शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
2
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
4
'लोकसभेवेळी सर्वांचं आय लव्ह यू असतं. मात्र विधानसभेवेळी...', गुलाबराव पाटील यांचं सूचक विधान, रोख कुणाकडे, चर्चांना उधाण
5
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
6
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...
7
राजकारण तापले उद्धव सेनेच्या जिल्हाप्रमुख बडगुजर यांना हद्दपारची नोटीस
8
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
9
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
10
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
11
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
12
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
13
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
14
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
15
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
16
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
17
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
18
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
19
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
20
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली

नाशिक जिल्ह्यातील धरणात ५५ टक्के पाणी साठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 2:27 PM

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पावसावरही परिणाम होत असल्याचे हवामानखात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देऊन वाढताच कमालिची घट : टॅँकरची वाढली मागणी गेल्या चार महिन्यात ४४ टक्के पाण्याचा वापर

नाशिक : फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालिची घट सुरू झाली असून, आॅक्टोंबर अखेर सरासरी ९८ टक्के पाणी साठा असलेल्या धरणांमध्ये गेल्या चार महिन्यात ४४ टक्के पाण्याचा वापर करण्यात आल्याने सध्या ५५ टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. आगामी काळात उन्हाचे प्रमाण वाढताच पाण्याची टंचाई जाणवू लागणार असून, येवला, मालेगाव व बागलाण या तीन तालुक्यातून फेब्रुवारीतच टॅँकरची मागणी करण्यात आली आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पावसावरही परिणाम होत असल्याचे हवामानखात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आॅक्टोंबर अखेर जिल्ह्यातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये सरासरी ९८ टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता. जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो होवून मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यात पाणी सोडावे लागले होते. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील धरणांतील पाण्यावर आरक्षण टाकण्यात येवून त्यानुसार आवर्तने सोडली जात असून, आज अखेर ३६४२३ दशलक्ष घनफूट म्हणजेच ५५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्यात नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाºया गंगापुर धरण समुहात ७३ टक्के इतके पाणी असून, एकट्या गंगापूर धरणात ७६ टक्के पाणी आहे. कश्यपि धरणात ९५ टक्के तर आळंदीत ७५ टक्के पाणी शिल्लक आहे. पालखेड धरण समुहातून पर जिल्ह्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने ६४ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यात पालखेड धरणात फक्त ४६ टक्के पाणी आहे. दारणा धरणात ७१ टक्के पाणी शिल्लक असून, ओझरखेडला ६८ टक्के पाणी आहे. गिरणा खोºयातील चणकापूरमध्ये ७१ टक्के तर हरणबारीत ६० टक्के व गिरणात ३१ टक्केच पाणी शिल्लक आहे. विशेष म्हणजे यंदा पावसाळ्यात गिरणा धरण दहा वर्षानंतर पुर्णपणे भरले होते. या धरणातील ७० पाण्याचा वापर गेल्या चार महिन्यात करण्यात आला आहे.फेब्रुवारी अखेरपासून सिंचनासाठी असलेले आरक्षण विविध धरणातून सोडण्यात येणार असून, यापुढच्या काळात पाण्याची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणात उपलब्ध असलेल्या एकूण ५५ टक्के पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. प्रशासनाने आरक्षणाव्यतिरीक्त शेतीसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक