शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
4
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
5
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
6
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
7
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
8
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
9
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
10
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
11
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
12
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
13
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
14
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
15
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
16
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
17
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
18
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
19
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
20
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

४५ गावे टॅँकरमुक्त; यंदा चारच गावांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:24 IST

सटाणा :यंदा ऐन उन्हाळ्यात दरवर्षी येणाऱ्या पाणी संकटाऐवजी कोरोनासारखे महाभयंकर संकट उभे ठाकले आहे. त्याचा सामना करण्यासाठी लॉकडाउनसारखा प्रयत्न शासनाला करावा लागत आहे. त्याचे परिणाम सर्वत्र जाणवत असले तरी बागलाणमध्ये या निमित्ताने पाण्याची नासाडी थांबली आहे. परिणामी यंदा आवर्तन सोडण्याच्या मागणीने जोर धरला नाही.

सटाणा : (िनतीन बोरसे ) यंदा ऐन उन्हाळ्यात दरवर्षी येणाऱ्या पाणी संकटाऐवजी कोरोनासारखे महाभयंकर संकट उभे ठाकले आहे. त्याचा सामना करण्यासाठी लॉकडाउनसारखा प्रयत्न शासनाला करावा लागत आहे. त्याचे परिणाम सर्वत्र जाणवत असले तरी बागलाणमध्ये या निमित्ताने पाण्याची नासाडी थांबली आहे. परिणामी यंदा आवर्तन सोडण्याच्या मागणीने जोर धरला नाही. आज पाण्याचे कोणतेही स्रोत नसलेल्या आणि नेहमी टॅँकरच्या प्रतीक्षेत राहणाºया चार वाड्यावगळता सर्वत्र मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे बागलाण आजतरी पाण्याच्या बाबतीत संतुष्ट असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने ४५ गावे टॅँकरमुक्त झाली आहेत. त्यामुळे यंदा चारच गावांकडून टॅँकर मागणीचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे दाखल झाले आहेत. त्यातील दोन गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरूही झालेला आहे.यं दा बागलाणमध्ये परतीच्या पावसामुळे खरीप वाया गेला असला तरी सलग चार वर्षांपासून दुष्काळाशी सामना करणाºया शेतकऱ्यांचा मात्र नक्कीच दुष्काळ हटला आहे. विहिरींना मुबलक पाणी आल्यामुळे रब्बी हंगाम शंभर टक्के हातात आला, बागलाणमधील मोसम, आरम, हत्ती, कान्हेरी, दोध्याड आदी उपनद्या, नाले फेब्रुवारीपर्यंत वाहिल्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत मिळाली. तालुक्यातील वायगाव, अजमीर सौंदाणे, कºहे, चौगाव, देवळाणे, सुराणे, रातीर, रामतीर, सारदे हा भाग नेहमीच अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असतो. यंदा सुराणे येथील लघुप्रकल्प तब्बल सात वर्षांनी भरल्याने या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत मिळाली आहे. दरम्यान, यंदा मुबलक प्रमाणात पाणी असले तरी मोठ्या गावांमध्ये अतिपाण्याच्या उपशामुळे टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे मार्च महिन्यात हे संकट घोंगावत असताना कोरोनासारख्या महाभयंकर संकटाने तोंड वर काढले. या संकटाशी सामना करण्यासाठी शासनाने सर्वच पातळीवर प्रयत्न केले. लॉकडाउन सारखा न परवडणारा प्रयत्नदेखील आज करावा लागत आहे. त्याचे परिणामदेखील सर्वच क्षेत्रात जाणवत असताना लग्नकार्य, विविध कार्यक्रम, विनाकारण होणारा पाण्याचा उपसा यामुळे साहजिकच पाण्याची नासाडी होते. ती या लॉकडाउनमुळे नक्कीच थांबण्यास मदत मिळाली आहे. त्यामुळे हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पांमधून पाण्याची मागणी झाली नाही. साहजिकच पाण्याच्या मुबलकतेमुळे बागलाण आजतरी संतुष्ट असल्याचे दिसून येत आहे.-------------------------------------------पुनंद पाणीपुरवठा योजना रखडलीसटाणा शहरासाठी मंजूर असलेल्या पुनंद पाणीपुरवठा या महत्त्वाकांक्षी योजनेचे काम मात्र कोरोनामुळे रखडले आहे. जलवाहिन्या टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना या महाभयंकर संकटामुळे लॉकडाउन करावा लागला. याचा परिणाम योजनेच्या कामावर झाला आहे. गेल्या मार्च अखेरीस जलवाहिन्या चाचणी करण्याचे काम पूर्ण होऊन एप्रिल महिन्यात शहराला पुनंदचे पाणी मिळणार होते. मात्र लॉकडाउनमुळे काम रखडले आहे. असे असले तरी चणकापूर, पुनंद आणि केळझरच्या आवर्तनामुळे ठेंगोडा पाणीपुरवठा योजना सुरळीत आहे. परिणामी, टंचाईच्या झळा आजतरी शहराला बसत नसल्याचे चित्र आहे.------------------------------यंदा टॅँकरची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परतीच्या पावसामुळे सर्वच जलाशय शंभर टक्के भरली असल्यामुळे तब्बल४५ गावे टॅँकर मुक्त झाली. यंदा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कातरवेल, दोधनपाडा, वघाणेपाडा आणि रातीर या चार गावांचे टॅँकरचे प्रस्ताव आले असून, कातरवेल, दोधनपाडा येथे टॅँकर मंजूर करण्यात आले आहे. लवकरच उर्वरित गावांना टॅँकर सुरू करण्यात येईल.- जितेंद्र इंगळे पाटील, तहसीलदार, बागलाण-----------------------------------१ बागलाणमध्ये सटाणा शहरानंतर नामपूर गाव हे सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. मोसम तीरावरील हे गाव एकेकाळी उसाचे आगार म्हणून ओळखले जात असे. मात्र मसाल्याची बाजारपेठ, आडकित्तासाठीदेखील हे गाव उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.२ साहजिकच हे गाव आज बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे. सहकारमहर्षी व शिखर बँकेचे माजी उपाध्यक्ष कै. जयवंतराव सावंत यांनीदेखील या गावचे अनेक वर्ष नेतृत्व केले. त्यांचा गावाच्या विकासात सिंहाचा वाटा आहे.३ त्यांच्या काळात केलेल्या पाणी योजनाच आतापर्यंत नामपूरकरांची तहान भागवत आहे. कालांतराने सत्तापरिवर्तनझाले आणि पाणी योजनेलाग्रहण लागले. नामपूर गावटॅँकरग्रस्त गावांच्या यादीत एक नंबरला आले.४ तीन वर्षांपूर्वी डॉ. दिकपाल गिरासे यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन युती सरकारने सिमेंट बंधाºयाला मंजुरी दिली. नामपूरजवळ मोसम नदीवर बांधलेल्या या बंधाºयामुळे पाण्याचे स्रोत जिवंत होऊन आज नामपूर गाव टंचाई मुक्त झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक