शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मिळाले ३२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 01:34 IST

मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेबरमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मेाठा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ केाटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार उर्वरित मदतीची रक्कम जिल्ह्याला मिळाली असल्याने उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहेत.

ठळक मुद्देअखेर निधी प्राप्त : उर्वरित शेतकऱ्यांना मिळणार मदत

नाशिक: मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेबरमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मेाठा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ केाटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार उर्वरित मदतीची रक्कम जिल्ह्याला मिळाली असल्याने उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहेत.

मागील वर्षी लहरी निसर्गाचा फटका जिल्ह्याला बसला आणि मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने चिंता व्यक्त केली जात असतांनाच ऑगस्ट-सप्टेबरमध्ये अवकाळी पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. शेतातील उभे पिके आडवी झाली, तर काढणीच्या पिकांनाही फटका बसला. जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे विविध ठिकाणी नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने पंचमाने करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १४७ कोटींच्या मदतीचा अहवाल पाठविण्यात आला होता. नुकसानग्रस्त एकूण ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना ३२ कोटी २९ लक्ष रुपयांचा निधी आता प्राप्त झाला असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

साधारणत: अडीच तीन महिन्यांपूर्वी मदतीच्या पहिल्या टप्प्यातील १२० कोटींचा निधी जिल्हाला प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त ७५ टक्के शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना आता मदतीचे वाटप केले जाणार आहे.

--इन्फो -

तालुकानिहाय मदत

येवला तालुक्याला १५ कोटी २४ लक्ष, नांदगाव तालुक्याला १५ कोटी ७४ लक्ष, देवळा तालुक्याला ८३ हजार, सुरगाणा तालुक्याला ४ लक्ष ५६ हजार, त्र्यंबकेश्वर तालुक्याला ९५ हजार, इगतपुरी तालुक्याला ३ लक्ष १७ हजार, पेठ तालुक्याला ३ लक्ष ७१ हजार तर निफाड तालुक्याला १ कोटी १७ लक्ष रुपये, असा एकूण नाशिक जिल्ह्यातील ८ नुकसानग्रस्त तालुक्यांना ३२ कोटी २९ लक्ष निधी प्राप्त झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीMONEYपैसा