शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मिळाले ३२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 01:34 IST

मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेबरमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मेाठा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ केाटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार उर्वरित मदतीची रक्कम जिल्ह्याला मिळाली असल्याने उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहेत.

ठळक मुद्देअखेर निधी प्राप्त : उर्वरित शेतकऱ्यांना मिळणार मदत

नाशिक: मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेबरमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मेाठा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४७ केाटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार उर्वरित मदतीची रक्कम जिल्ह्याला मिळाली असल्याने उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहेत.

मागील वर्षी लहरी निसर्गाचा फटका जिल्ह्याला बसला आणि मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने चिंता व्यक्त केली जात असतांनाच ऑगस्ट-सप्टेबरमध्ये अवकाळी पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. शेतातील उभे पिके आडवी झाली, तर काढणीच्या पिकांनाही फटका बसला. जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे विविध ठिकाणी नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने पंचमाने करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १४७ कोटींच्या मदतीचा अहवाल पाठविण्यात आला होता. नुकसानग्रस्त एकूण ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना ३२ कोटी २९ लक्ष रुपयांचा निधी आता प्राप्त झाला असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

साधारणत: अडीच तीन महिन्यांपूर्वी मदतीच्या पहिल्या टप्प्यातील १२० कोटींचा निधी जिल्हाला प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त ७५ टक्के शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांना आता मदतीचे वाटप केले जाणार आहे.

--इन्फो -

तालुकानिहाय मदत

येवला तालुक्याला १५ कोटी २४ लक्ष, नांदगाव तालुक्याला १५ कोटी ७४ लक्ष, देवळा तालुक्याला ८३ हजार, सुरगाणा तालुक्याला ४ लक्ष ५६ हजार, त्र्यंबकेश्वर तालुक्याला ९५ हजार, इगतपुरी तालुक्याला ३ लक्ष १७ हजार, पेठ तालुक्याला ३ लक्ष ७१ हजार तर निफाड तालुक्याला १ कोटी १७ लक्ष रुपये, असा एकूण नाशिक जिल्ह्यातील ८ नुकसानग्रस्त तालुक्यांना ३२ कोटी २९ लक्ष निधी प्राप्त झाला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीMONEYपैसा