शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

नाशिक विभागात ६ लाख ग्रामस्थांना टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:05 IST

गेल्या वर्षी नाशिक विभागात सरासरी इतक्या पाऊस झाल्याने पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के इतका जलसाठा झाला होता. नदी, नाले दुथडी भरून वाहिले तर ग्रामीण भागातील विहीरीही तुडूंब भरण्यास मदत झाली होती. परंतु खरीप व रब्बी पिकासाठी पाण्याचा झालेला वापर पाहता

ठळक मुद्दे२३७ टॅँकरने पाणी पुरवठा : जळगावला सर्वाधिक दाह

नाशिक : मे महिन्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी पार केल्यानंतर सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून विहीरींनी तळ गाठण्याबरोबरच पाण्याचे स्त्रोत देखील आटल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, नाशिक विभागात ३० तालुक्यातील सुमारे सव्वा सहा लाख ग्रामस्थांना टंचाईची झळ बसली असून, त्यांना २३७ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक पाण्याची टंचाई जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली असून, त्यानंतर नाशिक व नगर जिल्ह्यात टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीने टॅँकरची संख्या वाढली आहे.गेल्या वर्षी नाशिक विभागात सरासरी इतक्या पाऊस झाल्याने पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के इतका जलसाठा झाला होता. नदी, नाले दुथडी भरून वाहिले तर ग्रामीण भागातील विहीरीही तुडूंब भरण्यास मदत झाली होती. परंतु खरीप व रब्बी पिकासाठी पाण्याचा झालेला वापर पाहता जानेवारी महिन्यापासूनच काही गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली होती. शासनाने जलयुक्त शिवार योजनेमुळे जमिनीच्या पाण्याची पातळी उंचावल्याची आकडेवारी जाहीर केली असली तरी, प्रत्यक्षात काही ठराविक भागातच पाण्याची पातळी वाढली तर काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीमुळे जलयुक्त शिवार योजना यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. नाशिक विभागातील ५२ तालुक्यापैकी ३० तालुक्यांना यंदा जानेवारी-फेबु्रवारीपासूनच पाणी टंचाई भासू लागल्याने अगोदर शासकीय टॅँकरने त्यांची तहान भागवावी लागली त्यानंतर खासगी टॅँकर सुरू करण्यात आले. विभागात सर्वाधिक पाणी टंचाईची झळ जळगाव जिल्ह्याला बसली असून, धामणगाव, यावल, रावेर व चोपडा हे चार तालुके वगळता ११ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातील १२६ गावांना १०२ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यातही राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या जामनेर मतदार संघात सर्वाधिक ३४ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसली आहे. जिल्ह्यातील चांदवड, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नाशिक, निफाड हे तालुके वगळता अन्य अकरा तालुक्यातील ९६ गावे १३५ वाड्यांना ६७ टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी या तालुक्यातील २ गावांना २ टॅँकर तर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, शिरपूर वगळता अन्य तीन तालुक्यातील १८ गावांना १५ टॅँकर सुरू आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक