलक पाणी, तरीही पाणी बाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 15:09 IST

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणी पुरवठा होतो. पूर्वी गोदावरी नदीतून पाणी पुरवठा केला जात असे नंतर गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. त्याचवेळी गंगापूर धरणाला पूरक साठा नसल्याने आणि धरणात गाळ साचून धरणाची 7200 दश लक्ष घन फूट क्षमता कमी झाल्याने आधी कश्यपी धरणात महापालिकेने 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर शासनाने गौतमी गोदावरी हे दोन धरण बांधले

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव नाशिककरांना अडचणीचा20 वर्षांपासून चर खोदण्याचे काम रखडलेचेहेडी बंधाऱ्याचा प्रश्न कायम

संजय पाठक, नाशिक : अखेर नाशिक शहरासाठी पाणी कपातीचा निर्णय झाला असून उद्या पासून चार विभागात एक वेळ पाणी पुरवठा होणार आहे तर दर गुरुवारी कोरडा दिन पाळला जाणार आहे. नाशिक शहरासाठी पाण्याची कमी नाही तब्बल पाच धरणातून पाणी उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर आताही धरणात सुमारे तीनशे दश लक्ष घन फूट पाणी साठाही शिल्लक आहे परंतु तरीही नाशिककरांवर पाणी कपात लादण्यात आली आहे.नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणी पुरवठा होतो. पूर्वी गोदावरी नदीतून पाणी पुरवठा केला जात असे नंतर गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. त्याचवेळी गंगापूर धरणाला पूरक साठा नसल्याने आणि धरणात गाळ साचून धरणाची 7200 दश लक्ष घन फूट क्षमता कमी झाल्याने आधी कश्यपी धरणात महापालिकेने 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर शासनाने गौतमी गोदावरी हे दोन धरण बांधले. गंगापूर धरणाची क्षमता कमी होऊन ती 5600 दश लक्ष घन फूट इतकी झाली असली तरी कश्यपी आणि गौतमी गोदावरी या धरणातून अतिरीक्त 3600 दश लक्ष घन फूट पाणी उपलब्ध झाले मात्र दरम्यानच्या काळात महापालिकेने 1999 मध्ये गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजना पूर्ण केली. त्यावेळी धरणाच्या हेड वर्क म्हणजे शिरो भागाचे काम करताना जलविहिरीच्या पुढे धरणातील निच्चांकी पातळीचे पाणी घेण्यासाठी चर खोदण्याचे एक काम अंतर्भुत होते तेच केले गेले नाही. गेल्या 20 वर्षांपासून हे काम होऊ शकले नाही त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा महापालिकेच्या जलविहिरीत पाणी येत नाही आणि अडचण होते आज कश्यपी धरणात 90 आणि गौतमी धरणात 60 दश लक्ष घन फूट पाणी गंगापूर धरणातील साठ्या शिवाय शिल्लक आहे पण ते धरणात आले तरी चर नसल्याने हे पाणी मनपाच्या जल विहिरीत येऊ शकत नाही.असाच प्रकार चेहेडी बंधाऱ्याच्या बाबतीत आहे. नाशिक शहरातील नाशिक रोड विभागातील बहुतांशी भागात दारणा धरणातील पाण्याचा पुरवठा होतो हे पाणी चेहेडी बंधाऱ्यातून उचलले जाते. पण बंधाऱ्याच्या अलिकडे भगूर आणि देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे मलजल सोडले जाते त्यामुळे येथून उचलले पाणी अत्यंत दूषित असल्याने मे आणि जून महिन्यात किमान 20  ते 25 दिवस येथून पाणी उचलता येत नाही. आज दारणा धरणात महापालिकेच्या हक्काचे 150 दश लक्ष घन फूट पाणी असूनही देखील ते मिळणे दुरापास्त आहे. ही समस्याही जुनीच आहे पण मलजल येते त्याच्या पलीकडे नवीन बंधारा बांधणे किंवा तेथे पाईपलाईन टाकून थेट शुद्धीकरण केंद्रा पर्यंत पाणी आणणे महापालिकेला आजवर शक्य झालेले नाही याच समस्यांमुळे आज नाशिककरांना धरणात पाणी असूनही कपातीला सामोरे जावे लागत आहे

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाRanjana Bhansiरंजना भानसीgangapur damगंगापूर धरण