शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

धरणात २५ टक्के साठा; १६१ टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 01:06 IST

उष्णतेच्या पाऱ्याने ३६ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. मार्च अखेरीसच धरणातील पाणीसाठा २५ टक्क्यांवर पोहोचल्याने पाण्याचे गंभीर संकट घोंगावू लागले आहे.

नाशिक : उष्णतेच्या पाऱ्याने ३६ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. मार्च अखेरीसच धरणातीलपाणीसाठा २५ टक्क्यांवर पोहोचल्याने पाण्याचे गंभीर संकट घोंगावू लागले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ६३३ गावांमधील साडेतीन लाख लोकसंख्येसाठी १६१ टॅँकरने तहान भागविली जात आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आता प्रशासनाकडे पाण्याचे गाºहाणे मांडण्यासाठी राजकीय पक्ष व संघटनांनीही पुढे येण्यास नकार दिला आहे.यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ८२ टक्केच पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पावसाळ्यातच काही तालुक्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. परिणामी शासनाने जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून टंचाईच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात थंडीने तग धरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची फारशी मागणी नसली तरी, मार्च उजाडताच मात्र त्यात मोठी वाढ झाली आहे. विशेष करून बागलाण, चांदवड, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, देवळा व येवला या सात तालुक्यांमध्ये तडाखा वाढल्यानंतर पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी होत चालला असून, उष्णतेचे प्रमाण वाढताच बाष्पीभवन व गळतीमुळे जेमतेम २५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी मार्च अखेर हेच प्रमाण ४४ टक्के इतके होते.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २६ टक्के तर समूहात ३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याशिवाय कडवा, भोजापूरमध्ये तीन तर भावली धरणात सहा टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्णातील पाण्याच्या मागणीचा विचार करता सात तालुक्यांतील १४९ वाडे व ४८४ गावे अशा ६३३ गावांमध्ये आजच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने १६१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी काही ठिकाणी धरणातून तर जवळपास ७४ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच मार्च महिन्यात टॅँकरच्या संख्येने दीडशेचा आकडा ओलांडला आहे. सुमारे साडेतीन लाख लोकसंख्येला पाण्याची गरज असून, धरणातील साठ्याचा विचार करता येणाºया तीन महिन्यांसाठी पाणी जपून वापरण्याशिवाय पर्याय नाही.तालुकानिहाय टॅँकरबागलाण-२७, चांदवड-३, देवळा-७, मालेगाव-३०, नांदगाव-२२, सिन्नर-४२, येवला तालुक्याला ३० टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी