शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात मुबलक पाणी, तरीही पाणी बाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 15:09 IST

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणी पुरवठा होतो. पूर्वी गोदावरी नदीतून पाणी पुरवठा केला जात असे नंतर गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. त्याचवेळी गंगापूर धरणाला पूरक साठा नसल्याने आणि धरणात गाळ साचून धरणाची 7200 दश लक्ष घन फूट क्षमता कमी झाल्याने आधी कश्यपी धरणात महापालिकेने 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर शासनाने गौतमी गोदावरी हे दोन धरण बांधले

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव नाशिककरांना अडचणीचा20 वर्षांपासून चर खोदण्याचे काम रखडलेचेहेडी बंधाऱ्याचा प्रश्न कायम

संजय पाठक, नाशिक : अखेर नाशिक शहरासाठी पाणी कपातीचा निर्णय झाला असून उद्या पासून चार विभागात एक वेळ पाणी पुरवठा होणार आहे तर दर गुरुवारी कोरडा दिन पाळला जाणार आहे. नाशिक शहरासाठी पाण्याची कमी नाही तब्बल पाच धरणातून पाणी उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर आताही धरणात सुमारे तीनशे दश लक्ष घन फूट पाणी साठाही शिल्लक आहे परंतु तरीही नाशिककरांवर पाणी कपात लादण्यात आली आहे.नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणी पुरवठा होतो. पूर्वी गोदावरी नदीतून पाणी पुरवठा केला जात असे नंतर गंगापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. त्याचवेळी गंगापूर धरणाला पूरक साठा नसल्याने आणि धरणात गाळ साचून धरणाची 7200 दश लक्ष घन फूट क्षमता कमी झाल्याने आधी कश्यपी धरणात महापालिकेने 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर शासनाने गौतमी गोदावरी हे दोन धरण बांधले. गंगापूर धरणाची क्षमता कमी होऊन ती 5600 दश लक्ष घन फूट इतकी झाली असली तरी कश्यपी आणि गौतमी गोदावरी या धरणातून अतिरीक्त 3600 दश लक्ष घन फूट पाणी उपलब्ध झाले मात्र दरम्यानच्या काळात महापालिकेने 1999 मध्ये गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजना पूर्ण केली. त्यावेळी धरणाच्या हेड वर्क म्हणजे शिरो भागाचे काम करताना जलविहिरीच्या पुढे धरणातील निच्चांकी पातळीचे पाणी घेण्यासाठी चर खोदण्याचे एक काम अंतर्भुत होते तेच केले गेले नाही. गेल्या 20 वर्षांपासून हे काम होऊ शकले नाही त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होते तेव्हा महापालिकेच्या जलविहिरीत पाणी येत नाही आणि अडचण होते आज कश्यपी धरणात 90 आणि गौतमी धरणात 60 दश लक्ष घन फूट पाणी गंगापूर धरणातील साठ्या शिवाय शिल्लक आहे पण ते धरणात आले तरी चर नसल्याने हे पाणी मनपाच्या जल विहिरीत येऊ शकत नाही.असाच प्रकार चेहेडी बंधाऱ्याच्या बाबतीत आहे. नाशिक शहरातील नाशिक रोड विभागातील बहुतांशी भागात दारणा धरणातील पाण्याचा पुरवठा होतो हे पाणी चेहेडी बंधाऱ्यातून उचलले जाते. पण बंधाऱ्याच्या अलिकडे भगूर आणि देवळाली कॅन्टोमेंट बोर्डाचे मलजल सोडले जाते त्यामुळे येथून उचलले पाणी अत्यंत दूषित असल्याने मे आणि जून महिन्यात किमान 20  ते 25 दिवस येथून पाणी उचलता येत नाही. आज दारणा धरणात महापालिकेच्या हक्काचे 150 दश लक्ष घन फूट पाणी असूनही देखील ते मिळणे दुरापास्त आहे. ही समस्याही जुनीच आहे पण मलजल येते त्याच्या पलीकडे नवीन बंधारा बांधणे किंवा तेथे पाईपलाईन टाकून थेट शुद्धीकरण केंद्रा पर्यंत पाणी आणणे महापालिकेला आजवर शक्य झालेले नाही याच समस्यांमुळे आज नाशिककरांना धरणात पाणी असूनही कपातीला सामोरे जावे लागत आहे

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाRanjana Bhansiरंजना भानसीgangapur damगंगापूर धरण