शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सहा महिन्यांत ८,९०० लोक हायवेवर पडले मृत्युमुखी; महाराष्ट्र 'टॉप-5'मध्ये

By अझहर शेख | Updated: August 29, 2023 17:50 IST

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या राष्ट्रीय, राज्य महामार्गांवरून दररोज लाखो लोक एकापेक्षा एक महागड्या वाहनांमधून प्रवास करतात

नाशिक : राज्यात घडणाऱ्या खुनांच्या घटनांपेक्षा महामार्गांवर होणाऱ्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कित्येकपटीने जास्त आहे. या सहा महिन्यांत ८ हजार १३५ फेटल अपघातात ८,९०७ लोकांनी हायवेवर प्राण सोडले. तसेच ७ हजार ३७७ अपघातात ११ हजार ९०४ प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले आहेत. रस्ते अपघात, त्यामधील मृत्युचे प्रमाण बघता देशात ‘टॉप-५’मध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या राष्ट्रीय, राज्य महामार्गांवरून दररोज लाखो लोक एकापेक्षा एक महागड्या वाहनांमधून प्रवास करतात. प्रशस्त रस्ते, उड्डाणपूलदेखील ठिकठिकाणी महामार्गांवर बांधण्यात आले आहेत. मात्र महामार्ग सुरक्षितता हा गंभीर प्रश्न बनला आहे. दिवसेंदिवस वाढते रस्ते अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे, ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे मत राज्य महामार्ग पोलिस विभागाचे अपर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक येथील ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये मंगळवारी (दि.२९) सिंगल यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत महामार्गांवरील अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे वाढते प्रमाण आणि त्यामागील कारणे याबाबत आढावा घेण्यात आला. कारणमिमांसेमध्ये राज्यातील महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट, अपघात प्रवण क्षेत्र, रस्त्यांची दुर्दशा, अपात्कालीन मदतीचा प्रतीसाद, टोलनाक्यांवरील अपात्कालीन यंत्रणा व वाहनांची अवस्था, रुग्णवाहिका, महामार्ग पोलिसांचा प्रतिसाद आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

यासोबतच महामार्गांवर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हायवे पोलिसांकडून जनप्रबोधनावर विशेष भर देण्यासाठी स्वतंत्र मोहिम राबविण्याची सूचनाही सिंगल यांनी यावेळी केली. याप्रसंगी महामार्ग पोलिस विभागाचे मुंबईचे पोलीस अधीक्षक अरविंद सालवे, पुण्याच्या लता फड, ठाण्याचे डॉ.माेहन दहीकर, रायगडचे तानाजी चिखले, नागपुरचे यशवंत सोळंके, छत्रपती संभाजीनगरच्या डॉ.अनिता जामदार आदी अधिकारी उपस्थित हाेते.

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र