७० सिल्व्हर ओकच्या झाडांवर कुर्हाड वृक्षप्रेमींचा आक्षेप : न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप
By Admin | Updated: May 27, 2014 01:42 IST2014-05-26T23:55:02+5:302014-05-27T01:42:02+5:30
नाशिक : उच्च न्यायालयाने शहरातील झाडे तोडण्यास मनाई केली असताना एबीबी सर्कल ते सिटी सेंटर मॉल दरम्यान असलेली ७० झाडे रस्ता रुंदीकरणामुळे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याची तक्रार याचिकाकर्ता ऋषिकेश नाझरे यांनी केली असून, संबंधित ठेकेदाराविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

७० सिल्व्हर ओकच्या झाडांवर कुर्हाड वृक्षप्रेमींचा आक्षेप : न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप
नाशिक : उच्च न्यायालयाने शहरातील झाडे तोडण्यास मनाई केली असताना एबीबी सर्कल ते सिटी सेंटर मॉल दरम्यान असलेली ७० झाडे रस्ता रुंदीकरणामुळे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे हा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याची तक्रार याचिकाकर्ता ऋषिकेश नाझरे यांनी केली असून, संबंधित ठेकेदाराविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
महामार्ग रुंदीकरणाच्या दरम्यान, बाधित होणार्या झाडे तोडणार्या महामार्ग प्राधिकरण आणि त्यांना संमती देणारी नाशिक महापालिका यांच्या विरुद्ध नाशिक नागरी कृती समितीच्या अश्विनी भट, कर्नल आनंद देशपांडे आणि ऋषिकेश नाझरे यांनी २००६ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याची सुनावणी न्यायालयात सुरू असून, अलीकडेच न्यायालयाने शहरातील कोणतेही झाड महापालिकेच्या परवानगीशिवाय तोडण्यास मनाई केली आहे. असे असताना त्र्यंबकरोडवरील ए.बी.बी. सर्कल ते सिटी सेंटर मॉल दरम्यान, रस्ता रुंदीकरण करताना सिल्व्हर ओकची ७० झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे याचिकाकर्ता ऋषिकेश नाझरे यांनी त्यास आक्षेप घेतला असून, यासंदर्भात पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहेत. त्यात न्यायालयाच्या आदेशाच संदर्भ दिला असून, यासंदर्भात संबंधित ठेकेदारावर दोन दिवसांत फौजदारी कारवाई करावी आणि तसे लेखी कळवावे अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येईल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, पालिकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत आहे. पालिकेकडे वृक्षप्राधिकरण समितीत तज्ज्ञ सदस्य नाहीत. त्यामुळे वृक्ष कायद्याचे पालन होत नाहीच; परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशाचेदेखील भान नाही. त्यामुळे आधी वृक्षप्राधिकरण समितीचे गठन व्हावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी राजेश पंडित यांनी केली आहे.