शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीची चाके थांबल्याने सुमारे तीन कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 13:28 IST

सिन्नर - गेल्या ४८ दिवसांपासून सिन्नर आगाराची लालपरी ठप्प झाल्याने सुमारे ३ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे दिसून येते. तीन दिवस ...

सिन्नर - गेल्या ४८ दिवसांपासून सिन्नर आगाराची लालपरी ठप्प झाल्याने सुमारे ३ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे दिसून येते. तीन दिवस एक फेरी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता ती फेरीही बंद झाल्याने सिन्नर आगार पूर्णत: ठप्प असल्याचे चित्र आहे.

८ नोव्हेंबरपासून राज्य कर्मचारी सेवेत विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून राज्य परिवहन महामंडळाने संप पुकारला आहे. यात सिन्नर आगारातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. सुरुवातीला ४२४ कर्मचाऱ्यांपैकी मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपात सहभागी झाले होते. आता ९ प्रशासकीय कर्मचारी, दोन चालक व तीन वाहक कामावर रुजू असून उर्वरित सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सिन्नर आगाराला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

सिन्नर आगाराकडे ५६ बसेस आहेत. १९६ चालक, १४५ वाहक, ५२ यांत्रिकी सेवक तर १८ कारकून कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटानंतर दिवाळीपूर्वी या बसेस रस्त्यावर धावू लागल्या तेव्हा सिन्नर आगाराला दररोज साडेपाच लाखांचे उत्पन्न मिळू लागले होते. दिवाळीच्या दरम्यान भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर रोजचे उत्पन्न आठ लाखांपर्यंत पोहोचले होते. एकाच दिवशी विक्रमी १२ लाखांपर्यंत उत्पन्न आगाराने मिळवले होते. जवळपास ३५ दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे आगाराला जवळपास ३ कोटींचा फटका बसला आहे. मध्यंतरी काही कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर आगारातील चार बसेस रस्त्यावर उतरल्या होत्या. सिन्नर-ठाणगाव व सिन्नर-नाशिक अशी बसफेरी सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या फेऱ्या बंद झाल्या. आता टप्प्याटप्प्याने चारही बसेस बंद झाल्या असून आगारातील सर्व फेऱ्या ठप्प झाल्याचे चित्र आहे. सिन्नर आगाराची एकही बस रस्त्यावर नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

सिन्नर आगाराचे ग्रामीण भागात मोठे जाळे पसरले आहे. त्यामुळे आठवडे बाजारासह शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी व नागरिकांना येण्यासाठी बसचा मोठा आधार होता. मात्र बससेवा सुमारे ४८ दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असून राज्य शासनाने यातून तोडगा काढण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपNashikनाशिक