शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

धरणांमध्ये ५० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:59 IST

नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरणसाठ्यांमध्ये कमालिची वाढ झाली असून, आठवडाभरात पंधरा टक्के म्हणजेच धरणांमध्ये क्षमतेपेक्षा निम्मा जलसाठा झाला आहे, त्याच बरोबर पावसाची वार्षिक सरासरी देखील ६१ टक्क्यांवर पोहोचली आहे.

ठळक मुद्देपावसाची संततधार : सरासरी पोहोचली ६१ टक्क्यांवर; पिकांनाही जीवदान

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरणसाठ्यांमध्ये कमालिची वाढ झाली असून, आठवडाभरात पंधरा टक्के म्हणजेच धरणांमध्ये क्षमतेपेक्षा निम्मा जलसाठा झाला आहे, त्याच बरोबर पावसाची वार्षिक सरासरी देखील ६१ टक्क्यांवर पोहोचली आहे. दरम्यान, पावसाच्या आगमनामुळे शेतीपिकांना जीवदान मिळाले असून, शेतकरी वर्ग आनंदला आहे.जुन महिन्याच्या प्रारंभी जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने त्यानंतर थेट दिड महिना दडी मारली त्यामुळे पावसाच्या भरवशावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले. मका, सोयाबीन, भूईमूग, बाजरी या पिकांना पाण्याची गरज असतानाच पाऊस लांबल्यामुळे पिके धोक्यात आली, त्याच पावसाअभावी धरणांमध्येही जलसाठा होवू शकला नव्हता त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्तकेली होती. राज्यात अन्यत्र चांगला पाऊस होत असताना जिल्ह्णाकडेच पावसाने वक्रदृष्टी केल्याने चिंता व्यक्त केली.दुष्काळी तालुक्यांवर कृपापावसाच्या पुनरागमनामुळे आॅगष्ट महिन्याच्या एकूण सरासरीच्या तुलनेत ४७ टक्के पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या हा पाऊस ६१ टक्के इतका आहे. सर्वाधिक कमी पाऊस पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया पेठ व त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यात अनुक्रमे ३६ व ३५ टक्के इतकाच झाला आहे. तर सुरगाणा तालुक्यातही ३७ टक्के पाऊस आहे. इगतपुरी तालुक्यात मात्र ७१ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाºया मालेगाव तालुक्यात यंदा १२४, बागलाणला १२१ आणि सिन्नरला १०८ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे.इगतपुरी तालुक्यात १४५ मिमी पाऊसच्वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसात १४५ मिमी पाऊस झाला. दमदार पावसामुळे दोन दिवसात तालुक्यातील मोठ्या व लहान धरण प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली, भाम व वैतरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. तालुक्यात एकूण २२०१ मिमी पावसाची नोंद झाली. दारणा धरणातून नऊ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला तर भरलेली धरणातूनही ७०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भाम धरण ८३ टक्के, कडवा ५१, मुकणे ४६ तर वाकी धरण ३१ टक्के भरले आहे. वैतरणा धरणही ६० टक्के भरले आहे.नांदूरमधमेश्वर धरणातून १६८६५ क्यूसेक विसर्गनाशिक शहरात व धरण क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सकाळी ९४६५ क्यूसेक पाणी सोडण्यात आले तर दुपारपासून विसर्ग वाढवून सायंकाळी ६ वाजता १६,८६५ क्यूसेक पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसWaterपाणी