शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

नाशिक जिल्ह्यात 60 टक्क्यांहून अधिक पेरणी ; खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 19:35 IST

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक पेरणी पूणर् पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. परंतु, यावर्षी सुरुवातीलवाच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत जूनमध्ये खरिपाच्या पेरणीत वाढसमाधानकारक पावसाने शेतीच्या कामांना वेग

नाशिक : जिल्ह्यात निसर्ग चक्रिवादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्हयात झालेला मान्सूनपूर्व पाऊस आणि त्यानंतर जूनच्या पहिल्याच पंधरवड्यात  पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतीची कामे वेग मिळाल्याने जिल्ह्यातील बहूतांशी शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या पेरण्यांचे काम पूर्ण केले आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक पेरणी पूणर् पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. परंतु, यावर्षी सुरुवातीलवाच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.  मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी बियाण्यांची निवड करताना महाबीज  व एनएससी च्या बियाण्यांऐवजी खासगी कंपन्यांच्या बियांण्यांना अधिक पसंती दिली असून यात प्रामुख्याने सोयाबीन, ज्वारी, मका , सारख्या पिकांचा समावेश आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचा कल खासगी कंपन्यांच्या बियाण्यांकडे वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे, आजच्या स्पर्धेच्या युगात शेती क्षेत्रातही विविध कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांची दर्जेदार बियाणे बाजारात आणल्याने अशा बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. शेतकरी बियाणे खरेदी करताना खास करून उगवण क्षमता केंद्रस्थानि ठेवत असला तरी अनेकदा अपुरा ओलाव व वातावरणाती बदल यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावताना दिसते.  यावषी मान्सूनपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील बऱ्याच भागात जोरदार पाऊस पडला त्यानंतर दोन चार दिवसांतच मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली असल्याचे शेती तज्ज्ञांनी म्हटले आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी खरिपात ज्वारी, मका, सोयाबीन या पिकांना पसंती दिली असल्याचे दिसून येत असून, ज्वारीची सर्वसाधारणपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकFarmerशेतकरीRainपाऊसCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ