शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

नाशिक विभागात ६ लाख ग्रामस्थांना टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:05 IST

गेल्या वर्षी नाशिक विभागात सरासरी इतक्या पाऊस झाल्याने पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के इतका जलसाठा झाला होता. नदी, नाले दुथडी भरून वाहिले तर ग्रामीण भागातील विहीरीही तुडूंब भरण्यास मदत झाली होती. परंतु खरीप व रब्बी पिकासाठी पाण्याचा झालेला वापर पाहता

ठळक मुद्दे२३७ टॅँकरने पाणी पुरवठा : जळगावला सर्वाधिक दाह

नाशिक : मे महिन्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी पार केल्यानंतर सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून विहीरींनी तळ गाठण्याबरोबरच पाण्याचे स्त्रोत देखील आटल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, नाशिक विभागात ३० तालुक्यातील सुमारे सव्वा सहा लाख ग्रामस्थांना टंचाईची झळ बसली असून, त्यांना २३७ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक पाण्याची टंचाई जळगाव जिल्ह्यात निर्माण झाली असून, त्यानंतर नाशिक व नगर जिल्ह्यात टॅँकर सुरू करण्यात आले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीने टॅँकरची संख्या वाढली आहे.गेल्या वर्षी नाशिक विभागात सरासरी इतक्या पाऊस झाल्याने पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के इतका जलसाठा झाला होता. नदी, नाले दुथडी भरून वाहिले तर ग्रामीण भागातील विहीरीही तुडूंब भरण्यास मदत झाली होती. परंतु खरीप व रब्बी पिकासाठी पाण्याचा झालेला वापर पाहता जानेवारी महिन्यापासूनच काही गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली होती. शासनाने जलयुक्त शिवार योजनेमुळे जमिनीच्या पाण्याची पातळी उंचावल्याची आकडेवारी जाहीर केली असली तरी, प्रत्यक्षात काही ठराविक भागातच पाण्याची पातळी वाढली तर काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीमुळे जलयुक्त शिवार योजना यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. नाशिक विभागातील ५२ तालुक्यापैकी ३० तालुक्यांना यंदा जानेवारी-फेबु्रवारीपासूनच पाणी टंचाई भासू लागल्याने अगोदर शासकीय टॅँकरने त्यांची तहान भागवावी लागली त्यानंतर खासगी टॅँकर सुरू करण्यात आले. विभागात सर्वाधिक पाणी टंचाईची झळ जळगाव जिल्ह्याला बसली असून, धामणगाव, यावल, रावेर व चोपडा हे चार तालुके वगळता ११ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागातील १२६ गावांना १०२ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यातही राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या जामनेर मतदार संघात सर्वाधिक ३४ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसली आहे. जिल्ह्यातील चांदवड, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नाशिक, निफाड हे तालुके वगळता अन्य अकरा तालुक्यातील ९६ गावे १३५ वाड्यांना ६७ टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी या तालुक्यातील २ गावांना २ टॅँकर तर धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, शिरपूर वगळता अन्य तीन तालुक्यातील १८ गावांना १५ टॅँकर सुरू आहेत.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक