शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५२६ लम्पीबाधित; ३० जनावरांचा मृत्यू

By sandeep.bhalerao | Updated: August 30, 2023 17:27 IST

आतापर्यंत ३० जनावरे दगावली असून, ५५ जनावरांची स्थिती गंभीर आहे. 

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा झाल्याने सुमारे ५२६ जनावरे बाधित झाली आहेत. या जनावरांचे विलगीकरण आणि गोठे निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. आतापर्यंत ३० जनावरे दगावली असून, ५५ जनावरांची स्थिती गंभीर आहे. 

लम्पीचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्ह्यात चार ठिकाणी भरणारे जनावरांचे बाजारदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव पुन्हा होऊ लागला असून, ५०० पेक्षा अधिक जनावरांना लागण झाली आहे. मात्र, जनावरांचे जवळपास शंभर टक्के लसीकरण झाल्याने लागण झालेल्या जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे सौम्य असल्याचेही सांगण्यात आले. सौम्य, मध्यम तीव्र आणि अतितीव्र असे लम्पी जनावरांचे वर्गीकरण करण्यात येत असून, त्यानुसार उपचार केले जात आहेत. शेतकरी, गोठेधारकांचे लम्पी आजाराबाबत प्रबोधन करण्याची मोहीम सुरू असल्याचेदेखील पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

मागील वर्षी लम्पी आजाराची लागण झाल्याने ११५ जनावरांचा मृत्यू झाला होता. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकमध्ये पशुधनाचा अशाप्रकारचा मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. यंदा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या लसीकरणामुळे पशुधनाचे नुकसान फारसे झाले नसल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आला. 

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगDeathमृत्यूFarmerशेतकरी