शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींचा गावगाडा होणार विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:13 IST

मानोरी : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांना आय.टी. महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती देऊन राज्याच्या अर्थसंकल्पातून निधीची तरतूद करून किमान मासिक वेतन लागू करण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी सोमवारी (दि. २२) पासून मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

ठळक मुद्देसंगणक परिचालकांचे उद्यापासून काम बंद आंदोलन

मानोरी : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांना आय.टी. महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती देऊन राज्याच्या अर्थसंकल्पातून निधीची तरतूद करून किमान मासिक वेतन लागू करण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी सोमवारी (दि. २२) पासून मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

प्रलंबित मागण्यांचे निवेदन संगणक परिचालक संघटनेने ग्रामविकास राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. आंदोलनात येवला तालुका संगणक परिचालक संघटनादेखील सहभागी होणार असल्याची माहिती येवला तालुका संगणक परिचालक संघटना अध्यक्ष सोपान सुराशे यांनी दिली आहे.निवेदनात म्हटले आहे की, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि संगणक परिचालक यांच्या बैठकीत ग्रामविकासमंत्र्यांनी आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना आय.टी. महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा ठराव घेतला असून त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नसल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

मात्र मंत्र्यांनी निधी नसल्याचे कारण देत संगणक परिचालकांना मानधनवाढीचे आश्वासन दिले असता ग्रामविकास विभागाने १४ जानेवारी २०२१ ला शासन निर्णय काढत संगणक परिचालकांना केवळ १ हजार रुपये मानधनवाढ करत संगणक परिचालकाच्या जखमेवर मीठ चोळले असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया संगणक परिचालकांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे या निर्णयामुळे परिचालकांनी २२ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.अशा आहेत मागण्या1 ) आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पांतर्गत राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या परिचालकांना आय.टी. महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती देऊन राज्याच्या अर्थसंकल्पातून तरतूद करून किमान मासिक वेतन लागू करणे.2 ) सुधारित आकृतिबंधानुसार सर्व परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा देऊन राज्याच्या अर्थसंकल्पातून किमान मासिक वेतन देण्याची तरतूद करणे.4 ) पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना १५ मार्च २०१८ च्या शासन निर्णयानुसार नियुक्ती देऊन निधीची तरतूद करणे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार