शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

६० टक्के बलात्कार विवाहाच्या आमिषापोटी

By विजय मोरे | Updated: December 17, 2018 00:29 IST

विवाहाबाबत प्रत्येक तरुण-तरुणीच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला आपला जीवनसाथी हा सुंदर व स्थिरस्थावरच असावा असेच वाटते़ मोबाइलवरील फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियामुळे तर अनोळखी व अपरिचित व्यक्तीबरोबर संवाद साधून त्याच्या आवडी-निवडी जाणून घेता येतात़ सोशल मीडिया वा ओळखीतील परिचितांकडून विश्वास निर्माण करून विवाहाचे आमिष दाखवित बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ नाशिक शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये सुमारे ६० टक्के बलात्काराचे गुन्हे हे विवाहाच्या आमिषाने झाल्याचे समोर आले आहे़

ठळक मुद्देधक्कादायक : सोशल मीडियाद्वारे ओळख; चालू वर्षी सर्वाधिक गुन्हे

नाशिक : विवाहाबाबत प्रत्येक तरुण-तरुणीच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्या तरी प्रत्येकाला आपला जीवनसाथी हा सुंदर व स्थिरस्थावरच असावा असेच वाटते़ मोबाइलवरील फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियामुळे तर अनोळखी व अपरिचित व्यक्तीबरोबर संवाद साधून त्याच्या आवडी-निवडी जाणून घेता येतात़ सोशल मीडिया वा ओळखीतील परिचितांकडून विश्वास निर्माण करून विवाहाचे आमिष दाखवित बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ नाशिक शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये सुमारे ६० टक्के बलात्काराचे गुन्हे हे विवाहाच्या आमिषाने झाल्याचे समोर आले आहे़शहर पोलीस आयुक्तालयातील तेरा पोलीस ठाणी व सायबर पोलीस ठाण्यात जानेवारी ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत बलात्काराचे ४२ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ४० गुन्ह्यांची उकल करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे़ पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांपैकी सुमारे ६० टक्के बलात्काराचे गुन्हे विवाहाचे आमिष दाखवून केल्याचे पोलिसांकडील आकडेवारीवरून समोर आले आहे़ विवाहाच्या आमिषास केवळ अविवाहित तरुणीच नव्हे, तर विवाहित महिला व अल्पवयीन शाळकरी मुलीही बळी पडल्या असून, त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत़नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गत तीन वर्षांत १०८ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत़ या गुन्ह्यांतील कारणांचा आढावा घेतला असता नातेसंबंध, ओळखीतील तरुण तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषत: फेसबुक, इन्स्टाग्राम व विवाह जमविणारी संकेतस्थळे यावरून ओळख वाढवून प्रथमत: विश्वास निर्माण केला जातो़ यानंतर विवाहाचे आमिषाने तरुणींना भावनिक करून त्या नावाखाली बलात्कार केला जातो़ यावर कळस म्हणजे प्रेमसंबंधातून झालेल्या शरीर-संबंधांचे गुपचूप व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकून खंडणी उकळल्याचे प्रकारही घडले आहेत़२मुळात ‘विवाह’ हे व्यक्तींमधील नातेसंबंध (नाते) निर्माण करणारे सामाजिक बंधन अथवा कायदेशीर करार असतो़ मात्र, सोशल मीडियाच्या व्हर्च्युअल जगात वावरणारी तरुणाई विशेषत: तरुणी याकडे दुर्लक्ष करतात़ काही महिन्यांपूर्वीच ओळख झालेल्या व्यक्तीने दिलेल्या विवाहाच्या आमिषास भुलून आपले सर्वस्व बहाल करतात़ यानंतर काही दिवसांनी संबंधित अनोळखी तरुणाचा पूर्वीच विवाह झाल्याचे व आपली फसवणूक झाल्याचे समोर येते़ पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांमध्ये गतिमंद, अल्पवयीन व शाळकरी मुलींना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटनांची संख्याही तुलनेने अधिक आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी