शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

नाशिक जिल्ह्यातील धरणात ५५ टक्के पाणी साठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 14:29 IST

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पावसावरही परिणाम होत असल्याचे हवामानखात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देऊन वाढताच कमालिची घट : टॅँकरची वाढली मागणी गेल्या चार महिन्यात ४४ टक्के पाण्याचा वापर

नाशिक : फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालिची घट सुरू झाली असून, आॅक्टोंबर अखेर सरासरी ९८ टक्के पाणी साठा असलेल्या धरणांमध्ये गेल्या चार महिन्यात ४४ टक्के पाण्याचा वापर करण्यात आल्याने सध्या ५५ टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. आगामी काळात उन्हाचे प्रमाण वाढताच पाण्याची टंचाई जाणवू लागणार असून, येवला, मालेगाव व बागलाण या तीन तालुक्यातून फेब्रुवारीतच टॅँकरची मागणी करण्यात आली आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पावसावरही परिणाम होत असल्याचे हवामानखात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आॅक्टोंबर अखेर जिल्ह्यातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये सरासरी ९८ टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता. जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो होवून मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यात पाणी सोडावे लागले होते. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील धरणांतील पाण्यावर आरक्षण टाकण्यात येवून त्यानुसार आवर्तने सोडली जात असून, आज अखेर ३६४२३ दशलक्ष घनफूट म्हणजेच ५५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्यात नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाºया गंगापुर धरण समुहात ७३ टक्के इतके पाणी असून, एकट्या गंगापूर धरणात ७६ टक्के पाणी आहे. कश्यपि धरणात ९५ टक्के तर आळंदीत ७५ टक्के पाणी शिल्लक आहे. पालखेड धरण समुहातून पर जिल्ह्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने ६४ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यात पालखेड धरणात फक्त ४६ टक्के पाणी आहे. दारणा धरणात ७१ टक्के पाणी शिल्लक असून, ओझरखेडला ६८ टक्के पाणी आहे. गिरणा खोºयातील चणकापूरमध्ये ७१ टक्के तर हरणबारीत ६० टक्के व गिरणात ३१ टक्केच पाणी शिल्लक आहे. विशेष म्हणजे यंदा पावसाळ्यात गिरणा धरण दहा वर्षानंतर पुर्णपणे भरले होते. या धरणातील ७० पाण्याचा वापर गेल्या चार महिन्यात करण्यात आला आहे.फेब्रुवारी अखेरपासून सिंचनासाठी असलेले आरक्षण विविध धरणातून सोडण्यात येणार असून, यापुढच्या काळात पाण्याची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणात उपलब्ध असलेल्या एकूण ५५ टक्के पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. प्रशासनाने आरक्षणाव्यतिरीक्त शेतीसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक