शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आंध्र प्रदेशच्या समितीकडून ३८ गाव योजनेची पाहणी

By admin | Updated: July 5, 2017 00:21 IST

येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजना यशस्वी झाल्याने आंध्र प्रदेशात योजना राबविण्याचे प्रशासनाने ठरविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजना यशस्वी झाल्याने या धर्तीवर आंध्र प्रदेशात योजना राबविण्याचे तेथील प्रशासनाने ठरविले आहे. त्यासाठी तेथील शासनाने ४० लोकांची एक समिती ३८ गाव योजना पाहणी करण्यासाठी पाठविली होती. या समितीने मंगळवारी येथे भेट देऊन संपूर्ण योजनेची पाहणी करून माहिती घेतली.मागील आर्थिक वर्षात जागतिक बँकेने संपूर्ण देशात सामूहिक पाणीपुरवठा योजनांचा सर्व्हे केला होता. त्यात भारतातील तीन योजना आग्रक्र माने निवडण्यात आल्या होत्या. उत्कृष्ट नियोजन आणि नफ्यात असलेली येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा ही एकमेव योजना असल्याने देशातील सर्वोकृष्ट पाणीपुरवठा योजना ठरली होती. महाराष्ट्रासह इतर राज्यातही अनेक गाव मिळून चालविल्या जाणाऱ्या अनेक पाणी योजना अस्तित्वात आहेत. परंतु सर्वत्र योजना बंद असल्याचेच उदाहरण पहायला मिळते. विशाखपट्टणम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ए. आप्पाराव, कृषी सभापती के. दामोधरराव, जिल्हा परिषद सदस्य गंगा भवानी, जल संधारणाचे उपअभियंता ए. सावित्री, शाखा अभियंता के. रामास्वामी व राज्यातील ठरावीक सरपंच यांचेसह ४० सदस्य या समितीत होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता बाभूळगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रास समितीने भेट दिली. त्यानंतर अनकाई येथील एमबीआर येथे भेट दिली. त्यानंतर अनकुटे येथे प्रत्येक घरी भेट देऊन योजनेचे पाणी कसे पोहचते आणि वसुली कशी केली जाते, याविषयी माहिती जाणून घेतली.आंध्र प्रदेश राज्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने अशा प्रकारच्या योजनांचे काम पूर्ण झालेले आहे. परंतु योजना चालविल्यास त्यावरील खर्च जास्त होतो व कालांतराने योजना बंद पडते. त्यामुळे महाराष्ट्रात प्रयोगीक तत्वावर स्थानिक समितीमार्फत चालविण्यात आलेली व यशस्वी असलेली ही एकमेव योजना असल्याने आंध्र प्रदेश शासनाने सदर समितीस अभ्यास दौऱ्यासाठी येवला येथे पाठविले आहे. ३८ गाव पाणी पुरवठा समितीचे पाणी वितरण, पाणी पट्टी वसुली व कामाचे नियोजन पाहुन अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या समितीने समाधान व्यक्त केले. याप्रसंगी ३८ गाव पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, शिवसेना नेते संभाजी पवार, बाळासाहेब लोखंडे, गटविकास अधिकारी सुनील अहीरे, कांतीलाल साळवे, प्रविण गायकवाड, विठ्ठल आठशेरे, बाळासाहेब गुंड, भाऊसाहेब गरु ड, सुनील आहिरे, गणेशा, अशोक बिन्नर, उत्तम घुले, प्रमोद तक्ते, सतीश बागुल, एस.एम.गणेशे, जिजाबाई गायकवाड, बापूसाहेब गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.