शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

28,819 स्वयंसेवक; 352 टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:38 IST

राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात २८ हजार ८१९ स्वयंसेवकांनी सहभागी होत सुमारे ३५२ टन कचरा उचलल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.

नाशिक : राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात २८ हजार ८१९ स्वयंसेवकांनी सहभागी होत सुमारे ३५२ टन कचरा उचलल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. शालिमार चौकात सकाळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थिताना स्वच्छताविषयक शपथ देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त महेश झगडे, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी, सभागृहनेता दिनकर पाटील, महंत भक्तिचरणदास, प्रजापिता ब्रह्मकुमारी वासंतीदिदी यांनी हाती झाडू घेत परिसरात साफसफाई केली. मेनरोडवरील गाडगे महाराज पुतळ्यापर्यंत साफसफाई केल्यानंतर पालकमंत्री उंटवाडी तसेच संभाजी स्टेडियम येथे झालेल्या मोहिमेतही सहभागी झाले. यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले, नागरिकांनी पंधरवडा स्वच्छता अभियानाबरोबरच नियमित स्वच्छतेबाबतही जागरूक राहणे आवश्यक आहे असे सांगितले. दरम्यान, स्वच्छ भारत अभियानाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर आंतरराष्टÑीय धावपटू कविता राऊत, चित्रकार सावंत बंधू, क्रीडा प्रशिक्षक अशोक दुधारे, छायाचित्रकार प्रसाद पवार यांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेने ४५२ ब्लॅक स्पॉट निश्चित केले होते. मोहिमेत २८ हजार ८१९ स्वयंसेवकांनी सहभागी होत सुमारे ३५२ टन कचरा उचलल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला.११७ घंटागाड्या तैनातमहास्वच्छता अभियानासाठी महापालिकेने ११७ घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. शिवाय स्वयंसेवकांसाठी २५ हजार झाडू, ४० हजार मास्क व ४० हजार ग्लोज उपलब्ध करून दिले होते. कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाड्यांव्यतिरिक्त ३३ जेसीबी, ४१ डंपर व ३० ट्रॅक्टर तैनात करण्यात आले होते.जिल्हाधिकाºयांनी वेधले लक्षस्वच्छता मोहिमेत विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनीही सहभाग नोंदवला. परंतु मोहिमेत सर्वाधिक लक्ष वेधले ते जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी. जिल्हाधिकाºयांनी काही नागरिकांच्या सोबतीने दोन-तीन ब्लॅक स्पॉट्स स्वच्छ केले.१४२ शाळांचा सहभाग४शहरातील सहाही विभागांतील १४२ शाळांमधील १९ हजार ७४१ विद्यार्थी सहभागी झाले होते. शिवाय, १९४ स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग नोंदविला. महापालिकेचे ३१५५ कर्मचारी आणि ५९२३ नागरिकही या मोहिमेत सहभागी झाले होते. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सदर मोहीम राबविण्यात आली.