शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

५७०० प्रवाशांनी केला बस प्रवास; आदिवासी भागात प्रतिसाद कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:13 IST

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. मात्र गेल्या महिन्यात कंटेन्मेंट झोन वगळून सुरू करण्यात आलेल्या जिल्हांतर्गत बसेसने सुमारे ५७२८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अडकलेल्यांना दिलासा देण्यासाठी सुरू झालेल्या बसेस अजूनही दोन-चार प्रवासी असले तरी त्यांना इच्छितस्थळी पोहोचवत आहे.

नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. मात्र गेल्या महिन्यात कंटेन्मेंट झोन वगळून सुरू करण्यात आलेल्या जिल्हांतर्गत बसेसने सुमारे ५७२८ प्रवाशांनी प्रवास केला आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात अडकलेल्यांना दिलासा देण्यासाठी सुरू झालेल्या बसेस अजूनही दोन-चार प्रवासी असले तरी त्यांना इच्छितस्थळी पोहोचवत आहे.परप्रांतीय प्रवासी आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्यात आल्या होत्या. परराज्यातील सीमा आणि रेल्वेस्थानकांवर प्रवाशांना सोडण्याठी विशेष बाब म्हणून या बसेस धावल्या होत्या.जिल्ह्यातील नागरिकांसाठी देखील जिल्हांतर्गत बसेस सुरू करण्याची मागणी होऊ लागल्याने शासनाच्या आदेशानुसार गेल्या २२ मेपासून जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील दहा आगारांमधून जिल्हा अंतर्गत बससेवेला सुुरुवात झाली.गेल्या २२ मे ते ९ जून या कालावधीत महामंडळाच्या बसेसने ४५३ फेऱ्या करून ५७२६ प्रवाशाांची वाहतूक केली. या माध्यमातून महामंडळाला १ लाख १६ हजार इतकेच उत्पन्न मिळाले आहे. परंतु उत्पन्न मिळविणे हा उद्देश नसून शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रवाशांना सेवा देण्यासाठी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. तिसºया टप्प्यातील लॉकडाऊननंतर आता प्रवाशांची संख्यादेखील वाढू लागलेली आहे.राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना संसर्ग होऊ नये यासाठी फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर तसेच संपूर्ण बस सॅनिटाइझ करून सोडली जात आहे.------------------------अजूनही प्रवाशांची प्रतीक्षागेल्या महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्हांतर्गत दहा आगारांमधून बससेवासुरू झाली असून, आणखी काही ठिकाणाहून बस सुरू होणार आहेत. बसेस सुरू झाल्या असल्या तरी कोरानाच्या प्रभावामुळे तसेच नागरिक घराबाहेर पडत नसल्याने बसेसेला प्रवासीदेखील मिळाले नाही. पहिल्या दिवशी तर अगदीएक आणि दोन प्रवाशांना घेऊन बसेस धावल्या. सुरगाणा,पेठ मार्गावर मात्र बसेसेला मिळणारा प्रतिसाद आजही कायम आहे. इतरत्र मात्र अजूनहीअपेक्षित प्रवासी मिळत नसले तरी बसेस मात्र कायम आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक