शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

घोटी येथे ३ झोपडया आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 17:38 IST

घोटी : येथील पश्चित्ररायनगर येथील तीन झोपडया मंगळवारी मध्य रात्री अडीचच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाल्यात. या आगीत सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून या झोपड्यांमध्ये राहणारे ५ जण सुखरूप वाचले असून प्रसंगावधान राखल्याने कोंबड्या, संसारपयोगी वस्तू, रोख रक्कम व्यतिरिक्त कुठलीही जीवित हानी झाली नाही.

ठळक मुद्देकाही क्षणात संपूर्ण संसार बेचिराख : हजारोंचे नुकसान

घोटी : येथील पश्चित्ररायनगर येथील तीन झोपडया मंगळवारी मध्य रात्री अडीचच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाल्यात. या आगीत सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले असून या झोपड्यांमध्ये राहणारे ५ जण सुखरूप वाचले असून प्रसंगावधान राखल्याने कोंबड्या, संसारपयोगी वस्तू, रोख रक्कम व्यतिरिक्त कुठलीही जीवित हानी झाली नाही.घोटी येथील पश्चित्ररायनगर भागात रेल्वे ट्रॅकच्या बाजूला कातकरी समाजाची ३ कुटुंबे वास्तव्याला आहेत. जगन बाबू हीलम, देवराम जगन हीलम, सावळीराम शंकर राऊत, रत्नाबाई सावळीराम राऊत, महादू सावळीराम राऊत, तनिशा सावळीराम राऊत असे ३ कुटुंब राहत होते.तीन झोपड्यांमधील १ कुटुंब कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असून उर्वरित २ कुटुंबातील सदस्य घरात झोपलेले असतांना मध्यरात्री २.३० वाजेदरम्यान घरातील रॉकेलच्या दिव्यामुळे आग लागली. त्याचवेळी शेजारील जनार्दन नवले यांनी प्रसंगावधान राखत आग आरडाओरड केली व कुटुंबातील सर्वांना उठवले व त्वरित घराबाहेर काढल्याने ५ जणांचे प्राण वाचले. झोपडीत २० कोंबड्या, रोख रक्कम, मासेमारी करिता लागणारे साहित्य, महत्वाची कागदपत्रे, संसारपयोगी साहित्य, कपडे आदी सर्वच्या सर्व काहीवेळातच बेचिराख झाले.या अचानक लागलेल्या आगीत जवळपास ५० हजाराहून अधिक रकमेच्या वस्तूंचे नुकसान झाले आहे.मध्यरात्री लागलेली आग वाऱ्यामुळे फैलावली व घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या.या आगीचे लोणमहामार्गावरील टोल नाक्यावरून आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात दिसत होते.ही आग लागल्याचे समजताच समाधान गोईकने, निलेश भोर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आजूबाजूच्या घरातून पाणी घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र झोपडीतील सर्व वस्तू त्यापूर्वीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.हातावरचे काम व मजुरी करून पोट भरत असलेल्या या कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर पडला. लोकडाऊन मुळे सर्व धंदे ठप्प झालेले, त्यात उर्वरित संसार जळून खाक झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यानंतर सकाळी घोटी ग्रामपालिकेचे सरपंच रामदास भोर, विकास जाधव, प्रशांत रुपवते, सदस्य संजय आरोटे, श्रीकांत काळे, हिरामण कडू ग्रामविकास अधिकारी रवींद्र धुंदाळे यांनी घटनास्थळी जाऊन आगीचा पहाणी केली.नुकसानग्रस्त कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी संसारपयोगी वस्तू व किराणा देणार असल्याचे सरपंच भोर यांनी सांगितले. घोटी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी देखिल सदर कुटुंबाचे सांत्वन केले व चौकशीचे आदेश दिले. पुढील तपास शरद कोठुळे, शीतल गायकवाड हे करीत आहेत.नशीब बलवत्तर म्हणून...मध्यरात्री साखरझोपेत असतांना शेजारील जनार्दन नवले हे बाहेर झोपलेले असल्याने यांना जळण्याचा वास आल्याने व आग लागल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरड करीत संपूर्ण कुटुंब घराबाहेर काढल्याने जीवित हानी टळली. (२८ घोटी १, २)

 

 

टॅग्स :AccidentअपघातFairजत्रा