शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

तीन वर्षांत ३५३ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू, सानुग्रह अनुदानाबाबत चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 07:58 IST

नाशिक - मागील तीन वर्षात शासकीय आश्रमशाळेतील 353 विद्यार्थ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांचा ...

ठळक मुद्देआदिवासी विकास विभागामार्फत मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप केले जाते.

नाशिक - मागील तीन वर्षात शासकीय आश्रमशाळेतील 353 विद्यार्थ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांचा पालकांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला असला तरी शाळेत असताना झालेल्या मृत्यूबाबत काय कारवाई झाली, हा प्रश्नच आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदान वाटपातही चालढकल होत आहे. 

आदिवासी विकास विभागामार्फत मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप केले जाते. बहुतेक पालकांना अनुदान मिळाले असले तरी, सन 2020-21 मधील 19 विद्यार्थ्यांचे पालक अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. राज्यात एकू 499 शासकीय आश्रमशाळा चालवल्या जातात. ही अनुदान योजना 2018 पासून राबविली जात आहे. शाळेत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तरच, त्याची जबाबदारी शाळांवर असते. सन 2018 ते 2020 या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण 353 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 

ही आहेत मृत्यूची कारणे

आश्रमशाळांमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांचा पालकांच्या ताब्यात असताना मृत्यू झाला असल्याचे सांगितले जाते. यात अपघात, आजारपण, सर्पदंश, उंचावरुन पडल्याने, विहिरीत पडून अशा वेगवेगळ्या कारणांनी विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असतो. अनेकवेळा विद्यार्थी पालकांबरोबरच मोलमजुरी करण्यासाठी बाहेरगावी जात असतात काहीवेळा तिकडेच त्यांच्यावर संकट ओढवत असते.

 

विभागनिहाय मृत विद्यार्थ्यांची संख्या

विभाग २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१

नाशिक ४२ ६२ ६२

ठाणे २१ २६ ३६

अमरावती १५ १८ १८

नागपूर १० १३ ३०

टॅग्स :NashikनाशिकTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाStudentविद्यार्थी