शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

७.२ किमान तपमान : राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक थंडीची लाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 7:06 PM

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर व उत्तर राजस्थान भागात शीतलहर वाढल्यामुळे उत्तर महाराष्टÑ गारठून गेला आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीला हा गारवा आल्हाददायक असला तरी उर्वरित शहरांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील सर्वाधिक थंडी मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये असून नाशिक थंडीने गारठले आहे.

ठळक मुद्दे गुरुवारी पारा थेट ७.२ अंशांपर्यंत घसरल्याने ही नोंद हंगामातील सर्वाधिक नीचांकीनाशिककरांना पुन्हा हुडहुडी निफाड तालुका चांगलाच गारठला

नाशिक : मकर संक्रांतीपासून गायब झालेली थंडीची लाट मागील दोन ते तीन दिवसांपासून नाशिकमध्ये पुन्हा परतली आहे. नाशिकमध्ये हंगामातील नीचांकी ७.२ इतके किमान तपमान गुरुवारी (दि.२५) नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक कमी किमान तपमानाची नोंद नाशिकला झाली. तपमानात सातत्याने होणा-या घसरणीमुळे नागरिक गारठले आहेत.हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर व उत्तर राजस्थान भागात शीतलहर वाढल्यामुळे उत्तर महाराष्टÑ गारठून गेला आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीला हा गारवा आल्हाददायक असला तरी उर्वरित शहरांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील सर्वाधिक थंडी मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये असून नाशिक थंडीने गारठले आहे. हंगामात २७ डिसेंबर रोजी सर्वाधिक कमी ८.२ इतक्या किमान तपमानाची नोंद झाली होती; मात्र गुरुवारी पारा थेट ७.२ अंशांपर्यंत घसरल्याने ही नोंद हंगामातील सर्वाधिक नीचांकी ठरली. २०१६ साली नाशिकमध्ये सर्वाधिक कमी किमान तपमान ५.५ अंश इतके नोंदविले गेले होते.गेल्या वर्षी डिसेंबरच्या २७ तारखेला हंगामातील नीचांकी ८.२ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. एकूणच डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात नाशिककर गारठले होते. नववर्ष उजाडल्यानंतर थंडीची तीव्रता कमी होण्यास सुरुवात झाली होती. बुधवारी (दि.२४) ८.८ अंशांपर्यंत तपमान घसरले. निफाड तालुका चांगलाच गारठला असून, गुरुवारी नीचांकी ४.८ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. रविवारपासून किमान तपमान घसरण्यास सुरुवात झाली. पारा रविवारी व सोमवारी १०.८ अंशांवर होता. मंगळवारी पारा १२.६ अंशांपर्यंत वाढला; मात्र बुधवारी पारा थेट ८.८ अंंश आणि गुरुवारी ७.२ अंशांपर्यंत घसरला. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कमाल तपमानात अल्प वाढ झाली.

नाशिककरांना पुन्हा हुडहुडीबुधवारी संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात शहरात थंड वारे वेगाने वाहू लागल्याने किमान तपमान घसरले आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून नाशिककरांना मोठ्या प्रमाणात थंडीचा सामना करावा लागत आहे. बुधवार व गुरुवारी पहाटे कमालीची थंडी जाणवल्याने शाळा-महाविद्यालयांच्या पटसंख्येवरही त्याचा परिणाम जाणवला. विद्यार्थी मात्र पूर्णपणे उबदार कपड्यांनी ‘पॅक’ होऊन शाळेसाठी घराबाहेर पडल्याचेही चित्र पहावयास मिळाले. ऐन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला किमान तपमान घसरल्यामुळे विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या तयारीवर काहीसा परिणाम जाणवला. सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांनी सकाळऐवजी दुपारी साहित्य कवायतीचा सराव केला.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र