शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

राष्ट्रीय लोकअदालतीत ६५ हजार प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 17:39 IST

नाशिक : जिल्हा न्यायालयातील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणतर्फे शनिवारी (दि़८) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत ६० हजार ४५८ प्रकरणे ठेवण्यात आल्याची माहिती सचिव एस़ एम़ बुक्के यांनी दिली़ यामध्ये फौजदारी, दिवाणी तसेच दावा दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश आहे़

ठळक मुद्देन्यायालयांमध्ये दाखल ४ हजार ८५८ प्रकरणे ६० हजार दावा दाखलपूर्व प्रकरणे

नाशिक : जिल्हा न्यायालयातील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणतर्फे शनिवारी (दि़८) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत ६० हजार ४५८ प्रकरणे ठेवण्यात आल्याची माहिती सचिव एस़ एम़ बुक्के यांनी दिली़ यामध्ये फौजदारी, दिवाणी तसेच दावा दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश आहे़

राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये दाखल असलेल्या प्रकरणांपैकी ४ हजार ८५८ प्रकरणे निपटारा होण्यासाठी ठेवण्यात आली आहेत़ त्यामध्ये दोन हजार ७९८ फौजदारी प्रकरणे, ६३१ चलनक्षम पत्रकांचा कायदा (कलम १३८), ८० बँक दावे, ३०० मोटार अपघात प्रकरणे, २५९ कौटुंबिक वाद प्रकरणे, ५३० दिवाणी प्रकरणे व इतर प्रकरणे ठेवण्यात आली आहेत़ या प्रकरणांपैकी सुमारे एक हजार ४०० प्रकरणे ही नाशिक न्यायालयातील असून त्यात ७४१ फौजदारी प्रकरणे, २०३ चलनक्षम पत्रकांचा कायदा (कलम १३८), ६ बँक दावे, १४४ मोटार अपघात प्रकरणे, १८ कौटुंबिक वाद, २४५ दिवाणी प्रकरणे इत्यादी प्रकरणे ठेवण्यात आली आहेत़ याबरोबरच ६० हजार दावा दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली असून, त्यामध्ये ३० हजार प्रकरणे ही नाशिकमधील आहेत़

प्रमुख जिल्हा व प्रधान न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस. एम. बुक्के व इतर न्यायिक अधिकारी व कर्मचारी लोकअदालतीसाठी प्रयत्नशील आहेत़कोर्ट फीची रक्कम परतलोकअदालतीत मिटलेल्या प्रकरणांना अपील नसल्याने पक्षकारांचा मोठा फायदा आहे़ यामध्ये कोणाचाही विजय अथवा पराजय होत नाही, दाव्याचा निकालही त्वरित लागतो़ लोकन्यायालयाच्या निवड्याविरुद्ध अपील नाही तसेच सामोपचाराने वाद मिटल्याने दोन्ही पक्षांमध्ये समाधान असते़ लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते़- सूर्यकांत शिंदे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश

टॅग्स :Courtन्यायालयNashikनाशिक