शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नाशिक जिल्ह्यात 60 टक्क्यांहून अधिक पेरणी ; खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 19:35 IST

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक पेरणी पूणर् पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. परंतु, यावर्षी सुरुवातीलवाच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत जूनमध्ये खरिपाच्या पेरणीत वाढसमाधानकारक पावसाने शेतीच्या कामांना वेग

नाशिक : जिल्ह्यात निसर्ग चक्रिवादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्हयात झालेला मान्सूनपूर्व पाऊस आणि त्यानंतर जूनच्या पहिल्याच पंधरवड्यात  पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतीची कामे वेग मिळाल्याने जिल्ह्यातील बहूतांशी शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या पेरण्यांचे काम पूर्ण केले आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक पेरणी पूणर् पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. परंतु, यावर्षी सुरुवातीलवाच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.  मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी बियाण्यांची निवड करताना महाबीज  व एनएससी च्या बियाण्यांऐवजी खासगी कंपन्यांच्या बियांण्यांना अधिक पसंती दिली असून यात प्रामुख्याने सोयाबीन, ज्वारी, मका , सारख्या पिकांचा समावेश आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल खासगी कंपन्यांच्या बियाण्यांकडे वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे, आजच्या स्पर्धेच्या युगात शेती क्षेत्रातही विविध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांची दर्जेदार बियाणे बाजारात आणल्याने अशा बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. शेतकरी बियाणे खरेदी करताना खास करून उगवण क्षमता केंद्रस्थानि ठेवत असला तरी अनेकदा अपुरा ओलाव व वातावरणाती बदल यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावताना दिसते.  यावषी मान्सूनपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील बऱ्याच भागात जोरदार पाऊस पडला त्यानंतर दोन चार दिवसांतच मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली असल्याचे शेती तज्ज्ञांनी म्हटले आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी खरिपात ज्वारी, मका, सोयाबीन या पिकांना पसंती दिली असल्याचे दिसून येत असून, ज्वारीची सर्वसाधारणपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकFarmerशेतकरीRainपाऊसCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ