शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

राज्यात सहा महिन्यांत ८,९०० लोक हायवेवर पडले मृत्युमुखी; महाराष्ट्र 'टॉप-5'मध्ये

By अझहर शेख | Updated: August 29, 2023 17:50 IST

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या राष्ट्रीय, राज्य महामार्गांवरून दररोज लाखो लोक एकापेक्षा एक महागड्या वाहनांमधून प्रवास करतात

नाशिक : राज्यात घडणाऱ्या खुनांच्या घटनांपेक्षा महामार्गांवर होणाऱ्या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कित्येकपटीने जास्त आहे. या सहा महिन्यांत ८ हजार १३५ फेटल अपघातात ८,९०७ लोकांनी हायवेवर प्राण सोडले. तसेच ७ हजार ३७७ अपघातात ११ हजार ९०४ प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले आहेत. रस्ते अपघात, त्यामधील मृत्युचे प्रमाण बघता देशात ‘टॉप-५’मध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या राष्ट्रीय, राज्य महामार्गांवरून दररोज लाखो लोक एकापेक्षा एक महागड्या वाहनांमधून प्रवास करतात. प्रशस्त रस्ते, उड्डाणपूलदेखील ठिकठिकाणी महामार्गांवर बांधण्यात आले आहेत. मात्र महामार्ग सुरक्षितता हा गंभीर प्रश्न बनला आहे. दिवसेंदिवस वाढते रस्ते अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे, ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे मत राज्य महामार्ग पोलिस विभागाचे अपर पोलिस महासंचालक डॉ. रवींद्र सिंगल यांनी व्यक्त केले आहे.

नाशिक येथील ट्रॅफिक एज्युकेशन पार्कमध्ये मंगळवारी (दि.२९) सिंगल यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत महामार्गांवरील अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचे वाढते प्रमाण आणि त्यामागील कारणे याबाबत आढावा घेण्यात आला. कारणमिमांसेमध्ये राज्यातील महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट, अपघात प्रवण क्षेत्र, रस्त्यांची दुर्दशा, अपात्कालीन मदतीचा प्रतीसाद, टोलनाक्यांवरील अपात्कालीन यंत्रणा व वाहनांची अवस्था, रुग्णवाहिका, महामार्ग पोलिसांचा प्रतिसाद आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

यासोबतच महामार्गांवर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये हायवे पोलिसांकडून जनप्रबोधनावर विशेष भर देण्यासाठी स्वतंत्र मोहिम राबविण्याची सूचनाही सिंगल यांनी यावेळी केली. याप्रसंगी महामार्ग पोलिस विभागाचे मुंबईचे पोलीस अधीक्षक अरविंद सालवे, पुण्याच्या लता फड, ठाण्याचे डॉ.माेहन दहीकर, रायगडचे तानाजी चिखले, नागपुरचे यशवंत सोळंके, छत्रपती संभाजीनगरच्या डॉ.अनिता जामदार आदी अधिकारी उपस्थित हाेते.

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र