शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

खरिपासाठी १६ भरारी पथके तैनात

By admin | Updated: May 9, 2014 23:10 IST

शेतकर्‍यांंसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन

नाशिक : खरीप व रब्बी हंगामात शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी व शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर १५अशा एकूण १६ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच शेतकर्‍यांसाठी खास जिल्हा परिषदेत तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.भरारी पथकांमध्ये प्रत्येकी पाच अधिकार्‍यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावरील भरारी पथकाचे अध्यक्ष कृषी विकास अधिकारी ज्ञानेश्वर बोेराडे, तर सदस्य सचिव म्हणून मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे यांच्यासह जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पी. वाय. साळुंखे व सहाय्यक निरीक्षक वजन व मापे डी.पी. पवार यांचा समावेश आहे. पंधरा तालुक्यांसाठी १५ भरारी पथकांची नियुक्ती केली असून, त्यात तालुका भरारी पथकाच्या अध्यक्षपदी संबंधित तालुका कृषी अधिकार्‍यांची तर सदस्य सचिव म्हणून कृषी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे भरारी पथके खरीप व रब्बी हंगामासाठी कार्यरत असतील. त्याचप्रमाणे खरीप हंगामासाठी १५ मे ते १५ ऑगस्ट व रब्बी हंगामासाठी १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०१४ या काळात जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी यांची निविष्ठा उपलब्धता व निविष्ठांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या तक्रार निवारण कक्षाचे कामकाज पाहण्यासाठी मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे व कृषी विस्तार अधिकारी व्ही. पी. केदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. हा तक्रार निवारण कक्ष सुटीचे दिवस वगळून दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत कार्यरत राहणार असून, या कालावधीत आलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणी व तक्रारींचे निराकरण करण्याचे काम या अधिकार्‍यांना करावयाचे आहे.(प्रतिनिधी)