शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

४२ बिबट्यांनी सोडला रस्त्यावर प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:26 IST

जंगलतोडीमुळे अस्तित्वासाठी संघर्ष करणारा बिबट्याला महामार्गावरील बेफाम वाहतुकीला बळी पडावे लागत आहे. या चार वर्षांमध्ये ४२ बिबट्यांना शहरासह जिल्ह्याच्या हद्दीत रस्त्यांवर अपघातात प्राण सोडावा लागला असून, निसर्गाची ही अपरिमितहानी रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांसह नागरिकांनी जबाबदारीने सुरक्षित वाहतुकीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

लोकमत  विशेषनाशिक : जंगलतोडीमुळे अस्तित्वासाठी संघर्ष करणारा बिबट्याला महामार्गावरील बेफाम वाहतुकीला बळी पडावे लागत आहे. या चार वर्षांमध्ये ४२ बिबट्यांना शहरासह जिल्ह्याच्या हद्दीत रस्त्यांवर अपघातात प्राण सोडावा लागला असून, निसर्गाची ही अपरिमितहानी रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांसह नागरिकांनी जबाबदारीने सुरक्षित वाहतुकीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.बिबट्याचा रस्त्यांवर अपघात होऊन मृत्यू होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, निसर्गाची मोठी हानी यामुळे होत आहे. निसर्गाची हानी रोखण्यासाठी नागरिकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. महामार्गावरून रात्री तसेच दिवसाही वेगमर्यादेचे पालन करत मार्गस्थ व्हावे. रात्रीच्या वेळी वन्यजिवांचा वावर महामार्गाच्या कडेला वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आजूबाजूच्या जंगलाचा अंदाज घेत किमान वेगमर्यादेत वाहन त्या भागातून चालविण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. आडगावजवळ मंगळवारी मृतावस्थेत आढळलेला बिबट्यादेखील अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होऊन गतप्राण झाल्याचे समोर आले आहे. मानव-बिबट संघर्ष जिल्ह्यात अनेकदा काही तालुक्यांमध्ये निर्माण झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. मनुष्यप्राण्याने आपल्या हव्यासापोटी निसर्गाला ओरबाडण्यास सुरुवात केल्यामुळे बिबट्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. बिबट्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवास व मुबलक खाद्य उपलब्ध होत नसल्यामुळे त्याने मानवी वस्तीकडे मोर्चा वळविला आहे. मार्जार कुळातील हा वन्यप्राणी कुठल्याही अधिवासासोबत तितक्याच तत्परतेने जुळवून घेण्यास तरबेज आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागात बिबट जेरबंद होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यावरून मानव-बिबट संघर्ष ओढवला असून, त्यावर जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांचा बिबट व अन्य वन्यप्राण्यांविषयीचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.मुंबई-आग्रा महामार्ग अधिक धोक्याचामुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत कसारा घाट ओलांडल्यानंतर थेट मालेगावपर्यंत मोठ्या संख्येने बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. हा महामार्ग नाशिक पूर्व व पश्चिम वनविभागाच्या हद्दीतून जातो. यासंदर्भात ज्या भागात वन्यजिवांचा वावर अधिक आहे तेथे महामार्गाभोवती लोखंडी रेलिंग बसविणे तसेच रस्त्यालगत ठळक अक्षरात वन्यजिवांच्या छायाचित्रासह सूचना फलक लावण्याबाबतचे पत्र राज्य महामार्ग प्राधिकरण विभागाला दिले जाणार असल्याचे सहायक वनसंरक्षक राजेंद्र मगदुम यांनी सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यूAccidentअपघात