शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
4
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
5
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची ही गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
6
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
7
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
8
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
9
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
10
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
11
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
12
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
13
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
14
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
15
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
16
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
17
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
18
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
19
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
20
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?

आंध्र प्रदेशच्या समितीकडून ३८ गाव योजनेची पाहणी

By admin | Updated: July 5, 2017 00:21 IST

येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजना यशस्वी झाल्याने आंध्र प्रदेशात योजना राबविण्याचे प्रशासनाने ठरविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजना यशस्वी झाल्याने या धर्तीवर आंध्र प्रदेशात योजना राबविण्याचे तेथील प्रशासनाने ठरविले आहे. त्यासाठी तेथील शासनाने ४० लोकांची एक समिती ३८ गाव योजना पाहणी करण्यासाठी पाठविली होती. या समितीने मंगळवारी येथे भेट देऊन संपूर्ण योजनेची पाहणी करून माहिती घेतली.मागील आर्थिक वर्षात जागतिक बँकेने संपूर्ण देशात सामूहिक पाणीपुरवठा योजनांचा सर्व्हे केला होता. त्यात भारतातील तीन योजना आग्रक्र माने निवडण्यात आल्या होत्या. उत्कृष्ट नियोजन आणि नफ्यात असलेली येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा ही एकमेव योजना असल्याने देशातील सर्वोकृष्ट पाणीपुरवठा योजना ठरली होती. महाराष्ट्रासह इतर राज्यातही अनेक गाव मिळून चालविल्या जाणाऱ्या अनेक पाणी योजना अस्तित्वात आहेत. परंतु सर्वत्र योजना बंद असल्याचेच उदाहरण पहायला मिळते. विशाखपट्टणम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ए. आप्पाराव, कृषी सभापती के. दामोधरराव, जिल्हा परिषद सदस्य गंगा भवानी, जल संधारणाचे उपअभियंता ए. सावित्री, शाखा अभियंता के. रामास्वामी व राज्यातील ठरावीक सरपंच यांचेसह ४० सदस्य या समितीत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता बाभूळगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रास समितीने भेट दिली. त्यानंतर अनकाई येथील एमबीआर येथे भेट दिली. त्यानंतर अनकुटे येथे प्रत्येक घरी भेट देऊन योजनेचे पाणी कसे पोहचते आणि वसुली कशी केली जाते, याविषयी माहिती जाणून घेतली.आंध्र प्रदेश राज्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने अशा प्रकारच्या योजनांचे काम पूर्ण झालेले आहे. परंतु योजना चालविल्यास त्यावरील खर्च जास्त होतो व कालांतराने योजना बंद पडते. त्यामुळे महाराष्ट्रात प्रयोगीक तत्वावर स्थानिक समितीमार्फत चालविण्यात आलेली व यशस्वी असलेली ही एकमेव योजना असल्याने आंध्र प्रदेश शासनाने सदर समितीस अभ्यास दौऱ्यासाठी येवला येथे पाठविले आहे. ३८ गाव पाणी पुरवठा समितीचे पाणी वितरण, पाणी पट्टी वसुली व कामाचे नियोजन पाहुन अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या समितीने समाधान व्यक्त केले. याप्रसंगी ३८ गाव पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, शिवसेना नेते संभाजी पवार, बाळासाहेब लोखंडे, गटविकास अधिकारी सुनील अहीरे, कांतीलाल साळवे, प्रविण गायकवाड, विठ्ठल आठशेरे, बाळासाहेब गुंड, भाऊसाहेब गरु ड, सुनील आहिरे, गणेशा, अशोक बिन्नर, उत्तम घुले, प्रमोद तक्ते, सतीश बागुल, एस.एम.गणेशे, जिजाबाई गायकवाड, बापूसाहेब गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.