शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नाशकात मुबलक पाणी, तरीही पाणी बाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 15:09 IST

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणी पुरवठा होतो. पूर्वी गोदावरी नदीतून पाणी पुरवठा केला जात असे नंतर गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. त्याचवेळी गंगापूर धरणाला पूरक साठा नसल्याने आणि धरणात गाळ साचून धरणाची 7200 दश लक्ष घन फूट क्षमता कमी झाल्याने आधी कश्यपी धरणात महापालिकेने 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर शासनाने गौतमी गोदावरी हे दोन धरण बांधले

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव नाशिककरांना अडचणीचा20 वर्षांपासून चर खोदण्याचे काम रखडलेचेहेडी बंधाऱ्याचा प्रश्न कायम

संजय पाठक, नाशिक : अखेर नाशिक शहरासाठी पाणी कपातीचा निर्णय झाला असून उद्या पासून चार विभागात एक वेळ पाणी पुरवठा होणार आहे तर दर गुरुवारी कोरडा दिन पाळला जाणार आहे. नाशिक शहरासाठी पाण्याची कमी नाही तब्बल पाच धरणातून पाणी उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर आताही धरणात सुमारे तीनशे दश लक्ष घन फूट पाणी साठाही शिल्लक आहे परंतु तरीही नाशिककरांवर पाणी कपात लादण्यात आली आहे.नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणी पुरवठा होतो. पूर्वी गोदावरी नदीतून पाणी पुरवठा केला जात असे नंतर गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. त्याचवेळी गंगापूर धरणाला पूरक साठा नसल्याने आणि धरणात गाळ साचून धरणाची 7200 दश लक्ष घन फूट क्षमता कमी झाल्याने आधी कश्यपी धरणात महापालिकेने 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर शासनाने गौतमी गोदावरी हे दोन धरण बांधले. गंगापूर धरणाची क्षमता कमी होऊन ती 5600 दश लक्ष घन फूट इतकी झाली असली तरी कश्यपी आणि गौतमी गोदावरी या धरणातून अतिरीक्त 3600 दश लक्ष घन फूट पाणी उपलब्ध झाले मात्र दरम्यानच्या काळात महापालिकेने 1999 मध्ये गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजना पूर्ण केली. त्यावेळी धरणाच्या हेड वर्क म्हणजे शिरो भागाचे काम करताना जलविहिरीच्या पुढे धरणातील निच्चांकी पातळीचे पाणी घेण्यासाठी चर खोदण्याचे एक काम अंतर्भुत होते तेच केले गेले नाही. गेल्या 20 वर्षांपासून हे काम होऊ शकले नाही त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा महापालिकेच्या जलविहिरीत पाणी येत नाही आणि अडचण होते आज कश्यपी धरणात 90 आणि गौतमी धरणात 60 दश लक्ष घन फूट पाणी गंगापूर धरणातील साठ्या शिवाय शिल्लक आहे पण ते धरणात आले तरी चर नसल्याने हे पाणी मनपाच्या जल विहिरीत येऊ शकत नाही.असाच प्रकार चेहेडी बंधाऱ्याच्या बाबतीत आहे. नाशिक शहरातील नाशिक रोड विभागातील बहुतांशी भागात दारणा धरणातील पाण्याचा पुरवठा होतो हे पाणी चेहेडी बंधाऱ्यातून उचलले जाते. पण बंधाऱ्याच्या अलिकडे भगूर आणि देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे मलजल सोडले जाते त्यामुळे येथून उचलले पाणी अत्यंत दूषित असल्याने मे आणि जून महिन्यात किमान 20  ते 25 दिवस येथून पाणी उचलता येत नाही. आज दारणा धरणात महापालिकेच्या हक्काचे 150 दश लक्ष घन फूट पाणी असूनही देखील ते मिळणे दुरापास्त आहे. ही समस्याही जुनीच आहे पण मलजल येते त्याच्या पलीकडे नवीन बंधारा बांधणे किंवा तेथे पाईपलाईन टाकून थेट शुद्धीकरण केंद्रा पर्यंत पाणी आणणे महापालिकेला आजवर शक्य झालेले नाही याच समस्यांमुळे आज नाशिककरांना धरणात पाणी असूनही कपातीला सामोरे जावे लागत आहे

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाRanjana Bhansiरंजना भानसीgangapur damगंगापूर धरण