शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

सेवानिवृत्तीला २५ दिवस उरले असतानाच जवानाला वीरमरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 01:42 IST

भारतीय सैन्यदलाच्या मराठा बटालियनचे जवान गणेश भीमराव सोनवणे (३६) हे जम्मु-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना मंगळवारी (दि.५) त्यांच्या वाहनाला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना वीरमरण आले. सैन्याच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्देअमळनेर तालुक्याचे भूमिपुत्र; मराठा बटालियनमध्ये कर्तव्यावर

सिडको : भारतीय सैन्यदलाच्या मराठा बटालियनचे जवान गणेश भीमराव सोनवणे (३६) हे जम्मु-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना मंगळवारी (दि.५) त्यांच्या वाहनाला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना वीरमरण आले. सैन्याच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते मुळ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा गावाचे भूमिपुत्र होते. सध्या मागील काही वर्षांपासून नाशिकमधील अंबड येथे ते कुटुंबासमवेत वास्तव्यास होते.

अंबड गावातील डीजीपीनगर-२ जवळील कंम्फर्ट झोन सोसायटीतील रहिवासी गणेश सोनवणे हे सैन्यदलात नोकरीवर होते. मंगळवारी त्यांच्या पत्नी सीमा सोनवणे यांना सैन्यदलाच्या कार्यालयातून फोन आला आणि लष्करी अधिकाऱ्यांकडून ‘तुमचे पती एका अपघातात शहीद झाले आहेत’ असे सांगण्यात आले अन् त्यांच्यावर आभाळ फाटले. सुरुवातीला त्यांचा या निरोपावर विश्वासच बसत न्हवता, कारण मंगळवारी सकाळीच गणेश यांनी आपल्या पत्नी, मुलींशी फोनवरुन संवाद साधला होता, सर्वांची खुशहाली विचारली होती तसेच दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारासही त्यांनी फोन केला होता. त्यावेळेस पत्नी सीमा ह्या घरकामात व्यस्त असल्याने लहान मुलगी हर्षदासोबत त्यांनी गप्पा मारल्या. अभ्यास कसा सुरु आहे, याबाबत विचारपुस केली अन् सायंकाळी थेट अपघात झाला आणि त्यामध्ये गणेश हे गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याचे माहिती फोनवरुन मिळाल्याने सोनवणे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. गणेश यांच्या पश्चात आई सिंधुबाई, पत्नी सीमा, मुली प्रांजल व हर्षदा असा परिवार आहे. दोन्ही मुली प्राथमिक शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पार्थिवावर पातोंडा या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

--इन्फो--

सोनवणे कुटुंबियांचा आधार हरपला

जवान गणेश सोनवणे यांच्या दोन्ही बंधुंचे काही वर्षांपुर्वी दुर्दैवी निधन झाले होते. यामुळे गणेश यांचा एकमेव आधार या कुटुंबाला होता.ऑक्टोबरअखेरीस ते सैन्यदलातून निवृत्त होणार म्हणून कुटुंबिय आनंदात होते आणि त्यांची घरी येण्याची वाट बघत होते; मात्र काळाने गणेश यांना त्यांच्यापासून कायमचेच हिरावून नेले आणि या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ते मागील गेल्या जून महिन्यात घरी सुटीवर आले होते, हे सांगताना पत्नी सीमा यांना अश्रु अनावर झाले होते, तसेच त्यांच्या दोन्ही मुलींचा अश्रूंचा बांध फुटला. सोसायटीमधील रहिवाशांनी सोनवणे यांच्या घरी धाव घेत त्यांचे सांत्वन करत समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :NashikनाशिकSoldierसैनिकDeathमृत्यू