शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
3
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
4
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
5
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
6
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
7
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
8
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
9
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
10
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
11
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
12
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
13
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
14
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
15
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
16
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
17
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
18
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
19
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
20
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील धरणांमध्ये ३० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:26 IST

नाशिक : यंदा मान्सूनचे वेळेत आगमन होऊन पाच तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय अशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात ३ जुलैअखेर ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देपेठ-सुरगाण्याला पावसाची प्रतीक्षा । पाच तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : यंदा मान्सूनचे वेळेत आगमन होऊन पाच तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय अशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात ३ जुलैअखेर ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यात अद्याप पेठ आणि सुरगाण्यात अपेक्षित अशी पावसाची नोंद झालेली नाही तर बागलाण तालुक्यात सर्वाधिक वार्षिक सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक ७८ टक्के पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असल्या तरी अनेक भागात अद्यापही बियाणांचा व खतांचा तुटवडा भासत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.जिल्ह्यात छोटे-मोठे २४ सिंचन प्रकल्प आहेत. यंदा मान्सूनचे वेळेत आगमन झाल्याने जिल्ह्यात पेठ, सुरगाणा तालुकेवगळता अन्य तालुक्यांमध्ये बºयापैकी पावसाने हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यस्थितीत ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.मागील वर्षी ३ जुलैअखेर अवघा ६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र समाधानकारक स्थिती आहे. प्रामुख्याने गंगापूर (४५ टक्के), पालखेड (३२ टक्के), ओझरखेड (४० टक्के), दारणा (४२ टक्के), भावली (३४ टक्के), नांदूरमधमेश्वर (८९ टक्के), हरणबारी (५१ टक्के), गिरणा (३७ टक्के) आणि पुनंद (४५ टक्के) या धरणांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक साठा आहे.वाघाड, करंजवण, पुणेगाव, तिसगाव, वालदेवी, कडवा, भोजापूर, चणकापूर, केळझर, नागासाक्या या धरणांतील पाणीसाठा समाधानकारक नाही. सध्या खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असल्या तरी काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अनेक भागात बियाणांचा तसेच युरियासारख्या खतांचा तुटवडा जाणवत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. गतवर्षापेक्षा ११ टक्के अधिक पाऊस जिल्ह्यात ३ जुलैअखेर २६.६२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी १५.५ टक्केपाऊस झाला होता. यंदा त्यात ११ टक्क्यांनी भर पडली आहे. जिल्ह्यातील मालेगाव (७१.९० टक्के), बागलाण (७८.४ टक्के), देवळा (५८.२२ टक्के), निफाड (७५.४३ टक्के) तर सिन्नर (५६.८८ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. पेठ-सुरगाणावगळता अन्य तालुक्यात समाधानकारक स्थिती आहे. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दोन तालुके वगळता अन्यत्र आतापर्यंत समाधानकारक पावसाची नोंद झालेली आहे. यंदा सर्वाधिक पावसाची नोंद बागलाण तालुक्यातझालेली आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater scarcityपाणी टंचाई