शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

अमरनाथ यात्रेत २७६ भाविक अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:41 AM

नाशिक : काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सुमारे २७६ भाविक गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बालटालजवळ खराब हवामानामुळे अडकून पडले असून, भाविक सुरक्षित असल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

ठळक मुद्देखराब हवामान : भाविक सुरक्षित असल्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्वाळा

नाशिक : काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नाशिकचे सुमारे २७६ भाविक गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बालटालजवळ खराब हवामानामुळे अडकून पडले असून, भाविक सुरक्षित असल्याचा निर्वाळा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.२८ जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू झाली असून, नाशिकचे भाविक मातोश्री ट्रॅव्हल्सच्या वतीने २९ जून रोजी जम्मू-काश्मीरकडे रवाना झाले आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांपासून वादळ, पाऊस व भूस्खलनामुळे यात्रा खंडित होत असल्याने नाशिकचे काही भाविक मागे-पुढे झाले आहेत. अमरनाथ गुंफेजवळ १०२ भाविक कालपासून शिबिरात अडकले आहेत. तर अन्य भाविक बालटालच्या लष्कराच्या शिबिरात सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. या भाविकांचे भ्रमणध्वनी बंद झाल्याने त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क तुटल्यामुळे काळजी व्यक्त केली जात होती. सुरक्षिततेचा प्रश्न दरवर्षी उत्तर भारत, अमरनाथ, कैलास मानसरोवर, दक्षिण भारतात हजारो भाविक यात्रेकरू नाशिकमधून रवाना होत असतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून उत्तर भारतात नैसर्गिक आपत्तीच्या घटना पावसाळ्यात घडू लागल्या असून, त्यातून भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. ढगफुटी, भूस्खलन, महापुराच्या घटनांमध्ये भाविक अडकून पडल्याचे प्रकारही अनेकवेळा घडले आहेत.