शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील धरणात ५५ टक्के पाणी साठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 14:29 IST

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पावसावरही परिणाम होत असल्याचे हवामानखात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देऊन वाढताच कमालिची घट : टॅँकरची वाढली मागणी गेल्या चार महिन्यात ४४ टक्के पाण्याचा वापर

नाशिक : फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालिची घट सुरू झाली असून, आॅक्टोंबर अखेर सरासरी ९८ टक्के पाणी साठा असलेल्या धरणांमध्ये गेल्या चार महिन्यात ४४ टक्के पाण्याचा वापर करण्यात आल्याने सध्या ५५ टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. आगामी काळात उन्हाचे प्रमाण वाढताच पाण्याची टंचाई जाणवू लागणार असून, येवला, मालेगाव व बागलाण या तीन तालुक्यातून फेब्रुवारीतच टॅँकरची मागणी करण्यात आली आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १३८ टक्के इतका पाऊस झाल्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असली तरी, थंडीचा काळ लांबल्यामुळे त्याचा पावसावरही परिणाम होत असल्याचे हवामानखात्याच्या जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आॅक्टोंबर अखेर जिल्ह्यातील लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये सरासरी ९८ टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता. जवळपास सर्वच धरणे ओव्हरफ्लो होवून मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यात पाणी सोडावे लागले होते. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील धरणांतील पाण्यावर आरक्षण टाकण्यात येवून त्यानुसार आवर्तने सोडली जात असून, आज अखेर ३६४२३ दशलक्ष घनफूट म्हणजेच ५५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्यात नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाºया गंगापुर धरण समुहात ७३ टक्के इतके पाणी असून, एकट्या गंगापूर धरणात ७६ टक्के पाणी आहे. कश्यपि धरणात ९५ टक्के तर आळंदीत ७५ टक्के पाणी शिल्लक आहे. पालखेड धरण समुहातून पर जिल्ह्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने ६४ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यात पालखेड धरणात फक्त ४६ टक्के पाणी आहे. दारणा धरणात ७१ टक्के पाणी शिल्लक असून, ओझरखेडला ६८ टक्के पाणी आहे. गिरणा खोºयातील चणकापूरमध्ये ७१ टक्के तर हरणबारीत ६० टक्के व गिरणात ३१ टक्केच पाणी शिल्लक आहे. विशेष म्हणजे यंदा पावसाळ्यात गिरणा धरण दहा वर्षानंतर पुर्णपणे भरले होते. या धरणातील ७० पाण्याचा वापर गेल्या चार महिन्यात करण्यात आला आहे.फेब्रुवारी अखेरपासून सिंचनासाठी असलेले आरक्षण विविध धरणातून सोडण्यात येणार असून, यापुढच्या काळात पाण्याची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणात उपलब्ध असलेल्या एकूण ५५ टक्के पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. प्रशासनाने आरक्षणाव्यतिरीक्त शेतीसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक