शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

जिल्ह्यातील धरणांमध्ये ३० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:26 IST

नाशिक : यंदा मान्सूनचे वेळेत आगमन होऊन पाच तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय अशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात ३ जुलैअखेर ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देपेठ-सुरगाण्याला पावसाची प्रतीक्षा । पाच तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : यंदा मान्सूनचे वेळेत आगमन होऊन पाच तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असली तरी जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय अशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही. जिल्ह्यात ३ जुलैअखेर ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.जिल्ह्यात अद्याप पेठ आणि सुरगाण्यात अपेक्षित अशी पावसाची नोंद झालेली नाही तर बागलाण तालुक्यात सर्वाधिक वार्षिक सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक ७८ टक्के पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असल्या तरी अनेक भागात अद्यापही बियाणांचा व खतांचा तुटवडा भासत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.जिल्ह्यात छोटे-मोठे २४ सिंचन प्रकल्प आहेत. यंदा मान्सूनचे वेळेत आगमन झाल्याने जिल्ह्यात पेठ, सुरगाणा तालुकेवगळता अन्य तालुक्यांमध्ये बºयापैकी पावसाने हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यस्थितीत ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.मागील वर्षी ३ जुलैअखेर अवघा ६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र समाधानकारक स्थिती आहे. प्रामुख्याने गंगापूर (४५ टक्के), पालखेड (३२ टक्के), ओझरखेड (४० टक्के), दारणा (४२ टक्के), भावली (३४ टक्के), नांदूरमधमेश्वर (८९ टक्के), हरणबारी (५१ टक्के), गिरणा (३७ टक्के) आणि पुनंद (४५ टक्के) या धरणांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक साठा आहे.वाघाड, करंजवण, पुणेगाव, तिसगाव, वालदेवी, कडवा, भोजापूर, चणकापूर, केळझर, नागासाक्या या धरणांतील पाणीसाठा समाधानकारक नाही. सध्या खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असल्या तरी काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अनेक भागात बियाणांचा तसेच युरियासारख्या खतांचा तुटवडा जाणवत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. गतवर्षापेक्षा ११ टक्के अधिक पाऊस जिल्ह्यात ३ जुलैअखेर २६.६२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी १५.५ टक्केपाऊस झाला होता. यंदा त्यात ११ टक्क्यांनी भर पडली आहे. जिल्ह्यातील मालेगाव (७१.९० टक्के), बागलाण (७८.४ टक्के), देवळा (५८.२२ टक्के), निफाड (७५.४३ टक्के) तर सिन्नर (५६.८८ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. पेठ-सुरगाणावगळता अन्य तालुक्यात समाधानकारक स्थिती आहे. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील दोन तालुके वगळता अन्यत्र आतापर्यंत समाधानकारक पावसाची नोंद झालेली आहे. यंदा सर्वाधिक पावसाची नोंद बागलाण तालुक्यातझालेली आहे.

टॅग्स :Rainपाऊसwater scarcityपाणी टंचाई