शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

धरणात २५ टक्के साठा; १६१ टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 01:06 IST

उष्णतेच्या पाऱ्याने ३६ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. मार्च अखेरीसच धरणातील पाणीसाठा २५ टक्क्यांवर पोहोचल्याने पाण्याचे गंभीर संकट घोंगावू लागले आहे.

नाशिक : उष्णतेच्या पाऱ्याने ३६ अंश सेल्सिअस पार केल्यानंतर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. मार्च अखेरीसच धरणातीलपाणीसाठा २५ टक्क्यांवर पोहोचल्याने पाण्याचे गंभीर संकट घोंगावू लागले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ६३३ गावांमधील साडेतीन लाख लोकसंख्येसाठी १६१ टॅँकरने तहान भागविली जात आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आता प्रशासनाकडे पाण्याचे गाºहाणे मांडण्यासाठी राजकीय पक्ष व संघटनांनीही पुढे येण्यास नकार दिला आहे.यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ८२ टक्केच पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पावसाळ्यातच काही तालुक्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. परिणामी शासनाने जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून टंचाईच्या उपाययोजना लागू केल्या आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात थंडीने तग धरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची फारशी मागणी नसली तरी, मार्च उजाडताच मात्र त्यात मोठी वाढ झाली आहे. विशेष करून बागलाण, चांदवड, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, देवळा व येवला या सात तालुक्यांमध्ये तडाखा वाढल्यानंतर पाण्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी होत चालला असून, उष्णतेचे प्रमाण वाढताच बाष्पीभवन व गळतीमुळे जेमतेम २५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी मार्च अखेर हेच प्रमाण ४४ टक्के इतके होते.नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २६ टक्के तर समूहात ३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. याशिवाय कडवा, भोजापूरमध्ये तीन तर भावली धरणात सहा टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्णातील पाण्याच्या मागणीचा विचार करता सात तालुक्यांतील १४९ वाडे व ४८४ गावे अशा ६३३ गावांमध्ये आजच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने १६१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी काही ठिकाणी धरणातून तर जवळपास ७४ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच मार्च महिन्यात टॅँकरच्या संख्येने दीडशेचा आकडा ओलांडला आहे. सुमारे साडेतीन लाख लोकसंख्येला पाण्याची गरज असून, धरणातील साठ्याचा विचार करता येणाºया तीन महिन्यांसाठी पाणी जपून वापरण्याशिवाय पर्याय नाही.तालुकानिहाय टॅँकरबागलाण-२७, चांदवड-३, देवळा-७, मालेगाव-३०, नांदगाव-२२, सिन्नर-४२, येवला तालुक्याला ३० टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी