शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

घोटी येथे ३ झोपडया आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 17:38 IST

घोटी : येथील पश्चित्ररायनगर येथील तीन झोपडया मंगळवारी मध्य रात्री अडीचच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाल्यात. या आगीत सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून या झोपड्यांमध्ये राहणारे ५ जण सुखरूप वाचले असून प्रसंगावधान राखल्याने कोंबड्या, संसारपयोगी वस्तू, रोख रक्कम व्यतिरिक्त कुठलीही जीवित हानी झाली नाही.

ठळक मुद्देकाही क्षणात संपूर्ण संसार बेचिराख : हजारोंचे नुकसान

घोटी : येथील पश्चित्ररायनगर येथील तीन झोपडया मंगळवारी मध्य रात्री अडीचच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाल्यात. या आगीत सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून या झोपड्यांमध्ये राहणारे ५ जण सुखरूप वाचले असून प्रसंगावधान राखल्याने कोंबड्या, संसारपयोगी वस्तू, रोख रक्कम व्यतिरिक्त कुठलीही जीवित हानी झाली नाही.घोटी येथील पश्चित्ररायनगर भागात रेल्वे ट्रॅकच्या बाजूला कातकरी समाजाची ३ कुटुंबे वास्तव्याला आहेत. जगन बाबू हीलम, देवराम जगन हीलम, सावळीराम शंकर राऊत, रत्नाबाई सावळीराम राऊत, महादू सावळीराम राऊत, तनिशा सावळीराम राऊत असे ३ कुटुंब राहत होते.तीन झोपड्यांमधील १ कुटुंब कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असून उर्वरित २ कुटुंबातील सदस्य घरात झोपलेले असतांना मध्यरात्री २.३० वाजेदरम्यान घरातील रॉकेलच्या दिव्यामुळे आग लागली. त्याचवेळी शेजारील जनार्दन नवले यांनी प्रसंगावधान राखत आग आरडाओरड केली व कुटुंबातील सर्वांना उठवले व त्वरित घराबाहेर काढल्याने ५ जणांचे प्राण वाचले. झोपडीत २० कोंबड्या, रोख रक्कम, मासेमारी करिता लागणारे साहित्य, महत्वाची कागदपत्रे, संसारपयोगी साहित्य, कपडे आदी सर्वच्या सर्व काहीवेळातच बेचिराख झाले.या अचानक लागलेल्या आगीत जवळपास ५० हजाराहून अधिक रकमेच्या वस्तूंचे नुकसान झाले आहे.मध्यरात्री लागलेली आग वाऱ्यामुळे फैलावली व घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या.या आगीचे लोणमहामार्गावरील टोल नाक्यावरून आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात दिसत होते.ही आग लागल्याचे समजताच समाधान गोईकने, निलेश भोर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आजूबाजूच्या घरातून पाणी घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र झोपडीतील सर्व वस्तू त्यापूर्वीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.हातावरचे काम व मजुरी करून पोट भरत असलेल्या या कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर पडला. लोकडाऊन मुळे सर्व धंदे ठप्प झालेले, त्यात उर्वरित संसार जळून खाक झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यानंतर सकाळी घोटी ग्रामपालिकेचे सरपंच रामदास भोर, विकास जाधव, प्रशांत रुपवते, सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे, हिरामण कडू ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांनी घटनास्थळी जाऊन आगीचा पहाणी केली.नुकसानग्रस्त कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी संसारपयोगी वस्तू व किराणा देणार असल्याचे सरपंच भोर यांनी सांगितले. घोटी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी देखिल सदर कुटुंबाचे सांत्वन केले व चौकशीचे आदेश दिले. पुढील तपास शरद कोठुळे, शीतल गायकवाड हे करीत आहेत.नशीब बलवत्तर म्हणून...मध्यरात्री साखरझोपेत असतांना शेजारील जनार्दन नवले हे बाहेर झोपलेले असल्याने यांना जळण्याचा वास आल्याने व आग लागल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरड करीत संपूर्ण कुटुंब घराबाहेर काढल्याने जीवित हानी टळली. (२८ घोटी १, २)

 

 

टॅग्स :AccidentअपघातFairजत्रा