शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

गिरणा धरणाचा जलसाठा चाळीस टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:04 IST

नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमता असलेले नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन (दि. २२) सायंकाळपर्यंत धरणसाठा चाळीस टक्क्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील १३५ गावांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील काही गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

साकोरा : नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमता असलेले नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन (दि. २२) सायंकाळपर्यंत धरणसाठा चाळीस टक्क्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील १३५ गावांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील काही गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.  गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावली. त्यातच चणकापूर, हरणबारी, केळझर ही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने या धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, हे पाणी गिरणा धरणात येत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस असलेला धरणाचा जलसाठा नऊ टक्यांवरून चाळीस टक्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील मुख्यत: अवलंबून असलेल्या १३५ गावांबरोबरच चाळीसगाव शहराचा पिण्याच्या पाण्याबरोबरच काही प्रमाणात सिंचनाचा प्रश्नही सुटण्यास आता मदत होणार आहे.गिरणा धरण नाशिक जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असले तरी याचा सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होत असतो. या धरणात किमान तीस टक्के जलसाठा असल्यास यावर विसंबून असलेल्या जळगाव जिल्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत असतो. याशिवाय या धरणावर मालेगाव महानगरपालिका, नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजना, दहीवाळ पाणीपुरवठा योजना यांच्यासह धरण परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याबरोबरच मालेगावसह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, अमळनेर या तालुक्यांना शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी या धरणावर अवलंबून राहावे लागत असल्याने आज तरी तूर्तास पाण्याचा प्रश्न सुटला असल्याचे बोलले जात आहे.जलसिंचनामुळे फायदे मिळविणारे तालुकेचाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, पारोळा, अमळनेर, मालेगाव, धुळेकालव्याच्या कक्षेत येणारे क्षेत्र - २,६३,३७७ एकरजलसिंचनाखाली येणारे क्षेत्र - १,४१,३६४ एकरकालव्याची लांबीअ) वसंतदादा पाटील कालवा - ५३, २० किमीब) जामदा डावा कालवा - ५६, ३० किमीक) जामदा उजवा कालवा - ३३,१९ किमीड) निम्न गिरणा - ४५, ०६ किमी

टॅग्स :Girna riverगिरणा नदीDamधरण