शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

४२ खेड्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:59 IST

नांदगाव : तालुक्यातील नाग्यासाक्या धरणातून राबविण्यात आलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना वीजबिल थकल्याने तब्बल २९ दिवस बंद होती. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती.वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर नांदगाव तालुक्यातील २६ व चांदवड तालुक्यातील १६ गावांचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

ठळक मुद्देवीजबिलाचा भरणा; पाणी समस्या दूर

नांदगाव : तालुक्यातील नाग्यासाक्या धरणातून राबविण्यात आलेली ४२ खेडी पाणीपुरवठा योजना वीजबिल थकल्याने तब्बल २९ दिवस बंद होती. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. १७ लाख ५१ हजार रुपये थकीत बिलापैकी ५ लाख २५ हजार रुपयांचा रोख भरणा केल्यानंतर सदर योजना पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे नांदगावचा पाणीपुरवठा पूर्ववत होऊ शकला आहे. दि. १२ जुलै रोजी योजनेचा वीजपुरवठा थकीत बिलामुळे महावितरण कंपनीकडून बंद करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून नांदगावकरांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागला. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर नांदगाव तालुक्यातील २६ व चांदवड तालुक्यातील १६ गावांचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे.धरणातून अवैध उपसापिण्याच्या पाण्याच्या योजनेची अशी परवड झालेली असताना दुसरीकडे याच धरणाचे पाणी शेती व अन्य कारणासाठी अविरत उपसण्याचे काम पंपाद्वारे सुरू होते. २० अश्वशक्तीचे सुमारे २०० पंप या कामाला जुंपले होते. यामुळे धरणातले पाणी मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा बंद झाल्यानंतरही सुमारे २५ दिवस पंप सुरू होते. पिण्याच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्या व त्यांना साहाय्य करणाºया वीज वितरण कंपनी व जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाºयांवर याची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई