शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

७.२ किमान तपमान : राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक थंडीची लाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 19:08 IST

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर व उत्तर राजस्थान भागात शीतलहर वाढल्यामुळे उत्तर महाराष्टÑ गारठून गेला आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीला हा गारवा आल्हाददायक असला तरी उर्वरित शहरांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील सर्वाधिक थंडी मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये असून नाशिक थंडीने गारठले आहे.

ठळक मुद्दे गुरुवारी पारा थेट ७.२ अंशांपर्यंत घसरल्याने ही नोंद हंगामातील सर्वाधिक नीचांकीनाशिककरांना पुन्हा हुडहुडी निफाड तालुका चांगलाच गारठला

नाशिक : मकर संक्रांतीपासून गायब झालेली थंडीची लाट मागील दोन ते तीन दिवसांपासून नाशिकमध्ये पुन्हा परतली आहे. नाशिकमध्ये हंगामातील नीचांकी ७.२ इतके किमान तपमान गुरुवारी (दि.२५) नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक कमी किमान तपमानाची नोंद नाशिकला झाली. तपमानात सातत्याने होणा-या घसरणीमुळे नागरिक गारठले आहेत.हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर व उत्तर राजस्थान भागात शीतलहर वाढल्यामुळे उत्तर महाराष्टÑ गारठून गेला आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीला हा गारवा आल्हाददायक असला तरी उर्वरित शहरांना हुडहुडी भरली आहे. राज्यातील सर्वाधिक थंडी मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये असून नाशिक थंडीने गारठले आहे. हंगामात २७ डिसेंबर रोजी सर्वाधिक कमी ८.२ इतक्या किमान तपमानाची नोंद झाली होती; मात्र गुरुवारी पारा थेट ७.२ अंशांपर्यंत घसरल्याने ही नोंद हंगामातील सर्वाधिक नीचांकी ठरली. २०१६ साली नाशिकमध्ये सर्वाधिक कमी किमान तपमान ५.५ अंश इतके नोंदविले गेले होते.गेल्या वर्षी डिसेंबरच्या २७ तारखेला हंगामातील नीचांकी ८.२ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले होते. एकूणच डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात नाशिककर गारठले होते. नववर्ष उजाडल्यानंतर थंडीची तीव्रता कमी होण्यास सुरुवात झाली होती. बुधवारी (दि.२४) ८.८ अंशांपर्यंत तपमान घसरले. निफाड तालुका चांगलाच गारठला असून, गुरुवारी नीचांकी ४.८ अंश इतके किमान तपमान नोंदविले गेले. रविवारपासून किमान तपमान घसरण्यास सुरुवात झाली. पारा रविवारी व सोमवारी १०.८ अंशांवर होता. मंगळवारी पारा १२.६ अंशांपर्यंत वाढला; मात्र बुधवारी पारा थेट ८.८ अंंश आणि गुरुवारी ७.२ अंशांपर्यंत घसरला. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी कमाल तपमानात अल्प वाढ झाली.

नाशिककरांना पुन्हा हुडहुडीबुधवारी संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात शहरात थंड वारे वेगाने वाहू लागल्याने किमान तपमान घसरले आहे. त्यामुळे मंगळवारी रात्रीपासून नाशिककरांना मोठ्या प्रमाणात थंडीचा सामना करावा लागत आहे. बुधवार व गुरुवारी पहाटे कमालीची थंडी जाणवल्याने शाळा-महाविद्यालयांच्या पटसंख्येवरही त्याचा परिणाम जाणवला. विद्यार्थी मात्र पूर्णपणे उबदार कपड्यांनी ‘पॅक’ होऊन शाळेसाठी घराबाहेर पडल्याचेही चित्र पहावयास मिळाले. ऐन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला किमान तपमान घसरल्यामुळे विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या तयारीवर काहीसा परिणाम जाणवला. सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांनी सकाळऐवजी दुपारी साहित्य कवायतीचा सराव केला.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र